AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राचा इथेनॉलनिर्मितीमध्ये देशात झेंडा, 1012 लाख टन ऊसाचं गाळप पूर्ण, साखर आयुक्तांची माहिती

साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी महाराष्ट्रानं इथेनॉल निर्मितीमध्ये पहिला क्रमांक मिळवल्याचं सांगितलं. Shekhar Gaikwad Sugarcane Cutting Season

महाराष्ट्राचा इथेनॉलनिर्मितीमध्ये देशात झेंडा, 1012 लाख टन ऊसाचं गाळप पूर्ण, साखर आयुक्तांची माहिती
साखर कारखाना
| Updated on: May 27, 2021 | 5:28 PM
Share

पुणे: महाराष्ट्रातील 2020-21 चा ऊस गाळप हंगाम संपल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन दिली. इथेनॉल निर्मितीत महाराष्ट्रचा देशात पहिला क्रमांक असल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 93 टक्के एफआरपी पेमेंट करण्यात आले आहे. 19 साखर कारखान्यांनी तैवानला ऑक्सिजन प्लॅन्टची ऑर्डर दिली आहे, लवकरच ते बसवले जाणार आहेत, अशी माहिती देखील त्यांनी दिली. (Maharashtra Sugar Commissioner Shekhar Gaikwad said Sugarcane cutting season competed of 2020-21)

189 साखर कारखान्यांकडून गाळप हंगाम

सन 2020-21 मध्ये एकूण सहकारी आणि खासगी अशा मिळून एकूण 189 साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला. महाराष्ट्राची गाळप क्षमता 76 हजार टनानं वाढली असल्याची माहिती शेखर गायकवाड यांनी दिली. मागील वर्षी महाराष्ट्रात 36 लाख टन शिल्लक होती. यावर्षी 106 लाख साखरेचं उत्पन्न झाले आहे.

इथेनॉल निर्मितीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर

शेखर गायकवाड यांनी इथेनॉल निर्मितीमध्ये महाराष्ट्र पहिल्या स्थानावर असल्याची माहिती दिली.गेल्या पाच वर्षात इथोनॉलच उत्पन्न झालं नाही ते यावर्षी झालं आहे, असंही ते म्हणाले.

पावसाळ्यापूर्वी राज्यातील ऊसाचं गाळप पूर्ण

महाराष्ट्रातील एकूण 189 साखर कारखान्याद्वारे 1012 लाख टन यावर्षी गाळप झाले आहे. 140 दिवसांचा गाळप हंगाम पूर्ण झाला आहे. पावसाळा येण्यापूर्वी राज्यातला सर्व ऊस संपला आहे.

थकित एफआरपीप्रकरणी 29 कारखान्यांवर कारवाई

साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी महाराष्ट्रातील एकूण 29 कारखान्यांवर थकित एफआरपी प्रकरणी कारवाई केल्याची माहिती दिली. तर, दुसरीकडे थकीत एफआरपीप्रकरणी अजून 10 कारखान्यावर लवकरच कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

सर्वाधिक गाळप कोल्हापूर विभागात

यंदा सर्वाधिक गाळप कोल्हापूर विभागात झाले असून साखरेच्या सरासरी उताऱ्याचे प्रमाण 12 टक्के इतके आहे. तर, पुणे विभाग ऊस गाळपात दुसऱ्या क्रमांकावर असून सरासरी साखर उतारा 10.97 टक्के इतका आहे. तर सर्वात कमी उतारा नागपूर विभागात राहिला आहे.

कोरोनाच्या संकटातही विक्रमी गाळप

2020-21 चा गाळप हंगाम हा कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरु झाला. राज्यातील शेतकऱ्यांची मेहनत, साखर कारखान्यांची यंत्रणा याद्वारे राज्यामध्ये कोरोनाचं संकट असतानाही विक्रमी गाळप झालं आहे. यानिमित्तानं महाराष्ट्र हे साखर उत्पादनातील अग्रेसर राज्य असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.

संबंधित बातम्या:

कोरोना संकटात ना शेतकरी थांबला ना कारखाने, यंदाच्या गाळप हंगामात ऊसाचं विक्रमी गाळप

दिमाखात डोलणारी 25 लाखांची केळीची बाग डोळ्यांदेखत भुईसपाट, तोक्ते चक्रीवादळानं शेतकऱ्यांची स्वप्न चक्काचूर

(Maharashtra Sugar Commissioner Shekhar Gaikwad said Sugarcane cutting season competed of 2020-21)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.