AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बैलगाडा शर्यत सुरु होती, इतक्यात पाऊस आला अन् किंकाळ्या उडाल्या, काय घडलं नेमकं?

बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी प्रेक्षकांनी एकच गर्दी केली होती. मात्र शर्यत सुरु असतानाच अचानक मुसळधार पाऊस कोसळायला सुरु झाली. मग पावसापासून बचाव करण्यासाठी प्रेक्षकांची तारांबळ उडाली.

बैलगाडा शर्यत सुरु होती, इतक्यात पाऊस आला अन् किंकाळ्या उडाल्या, काय घडलं नेमकं?
बैलगाडा शर्यतीदरम्यान स्टँड कोसळून एक ठारImage Credit source: tv9
| Updated on: Jun 05, 2023 | 1:33 PM
Share

पुणे : बैलगाडा शर्यतीमध्ये उभारलेले प्रेक्षकांचे स्टॅन्ड कोसळून एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी झाल्याची घटना पुण्याजवळील वडकी येथे घडली. वडकी या ठिकाणी काल बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आलं होतं. मात्र अचानक झालेल्या पावसामुळे शर्यत रद्द करण्यात आली. अचानक आलेल्या पावसामुळे प्रेक्षकांची तारांबळ उडाली आणि दरम्यान बसण्यासाठी लावण्यात आलेले बेंच कोसळले. स्टँडला लोखंडी पाऱ्यांचे रिल लावले होते आणि मोकळ्या मैदानात लावल्यामुळे ते रेलिंग खचले. घटनेत जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान बाळासाहेब कोळी यांचे निधन झाले. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बाळासाहेब हे सातारा जिल्ह्यातील निनम पाडळी गावातील रहिवासी आहेत. जखमींपैकी शुभम विजय लोखंडे आणि मयूर प्रसाद लोखंडे हे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील शेतकरी आहेत. तर अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील विकास वाल्मिक ढमाले असे जखमी झालेल्या तिसऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

काय घडले नेमके?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अचानक पाऊस आल्याने काही प्रेक्षखांनी पावसापासून बचाव करण्यासाठी स्टँडखाली आसरा घेतला होता. मात्र मुसळधार पावसामुळे स्टँडखालील माती सैल झाली होती. त्यामुळे तो स्टँड खाली उभ्या असलेल्या प्रेक्षकांवर कोसळला. अपघाताची माहिती मिळताच पुणे शहर पोलिसांतर्गत लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चौघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. बाळासाहेब कोळी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, अन्य तीन जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी सांगितले.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.