AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे शहरात रिंगरोड झाल्यावर काय होणार? अजित पवार यांनी दिली माहिती

Pune Ring Road : पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेसाठी मेगा प्रकल्प सुरु आहे. मेट्रो प्रकल्प झाला आहे. नवीन मार्गही होत आहे. तसेच आता पुण्यात रिंगरोडसुद्धा होणार आहे. पुण्यातील वाहतूक कोडी यामुळे सुटणार आहे.

पुणे शहरात रिंगरोड झाल्यावर काय होणार? अजित पवार यांनी दिली माहिती
ajit pawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 28, 2023 | 10:53 AM
Share

योगेश बोरसे, पुणे | 28 ऑगस्ट 2023 : पुणे शहरातील वाहतूक कोडींचा चर्चा नेहमीच होत असते. पुणे शहरात देशात सर्वाधिक वाहने आहेत. यामुळे रस्ते अपूर्ण ठरतात. वाहतूक कोंडी हा प्रश्न हा गंभीर झाला आहे. यामुळे पुण्यात आठ ते दहा किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी तासभरचा वेळ लागतो. यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याचे काम वेगाने सुरु आहे. पुण्यात 27 हजार कोटींचा रिंग रोड प्रकल्पास सुरुवात होणार आहे. हा रिंग रोड झाल्यावर काय होणार आहे, याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

रिंगरोडचा काय परिणाम होणार

पुणे शहरासाठी रिंग रोड प्रकल्पाचे काम आता सुरु होणार आहे. हा रिंगरोड 170 किलोमीटरचा आहे. या रिंगरोडचे काम पूर्ण झाल्यावर बाहेरील वाहने शहरात येणार नाही. अनेकांना पुणे शहरात येण्याची गरज पडणार नाही. यामुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. मी पण शेतकरी आहे, कुणाची शेती किंवा घर जाऊ नये, अशीच माझी भूमिका आहे. परंतु सार्वजनिक प्रकल्पांसाठी जमिनीचे संपादन करणे गरजे आहे.

आता दर आठवड्याला बैठक

पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या समस्या सोडवण्यासाठी दर आठवड्याला बैठक घेण्याचा निर्णय अजित पवार यांनी जाहीर केला. अधिकाऱ्यांनी आपली कामे चोख करावी. त्यासाठी त्यांना कुणाला विचारण्याची गरज नसणार आहे, फक्त कामे झाली पाहिजे, अशी रोखठोक भूमिका अजित पवार यांनी मांडली. जर अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक काही चुका केल्या तर त्यांची खैर नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. यासाठी कुणाची गय केली जाणार नाही.

मनपा निवडणुका का रखडल्या

राज्यात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहे. यासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असल्यामुळे निवडणुका लागल्या नाहीत, असे अजित पवार यांनी म्हटले. आपण आता याठिकाणी राजकीय विषयावर बोलणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.