AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अदानी यांच्या मागे मोदी नावाची शक्ती आहे काय?; ‘त्या’ घोषणेनंतर संजय राऊत यांचा सवाल

किती वेळा त्याच त्या गोष्टी सांगणार? काँग्रेसने आणीबाणी आणली म्हणून तुम्ही आणणार आहात का? काँग्रेसने सरकारे पाडली म्हणून तुम्ही पाडणार आहात का? तुमचं काय ते बोला.

अदानी यांच्या मागे मोदी नावाची शक्ती आहे काय?; 'त्या' घोषणेनंतर संजय राऊत यांचा सवाल
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 10, 2023 | 11:51 AM
Share

निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: अदानी समूहाच्या घोटाळ्यावरून विरोधकांनी गेल्या दोन दिवसांपासून संसद दणाणून सोडली आहे. अदानी घोटाळ्यावर पंतप्रधानांनी उत्तर दिलं पाहिजे अशी मागणी विरोधक करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा आणि राज्यसभेत राष्ट्रपतींच्या भाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर भाषण केलं. पण त्यात त्यांनी अदानी घोटाळ्याचा उल्लेख केला नाही. त्यामुळे विरोधक अधिकच संतापले. विरोधकांनी दोन्ही सभागृहात मोदी यांच्या भाषणावेळी गोंधळ घातला. आता या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. अदानीच्या मागे मोदी नावाची शक्ती आहे काय? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

अदानी मुद्द्यावरून मोदी मौन आहेत. ते उत्तरं देत नाहीत. विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात पंतप्रधानांसमोर गोंधळ घातला. त्यांचं भाषण होऊ दिलं नाही. पण पंतप्रधान बोलतच होते. विरोधी पक्षाने प्रश्न उपस्थित केले. त्यावर मोदींनी उत्तर का दिलं नाही? राहुल गांधींसह विरोधकांनी प्रश्न सोपे विचारले होते. प्रश्नपत्रिका सोपी होती. त्याचे उत्तर का दिलं नाही? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

भाजप एक्सपोज होतेय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरू होतं. त्यावेळी अदानीच्या मागे कोणती शक्ती आहे? असा सवाल विरोधकांनी केला. तेव्हा सत्ताधारी बाकावरून मोदी मोदी गर्जना होत होत्या. त्यामुळे अदानी नावामागे मोदी ही शक्ती आहे का? म्हणजे ते आपोआपच एक्सपोज होत आहेत, असा टोला राऊत यांनी लगावला.

मोदी कठिण प्रश्नांची उत्तरे देतात

राहुल गांधी यांनी प्रश्न विचारला की, किती वेळा मोदी आणि अदानी परदेशात गेले? त्याचं उत्तर सोपं होतं. मोदी उत्तर देऊ शकले असते. त्यांनी उत्तर द्यायला हवं होतं. सोपं उत्तर होतं. मोदी कठीण प्रश्नांची उत्तरे देत असतात. जी उत्तरं सुटतात त्याचीच उत्तरे देतात, असा चिमटा त्यांनी काढला.

तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात

अदानी प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीच्या माध्यमातून चौकशी व्हावी, ही विरोधकांची मागणी आहे. आमचीही तीच मागणी आहे. अदानी संदर्भात जे प्रश्न उपस्थित केले त्याचे उत्तर द्यावे. तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात. तुम्ही एका पक्षाचे नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

किती वेळा तेच ते बोलणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस काळातील कारभारावर बोलत होते. त्यावरही राऊत यांनी टीका केली. किती वेळा त्याच त्या गोष्टी सांगणार? काँग्रेसने आणीबाणी आणली म्हणून तुम्ही आणणार आहात का? काँग्रेसने सरकारे पाडली म्हणून तुम्ही पाडणार आहात का? तुमचं काय ते बोला. इतरांचं काय बोलता? असा सवाल त्यांनी केला.

बच्चू कडू प्रवेश करणार आहेत काय?

येत्या काळात महाविकास आघाडीचे 15-20 आमदार भाजपमध्ये येणार असल्याचा गौप्यस्फोट बच्चू कडू यांनी केला होता. त्यावरही राऊत यांनी उत्तर दिलं. बच्चू कडू हे स्वत: भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत का? बहुतेक भाजपचे आमदार प्रवेश करणार असतील. बच्चू कडू बोलतात ते बरोबर आहे, असा टोला त्यांनी लगावला.

गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती.
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य.
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?.
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.