AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खासदार सुप्रिया सुळे म्हणतात, बच्चू कडू संवेदनशील राजकारणी, कारण काय?

कोणी आंदोलन कसं करावं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो.

खासदार सुप्रिया सुळे म्हणतात, बच्चू कडू संवेदनशील राजकारणी, कारण काय?
सुप्रिया सुळे
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Oct 27, 2022 | 3:47 PM
Share

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, मुलीच्या आवाजातली एक क्लीप माझ्याकडं आली. ही क्लीप फार वेदनादायी होती. इतरांना हा व्हिडीओ दाखवा, असं त्यात म्हटलं होतं. शेतकरी किती अडचणीत आहे, हे दाखविणारा हा व्हिडीओ होता. कोविडच्या काळात सगळे लोकं लॉकडाऊनमध्ये होते. एक व्यक्ती सातत्यानं बांधावर काम करत होती, ती म्हणजे या बांधावरला शेतकरी. कोविड काळात अनेक गोष्टी कमी पडल्या. पण, अन्न अजिबात कमी पडलं नाही. यांचं श्रेय काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्याला जातं.

कोणी आंदोलन कसं करावं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. पण, आंदोलन कोण कसा करणार, याच्यावर टीका होत असेल तर हे दुर्दैवी आहे. वास्तवतेपासून किती दूर असणारे लोकं आहेत, हेच यातून आपल्याला दिसते, असंही त्यांनी सांगितलं.

जे वाचतो, ऐकतो, त्यातून समाजात चर्चा होते. बच्चू कडू हे संवेदनशील नेते आहेत. 50 खोकेचा आरोप झाला. मंत्री म्हणाले, तुम्हाला 50 खोके हवे आहेत, का. यावरून ही ऑफर आली असावी, असा अंदाज येतो. त्यामुळं लोकांच्या मनात याबाबत शंका आली असावी. त्यामुळं सातत्यानं 50 खोकेची चर्चा होते.

गाव, वाडी, वस्तीवर ही चर्चा व्हायला लागली. त्यामुळं ते म्हणतात, ताई हे बघा, हे 50 खोकेवाले आहेत. ही गाव, वाडी, वस्तीपर्यंत पोहचलेली गोष्ट आहे. या राज्यात कोणीतरी सत्तेत असलेलं संवेदनशील आहे, याचा मला आनंद होत असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

बच्चू कडू यांचं आभार मानते. त्यांनी आरोग्यामध्ये अपंगांसाठी प्रचंड काम केलं. त्यांच्या वेदना त्यांचा संवेदनशीलपणा हा त्यातून दिसून येतो. कोणीतही संवेदनशील राजकारणी या राज्यात आहेत. तेही सत्तेतले आहेत.

असंवेदनशील सरकार आहे. मंत्रालयात येऊन आढावा घेतला जावा. मंत्रिमंडळाच्या बैठका किती झाल्या. किती दिवस हे सरकार मंत्रालयात होतं. जिल्ह्याधिकाऱ्यांचा किती वेळा रिव्हीव्ह घेतला गेला. दादा पुण्याचे पालकमंत्री असताना ते दर शुक्रवारी सकाळी सात वाजता मिटिंग घ्यायचे. अशाप्रकारे मिटिंग होताना मला कुठं दिसत नाही.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.