AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pimpri-Chinchwad : पवना धरणात केवळ 30 टक्के पाणीसाठा शिल्लक ; नागरिकांनो पाणी जपून वापरा

यंदा उन्हाळा तीव्र असल्याने, नागरिकांचा पाण्याचा वापर वाढला आहे. पाण्याची मागणीही अधिक असल्याने धरणातील पाण्याच्या साठ्यामध्ये घट झाली आहे. जूनमध्ये पाऊस उशीरा आल्यास पाण्याच्या काही प्रमाणात तुटवडा निर्माण होवू शकतो, त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा.

Pimpri-Chinchwad : पवना धरणात केवळ 30 टक्के पाणीसाठा शिल्लक ; नागरिकांनो पाणी जपून वापरा
Image Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: May 17, 2022 | 9:03 AM
Share

पुणे- यंदा उष्णतेच्या झळा तीव्र झाल्याने पवना धरणांमधील (Pavana dam) पाण्याची मागणी वाढलीय आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. पिंपरी चिंचवड(Pimpri-Chinchwad) शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात केवळ 30 टक्के पाणीसाठा उरला आहे. गतवर्षीपेक्षा 6 टक्के कमी पाणी कमी झाले असून, जून अखेरपर्यंत पाणी पुरेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे . आजमितीला धरणात 30.75 टक्के पाणीसाठा असून गेल्या वर्षीच्या तुलनेत तो 6 टक्क्यांनी कमी आहे. हा पाणीसाठा जून अखेरपर्यंत पुरेल. परंतु, पावसाने (Rain)ओढ दिल्यास पाणी टंचाई जाणवू शकते. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाकडून केले जात आहे.

नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा

पवना धरणात सद्य स्थितीला केवळ 30.75 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी या अखेर 36.65 टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक होता. यावर्षी तब्ब्ल 6 टक्के पाणीसाठा कमी झाला आहे. यंदा उन्हाळा तीव्र असल्याने, नागरिकांचा पाण्याचा वापर वाढला आहे. पाण्याची मागणीही अधिक असल्याने धरणातील पाण्याच्या साठ्यामध्ये घट झाली आहे. जूनमध्ये पाऊस उशीरा आल्यास पाण्याच्या काही प्रमाणात तुटवडा निर्माण होवू शकतो, त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन पवना धरणाचे शाखा अभियंता सामीर मोरे यांनी केले आहे.

पाणीसाठा झपाट्याने कमी होईल

पवना धरणातून पिंपरी चिंचवडसह नजीकच्या विविध गावात पाण्याचा पुरवठा केला जातो. हे  धरणच या गावांसाठी पाण्याचा मुख्य स्रोत आहे. सद्यस्थितीला मागणनुसार या गावांना धरणातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र येत्या काही काळात पाण्याची मागणी वाढली तर धरणातीला पाणीसाठा झपाट्याने कमी होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पिंपरी मावळ येथील शेतीसाठी ही याच पाण्याचा वापर केला जाण्याची शक्यता असते.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.