AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune water supply : पुणेकरांनो, ‘हे’ चार दिवस ‘पाणीबाणी’ नाही, सुरळीत राहणार पाणीपुरवठा, वाचा सविस्तर…

आषाढी एकादशी आणि बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कोणतीही समस्या किंवा गैरसोय होवू नये, म्हणून महापालिकेने पाण्याचा पुरवठा सुरळीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

Pune water supply : पुणेकरांनो, 'हे' चार दिवस 'पाणीबाणी' नाही, सुरळीत राहणार पाणीपुरवठा, वाचा सविस्तर...
संग्रहित छायाचित्रImage Credit source: tv9
| Updated on: Jul 06, 2022 | 7:13 PM
Share

पुणे : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी… आषाढी एकादशी आणि बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात तीन दिवस पाणीकपात (Water cut) रद्द करण्यात आली आहे. 8 ते 11 जुलै दरम्यान शहरात दररोज पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यानंतर धरणातील पाणीसाठा लक्षात घेऊन पाणीकपातीच्या संदर्भात पुढील निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिली आहे. नुकताच पाणीकपात करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी असल्याने आगामी काळात पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, याकरिता हा निर्णय घेण्यात आला होता. आता 4 जुलैपासून ते 11 जुलैपर्यंतचे वेळापत्रकही महापालिकेने ठरवले होते. मात्र रविवारी (ता. 10) आषाढी एकादशी तसेच बकरी ईद असल्यामुळे शुक्रवार, शनिवार आणि रविवारी पाणीकपात होणार नाही.

पाण्याच्या समस्येने पुणेकर त्रस्त

यंदाच्या उन्हाळ्यात पुणेकरांना पाण्याच्या टंचाईने हैराण केले होते. महापालिकेच्या देखभाल, दुरुस्तीच्या कामांवरही संताप व्यक्त केला होता. दर आठवड्याला नेमकी कसली देखभाल आणि दुरुस्तीची कामे केली जातात, असा संताप पुणेकर व्यक्त करत होते. त्यात मान्सूननेही विलंब केला. त्यामुळे पाणीटंचाईत अधिकच भर पडली. तर महापालिकेने पाऊस कमी पडल्याचे कारण सांगून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे जाहीर केले. अधिक पाऊस झाल्यानंतर या निर्णयात बदल करण्यात येणार होता. दोन दिवसांपूर्वी मोसमातला चांगला पाऊस पुण्यात झाला. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट लवकरच दूर होईल, अशी पुणेकरांना अपेक्षा आहे.

pmc water

नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून…

आषाढी एकादशी आणि बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कोणतीही समस्या किंवा गैरसोय होवू नये, म्हणून महापालिकेने पाण्याचा पुरवठा सुरळीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर म्हणजेच 11 जुलैपासून पाणीपुरवठ्याचे नवे वेळापत्रक जारी केले जाणार आहे. दरम्यान, कालच पुणे वेधशाळेने पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. साधारण 6 जुलै म्हणजे आज ते 8 जुलैदरम्यान हा मुसळधार पाऊस होणार आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याची महापालिकेला आशा आहे.

भाजप पक्ष नाही, छळ छावणी! त्याचे बळी दादा; संजय राऊतांची विखारी टीका
भाजप पक्ष नाही, छळ छावणी! त्याचे बळी दादा; संजय राऊतांची विखारी टीका.
अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, तूर पिकांचे नुकसान; शेतकरी हवालदिल
अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, तूर पिकांचे नुकसान; शेतकरी हवालदिल.
अवकाळी पावसाचा गहू, हरभरा,ज्वारी पिकांना फटका! शेतकऱ्याचे मोठे नुकसान
अवकाळी पावसाचा गहू, हरभरा,ज्वारी पिकांना फटका! शेतकऱ्याचे मोठे नुकसान.
कांद्याचे भाव घसरले; उत्पादन खर्चही निघेना! शेतकरी हवालदिल
कांद्याचे भाव घसरले; उत्पादन खर्चही निघेना! शेतकरी हवालदिल.
छप्पर उडालं, संसार उघड्यावर आले! महिलांच्या डोळ्यांतील अश्रू थांबेना
छप्पर उडालं, संसार उघड्यावर आले! महिलांच्या डोळ्यांतील अश्रू थांबेना.
रांचीहून दिल्लीला जाणाऱ्या एअर अँब्युलन्सचा अपघात! 7 जणांचा मृत्यू
रांचीहून दिल्लीला जाणाऱ्या एअर अँब्युलन्सचा अपघात! 7 जणांचा मृत्यू.
भाजपकडे हिंदू-मुस्लिमशिवाय कोणताही विचार नाही, संजय राऊतांचा घणाघात
भाजपकडे हिंदू-मुस्लिमशिवाय कोणताही विचार नाही, संजय राऊतांचा घणाघात.
दुश्मन न करे दोस्त ने वो...! दादांच्या आठवणीनं जयंत पाटील भावूक
दुश्मन न करे दोस्त ने वो...! दादांच्या आठवणीनं जयंत पाटील भावूक.
काळंबेरं झाल्यास सरकार अडचणीत! रोहित पवारांचा पुन्हा इशारा
काळंबेरं झाल्यास सरकार अडचणीत! रोहित पवारांचा पुन्हा इशारा.
शिवरायांच्या पुतळ्यावरुन वाद चिखला गावात संचारबंदी !
शिवरायांच्या पुतळ्यावरुन वाद चिखला गावात संचारबंदी !.