AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘लोक माझे सांगाती’ मधील उद्धव ठाकरे यांच्या उल्लेखावर सुप्रिया सुळे यांचे भाष्य, म्हणाल्या…

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' मधील उद्धव ठाकरे यांच्या उल्लेखावर पुन्हा राजकीय चर्चा सुरु झाली आहे. यासंदर्भात पुण्यात देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी वक्तव्य केले. त्यावर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले.

'लोक माझे सांगाती' मधील उद्धव ठाकरे यांच्या उल्लेखावर सुप्रिया सुळे यांचे भाष्य, म्हणाल्या...
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 19, 2023 | 11:27 AM
Share

अभिजित पोते, पुणे : भाजप प्रदेश कार्यकारिणीची गुरुवारी पुण्यात बैठक झाली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकातील उद्धव ठाकरे यांच्याबद्दलच्या १० वाक्यांचे जाहीर वाचन केले. सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आठ मागण्या वाचून दाखवल्या. देवेंद्र फडणवीस यांच्या या भाषणाची चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. विशेषत: शरद पवार यांनी त्यांच्या आत्मकथेत उद्धव ठाकरे यांच्याबद्दल लिहिलेल्या मजकूरावरुन राजकीय चर्चा रंगली आहे. त्यावर शरद पवार यांच्या कन्या अन् खासदार सुप्रिया सुळे यांनीही भाष्य केले आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे

खासदार सुप्रिया सुळे जांभूळवाडी तलावाची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी आल्या होत्या. काही दिवसांपूर्वी याच तलावात दुर्गंधीमुळे हजारो मासे झाले होते. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पुणे महापालिका आणि पाटबंधारे विभागाने तातडीने बैठक घेऊन प्रश्न सोडवला पाहिजे. महापालिकेत सध्या अधिकारीच कारभार चालवत आहे. यामुळे या निवडणूक लवकर घेतली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. हा प्रकार म्हणजे महापालिका हलगर्जीपणा आहे बाकी काही नाही. या तळ्यातील मासे कोणीही खाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.

उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काय म्हणाल्या

देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात काल उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात शरद पवार यांनी लिहिलेली दहा वाक्य वाचून दाखवली. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, लोक माझे सांगाती हे पुस्तक नीट वाचा. या राजकीय आत्मकथेत १०० गोष्टी चांगल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल या फक्त नोट्स काढल्या आहेत. फडणवीस यांनी टीआरपी कसा वाढवावा हे शरद पवार कडून शिका असे म्हटले होते. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, फडणवीस यांनी पवार यांना दिलेली ही कॉम्प्लेमेंट आहे.

उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची ती दहा वाक्य

लोक माझे सांगाती पुस्तकामधील फडणवीस यांनी वाचली दहा वाक्य…

  1. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या संवादामधील सहजता उद्धव ठाकरे सोबत नव्हती.
  2. उद्धव ठाकरे यांना राज्यातील घडामोडींची बितंबातमी माहीत नव्हती. जी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे असायला पाहिजे होती.
  3. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केल्याने शिवसेनेत उद्रेक होईल याची कल्पनाच आम्हाला आली नव्हती.
  4. उद्धव ठाकरे यांचे कुठे काय घडतं आहे याबर बारीक लक्ष नसायचे.
  5. उद्धव ठाकरे यांच्यांत उद्या काय घडतं आहे याचा अंदाज घ्यायची क्षमता नव्हती.
  6. उद्धव ठाकरे यांच्यामध्ये राजकीय चातुर्य असायला हवं होतं त्याची कमतरता आम्हाला जाणवत होती.
  7. उद्धव ठाकरे यांचा राजकीय अनुभव कमी पडला. जे सगळं घडत होतं. ते टाळता येणं त्यांना जमलं नाही.
  8. महाविकास आघाडी सरकार कोसळताना पहिल्याच टप्प्यात त्यांनी माघार घेतली. संघर्ष न करता माघार घेतली.
  9. उद्धव ठाकरे प्रशासनाच्या संपर्कात ऑनलाईन पद्धतीने होते. दुसरीकडे राजेश टोपे, अजितदादा आणि इतर मंत्री मात्र प्रत्यक्ष संपर्कात होते.
  10. उद्धव ठाकरे यांचे फक्त दोनवेळा मंत्रालयात जाणे हे आमच्या पचनी पडणारे नव्हते.

Follow Us
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदत
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
मुंबई महापालिकेकडून शालेय साहित्य वाटपास विलंब: इराण युद्ध कारणीभूत
मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
शिल्पा गवारे कुटुंबीयांकडून छळाचा आरोप, न्यायची मागणी
पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी पार
Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी, काय सुनावणी घडलं?
नेपाळ पुराचा बिहारला फटका: पाटणा, चंपारण, गोपाळगंज, सारणमध्ये सतर्कता
नेपाळमधील महापुराचा बिहारला फटका: गंगा नदीकाठच्या झोपड्या पाण्याखाली
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार मागणाऱ्या लेकाला पालकांनीच संपवलं
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात; सांस्कृतिक सोहळ्यांमध्ये सहभाग
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर...
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश