AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्ली हिंसा हा शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा भाजपचा कट: नवाब मलिक

दिल्ली हिंसेवरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. (nawab malik slams bjp over farmers protest in delhi)

दिल्ली हिंसा हा शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा भाजपचा कट: नवाब मलिक
नवाब मलिक
| Updated on: Jan 27, 2021 | 3:24 PM
Share

मुंबई: दिल्ली हिंसेवरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. दिल्लीतील हिंसा हा शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा भाजपचा सुनियोजित कट होता, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. (nawab malik slams bjp over farmers protest in delhi)

नवाब मलिक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा गंभीर आरोप केला आहे. दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढणार असल्याचंही स्पष्ट केलं होतं. हा मोर्चा दिल्लीत आला. त्यांनी लाल किल्ल्यावर ध्वज फडकवला. पण तिरंगा काढून त्यांनी ध्वज फडकवला ही बातमी चुकीची आहे, असं नवाब मलिक म्हणाले.

लाल किल्ल्याच्या दिशेने शेतकऱ्यांची रॅली गेली होती. पोलिसांनीच त्यांना लाल किल्ल्याचा मार्ग दाखवला होता. तिथे ध्वज फडकवण्याचं काम भाजपशी संबंधित दीपसिंह सिद्धूने केली. याच दीपसिंह सिद्धूने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती, असं सांगतानाच दिल्लीतील हिंसा हा शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा भाजपचा सुनियोजित कट होता, असा आरोपही त्यांनी केला.

पवार जवानांच्या बाजूने

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे जवानांच्या बाजूने उभे आहेत. दिल्ली पोलीस दलात पंजाब, हरियाणाचे लोक आहेत, हे आशिष शेलार यांना माहीत नाही काय? असा सवालही त्यांनी केला.

दिल्ली हिंसेचे आझाद मैदानाशी कनेक्शन

दिल्लीतील हिंसाचारामागे आझाद मैदानातील भाषणाचं कनेक्शन असल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. भातखळकर यांनी अमित शहा यांना पत्रं लिहून तसा आरोप केला आहे. तसेच दिल्लीतील हिंसाचाराचं आझाद मैदानातील भाषणाशी कनेक्शन आहे का? याची चौकशी करा, अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे. या सभेत सपा नेते अबू आझमी यांनी चिथावणीखोर भाषण केलं होतं. त्यामुळे आझमींचा बोलविता धनी कोण?, असा सवालही त्यांनी केला आहे. घर घर से बाहर निकलो, कोहराम मचा दो, मोदी तेरी राख कर देंगे, अशी वक्तव्य आझमीनी केली होती, असंही त्यांनी म्हटलं आहे. (nawab malik slams bjp over farmers protest in delhi)

संबंधित बातम्या:

आशिष शेलार साहेब, खरं सांगा दीप सिद्धू तुमचे कोण?; मिटकरींचा सवाल

दिल्ली हिंसाचारात ज्याचं नाव समोर येतंय तो लक्खा सिधाना कोण आहे?

लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदी-शाहांवर घणाघात, आता शेतकरी आंदोलनावर राज ठाकरे काय बोलणार?

“हिंसाचारात भाजप सामील असल्याचा अपप्रचार, केंद्राला जबाबदार धरणं चुकीचं”

(nawab malik slams bjp over farmers protest in delhi)

Follow Us
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.