AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसाचे संकट कायम, पुढील तीन दिवस पुणे जिल्ह्यात यलो अलर्ट जारी, राज्यात कुठे पडणार पाऊस

राज्यात अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. पुढील चार दिवस राज्यात अवकाळी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यापूर्वी मार्च महिना अवकाळी पावसात गेला. या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

पावसाचे संकट कायम, पुढील तीन दिवस पुणे जिल्ह्यात यलो अलर्ट जारी, राज्यात कुठे पडणार पाऊस
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Apr 07, 2023 | 8:27 AM
Share

अभिजित पोते, पुणे : एकीकडे राज्यात तापमान वाढत आहे. पुणे व राज्यातील इतर अनेक शहरांचे तापमान 40 अशांवर गेले आहे. दुसरीकडे राज्यात अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. पुढील चार दिवस राज्यात अवकाळी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. आता एप्रिलमध्येही पावसाचे संकट कायम आहे. हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के.एस.होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे.

कुठे पडणार पाऊस

ढगाळ वातावरण व अवकाळी पाऊस असतानाही पुणे शहरातील तापमान वाढल्यानं वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. पुणे शहरात व जिल्ह्यांत 7, 8, 9 तारखेला विजांच्या कडकडासह शहरात हलक्या पावसाची शक्यता आहे. 6 तारखेला सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यात विजांच्या कडकटासह अवकाळी पाऊस पडणार आहे. त्यानंतर 7, 8 आणि 9 तारखेलाही राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडणार आहे.

का पडतोय पाऊस

बंगालच्या उपसागरातून बाष्प वाहत असल्यामुळे हा पाऊस पडणार आहे. पुढील तीन-चार दिवस पुणे शहरासह राज्यातील काही भागात पावसाचा इशारा यामुळे दिला आहे.

अनेक ठिकाणी पारा चाळिशीच्या पार

फेब्रुवारीनंतर प्रथमच पुणे जिल्ह्याचा पारा एप्रिलमध्ये चाळिशीच्या पार गेला आहे. राज्यातील अनेक शहराचे तापमान चाळीस अशांवर गेले आहे. राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूरचे 40.4 आहे. त्यानंतर सर्वाधिक तापमान शिरूरमध्ये 40.2 अंश नोंदविले गेले. बुधवारी संपूर्ण पुणे जिल्ह्याचे सरासरी कमाल तापमान 37 ते 40 अंशांवर होते. यंदा संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात पुणे जिल्हा राज्यात बहुतांश वेळा तापमानात आघाडीवर होता.

देशाच्या जेडीपीमध्ये 17 टक्के वाटा शेतीचा

देशातील निम्म्याहून अधिक जनतेचा उदरनिर्वाह हा शेती व्यवसायावर अवलंबून आहे. परंतु अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे शेतीचे नुकसान होत आहे. शेतीच्या नुकसानीमुळे इतर उद्योगधंदे देखील अप्रत्यक्षरीत्या प्रभावित होत असतात. शेती क्षेत्रातील कोणताही घटक असो त्यावर पावसाचा प्रभाव कायम राहिलेला आहे. शेतीच्या उत्पदनात वाढ होण्यासाठी मान्सून सामान्य किंवा सामान्यापेक्षा अधिक असणे गरजेचे आहे.

पुण्याच्या भोर तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली, संध्याकाळच्या सुमारास अचानक आलेल्या अवकाळी पावसानं, काही गावांना चांगलच झोडपून काढलं.साधारण अर्धा तास पडलेल्या मुसळधार पावसानं आजूबाजूच्या परिसरात पाणीच पाणी झाले होते. यावेळी नागरिकांची पावसानं मोठी तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी काढणीला आलेल्या ज्वारी, गहू, हरभरा पिकाला याचा फटका बसला आहे.

हे ही वाचा

पुणे पारा वाढला, एकीकडे ऊन तापले, दुसरीकडे राज्यात पावसाचा अंदाज

Follow Us
स्टुडंट, इडियट, अंधभक्त... राहुल गांधींच्या वक्तव्याने सभागृहात गदारोळ
Rahul Gandhi | स्टुडंट, इडियट, अंधभक्त... राहुल गांधींच्या एका वक्तव्याने सभागृहात प्रचंड गदारोळ
कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
Photo | कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय...
Manoj Jarange Patil | एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय त्यांनी 28 ऑगस्टला अंतरवालीला या; जरांगेंनी पुन्हा फुंकलं आंदोलनाचं रणशिंग
पालिकेची लूटमार सुरू? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर पेडणेकर आक्रमक
Kishori Pednekar | पालिकेची लूटमार सुरू आहे का? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर किशोरी पेडणेकर आक्रमक
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... भाजप नेता काय म्हणाला?
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांवर भाजप नेत्याने घेरलं
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर...
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर... मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह; दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
Solapur | अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्साह; स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील...
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील FIR... पुन्हा प्रकरण पेटलं
16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
कर्जमाफीत मोठा बदल! 16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्र्यांची मोठी गुड न्यूज
Dattatray Bharne | 84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्री दत्ता भरणेंची शेतकऱ्यांना मोठी गुड न्यूज, म्हणाले...