AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai HC : न केलेल्या गुन्ह्याची 12 वर्षे भोगली शिक्षा! पुण्यातल्या दुहेरी हत्याकांडाच्या गुन्ह्यातून चौघांची मुंबई उच्च न्यायालयानं केली सुटका

पुण्यातील (Pune) दुहेरी हत्याकांडाच्या (Double murder) 12 वर्षांनंतर मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) मोठा निकाल दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने तब्बल 12 वर्षांनंतर चार जणांची निर्दोष मुक्तता केली आहे.

Mumbai HC : न केलेल्या गुन्ह्याची 12 वर्षे भोगली शिक्षा! पुण्यातल्या दुहेरी हत्याकांडाच्या गुन्ह्यातून चौघांची मुंबई उच्च न्यायालयानं केली सुटका
मुंबई उच्च न्यायालय (संग्रहित छायाचित्र)Image Credit source: tv9
| Updated on: Apr 18, 2022 | 2:05 PM
Share

मुंबई : पुण्यातील (Pune) दुहेरी हत्याकांडाच्या (Double murder) 12 वर्षांनंतर मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) मोठा निकाल दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने तब्बल 12 वर्षांनंतर चार जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. यापूर्वी या चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. प्रत्यक्षात या दुहेरी हत्याकांडात एकाचाही खून झाला नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आले. या हत्येप्रकरणी चारही आरोपींना ट्रायल कोर्टाने 2015मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. पुणे दुहेरी हत्याकांडातील चार जणांची निर्दोष मुक्तता न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती पी. के. चव्हाण यांच्या खंडपीठाने केली. यापैकी तिघे कोविड-19 आपत्कालीन परिस्थितीत पॅरोल मिळेपर्यंत दशकाहून अधिक काळ तुरुंगात होते. तर चौथा खटल्यादरम्यान 2015मध्ये जामीन मिळवण्यात यशस्वी झाला, त्याने आणीबाणी पॅरोल मिळण्यापूर्वी पाच वर्षांची शिक्षा भोगली.

तपासले 18 साक्षीदार

अतिरिक्त सरकारी वकील वीरा शिंदे यांनी 2016मध्ये चार मजुरांनी त्यांच्या शिक्षेविरुद्ध दाखल केलेले अपील फेटाळण्याची मागणी करताना सांगितले, की मार्च 2010मध्ये दोन पीडित महिला आणि त्यांचा मित्र जेवणाच्या गाडीवर उभे असताना त्यांच्यावर तलवारी आणि दगडांनी हल्ला करण्यात आला. दोघांनाही रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला. नंतर, पोलिसांनी कथित हल्लेखोरांना अटक केली, ज्यात चार मजुरांचा समावेश होता. त्यापैकी दोन 20 वर्षांचे होते आणि दोन 24 वर्षांचे होते. पुणे न्यायालयात खटल्यादरम्यान, 18 साक्षीदार तपासले गेले आणि सात आरोपींवर खटला चालवला गेला. डिसेंबर 2015मध्ये चौघांना हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आणि तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

आणखी वाचा :

Mumbai Police Social Posts : धार्मिक, जातीय पोस्ट टाकण्यापूर्वी तीनदा विचार करा, मुंबई पोलिसांची सोशल लॅब अॅक्शन मोडमध्ये, थेट पोलीस कारवाई

Pimpri Chinchwad crime : आठ वर्षाच्या चिमुरड्याच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून! पिंपरी चिंचवडच्या चिखलीतली हृदयद्रावक घटना

Ganesh Naik: भाजप आमदार गणेश नाईकांवर बलात्काराचा गुन्हा, नेरुळ पोलिसांकडून गुन्हा दाखल

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.