AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात थंडीची चाहूल, तीन दिवसांत हुडहुडी वाढणार

weather update in maharashtra | राज्यात आता कडक्याची थंडी सुरु होणार आहे. राज्यात आणि देशात थंडी वाढणार आहे. सध्या मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील इतर भागात गारवा वाढला आहे. पुणे, मुंबई शहरातील तापमान घसरले आहे. येत्या तीन दिवसांत थंडी अधिक वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

राज्यात थंडीची चाहूल, तीन दिवसांत हुडहुडी वाढणार
| Updated on: Nov 20, 2023 | 9:19 AM
Share

पुणे, दि. 20 नोव्हेंबर | देशातील अनेक भागात परिस्थिती बदलली आहे. देशातील काही भागांत थंडी वाढली आहे. थंडीचा हा जोर आता महाराष्ट्रात असणार आहे. येत्या गुरुवारपासून राज्यात आग्नेयकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढेल. या वाऱ्यांसह बाष्पयुक्त वारे महाराष्ट्रात येणार आहे. त्यामुळे दक्षिण महाराष्ट्रात थंडी वाढणार आहे. राज्याच्या काही भागांत थंडीची चाहूल जाणवू लागली आहे. तसेच पुढील तीन दिवस किमान तापमानात घटीचा अंदाज पुणे हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांत अजून फारशी थंडी पडली नाही. परंतु आता थंडीचा जोर वाढणार आहे. राज्यात सर्वात कमी तापमान गोंदियात नोंदवण्यात आले.

दोन ते तीन अंश सेल्सिअस तापमान घटणार

राज्यात सध्या कोरडे वातावरण असून पुढील तीन दिवस तापमान आणखी कमी होणार आहे. राज्यातील बहुतेक भागांत किमान तापमानात घट होणार आहे. तापमानातील ही घट सरासरी दोन ते तीन अंश सेल्सिअसने असणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यावर सध्या कोणतीही हवामानविषयक परिस्थिती सक्रीय नाही. राज्यभरात सध्या कोरडे हवामान आहे. त्यामुळे गुरुवारपर्यंत किमान तापमानात घट होण्याचा कल कायम असणार आहे.

विदर्भात गारठा वाढणार

विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारठा जाणवणार आहे. राज्यात रविवारी सर्वांत कमी तापमान गोंदियात नोंदवण्यात आले. गोंदियात १५.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. पुणे शहरातील तापमान १६.९ अंश सेल्सियस होते. मुंबईत २४ अंश सेल्सिअस तापमान होते. दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण होण्याचा अंदाज आहे. अनेक ठिकाणी पहाटे धुके पडण्याचा अंदाज आहे.

अंडी महागण्याची शक्यता

मुंबईत थंडीच्या दिवसांत अंडी महगण्याची शक्यता आहे. ५ रुपयाचे अंडे ७ रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. कुक्कुटपालनाचा खर्च वाढल्यामुळे प्रती अंडे २ रुपये वाढण्याची शक्यता आहे. अंड्याचे दर वाढल्यास सर्वसामान्यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

नंदुरबार जिल्ह्यात तापमान घटले

दिवाळीनंतर नंदुरबार जिल्ह्यात तापमानात घटले आहे. जिल्ह्यात सपाटी भागात तापमान १९ अंश सेल्सिअस पर्यंत खाली आले आहे. सातपुड्याचा दुर्गम भागात हे तापमान १५°c पर्यंत असल्याने जिल्ह्यात सकाळी कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. येत्या काही दिवसांत तापमान अजून घसरणार असल्याची शक्यता हवामान खात्याच्या वतीने व्यक्त केली गेली आहे. वातावरणातील गारठा रब्बी हंगामासाठी चांगला आहे.

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....