AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

monsoon | मॉन्सूनचा फटका खरीप हंगामास, कमी पावसामुळे शेतमालाच्या उत्पादनावर परिणाम, काय आहे अंदाज

farmers news and monsoon | राज्यात यंदा मॉन्सूनने सरासरी गाठली नाही. राज्यातून आता परतीचा पाऊस परतला आहे. पावसाच्या तुटीचा परिणाम यंदा खरीप हंगावावर होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यंदा उत्पन्नात...

monsoon | मॉन्सूनचा फटका खरीप हंगामास, कमी पावसामुळे शेतमालाच्या उत्पादनावर परिणाम, काय आहे अंदाज
| Updated on: Oct 10, 2023 | 8:57 AM
Share

पुणे | 10 ऑक्टोंबर 2023 : भारतीय हवामान विभागाने जाहीर केलेला अंदाज यावर्षी फोल ठरला. देशातील अनेक राज्यात पावसाने सरासरी गाठली नाही. महाराष्ट्रात यंदा पावसाची तूट राहिली. राज्यातील ३६ पैकी २४ जिल्ह्यांत यंदा कमी पाऊस झाला आहे. हवामान विभागाने मॉन्सून संपल्याचे जाहीर केले आहे. तसेच महाराष्ट्रातून मॉन्सूनचा परतीचा पाऊस पूर्ण झाला आहे. राज्यातील धरणांमध्ये यंदा जलसाठा पूर्ण झालेला नाही. या सर्वांचा परिणाम यंदा शेतीवर होणार आहे. खरीप आणि रब्बी हंगामत उत्पन्न घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

खरीप हंगामासंदर्भात काय आहे अंदाज

राज्यातील शेतकऱ्यांना यंदा खरीप हंगाम चांगला येईल, अशी अपेक्षा होती. कारण हवामान विभागाने यंदा सरासरी पावसाचा अंदाज वर्तवला होता. परंतु जून आणि ऑगस्ट महिन्यात पावसाची तूट राहिली. यामुळे राज्यातील ३६ पैकी २४ जिल्ह्यांत अपेक्षित मोसमी पाऊस झाला नाही. त्याचा परिणाम शेतमालाच्या उत्पन्नावर होणार आहे. खरीप हंगमात उत्पादन मोठया प्रमाणात घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांतील ८९० मंडलांत खरीप पिकांचे उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा कमी राहणार असल्याने अंदाज आहे. यामुळे शेतीमालाच्या उत्पादनात मोठी तूट होण्याचा अंदाज आहे.

वर्षभर अन्नधान्य टंचाई जाणवणार

खरीप हंगामाचा परिणामामुळे आगामी वर्षभरात अन्नधान्याची टंचाई जाणवण्याची भीती आहे. राज्याच्या कृषी विभागाने मोसमी पावसाच्या हंगामात ३६ पैकी २४ जिल्ह्यांत अपेक्षित पाऊस झाला नसल्याचे म्हटले आहे. यामुळे पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नगर, नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, परभणी, धाराशिव, नांदेड, हिंगोली, अमरावती, बुलडाणा, अकोला, वाशिम, नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यातील उत्पादन घटणार आहे.

रब्बी हंगामावर होणार परिणाम

खरीप हंगामाप्रमाणे यंदा रब्बी हंगामावर परिणाम होणार आहे. यंदा कमी पाऊस झाल्यामुळे राज्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा झालेला नाही. त्यामुळे पहिले प्राधान्य पिण्याच्या पाण्याच्या आरक्षणास राहणार आहे. त्यानंतर उपलब्ध पाण्यावर शेतीचे नियोजन करण्यात येणार आहे. यंदा रब्बीसाठी कमी आवर्तन मिळण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम रब्बी हंमामाच्या उत्पादनावर होणार आहे.

अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?
अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?.
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा.
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा.
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल.
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब.
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान.
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य.
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?.
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट.
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ.