AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात असं काय घडलं? प्रचाराची रणधुमाळी संपली, मतदान तोंडावर, पण उमेदवाराची थेट पोटनिवडणूक रद्द करण्याची मागणी

पुण्यातील राजकीय घडामोडी थांबायचं काही नावच घेत नाहीय. पुण्यात कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे.

पुण्यात असं काय घडलं? प्रचाराची रणधुमाळी संपली, मतदान तोंडावर, पण उमेदवाराची थेट पोटनिवडणूक रद्द करण्याची मागणी
| Edited By: | Updated on: Feb 25, 2023 | 6:07 PM
Share

पुणे : पुण्यातील राजकीय घडामोडी थांबायचं काही नावच घेत नाहीय. पुण्यात कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. या पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्यापासून ते प्रचारापर्यंत आणि प्रचाराची मुदत संपल्यानंतरही घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी गंभीर आरोप केलाय. भाजपचे नेते आणि पदाधिकारी पोलिसांच्या समोर पैसे वाटत असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला. या आरोपांवरुन त्यांनी आज उपोषण देखील केलं. त्यांच्या या आरोपांवरुन अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukle) यांनी ही पोटनिवडणूक थेट रद्द करण्याची मागणी केलीय.

अभिजीत बिचुकले यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली. “काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सकाळी कसबा गणपतीसमोर आंदोलन केलं. मी ते आंदोलन सोशल मीडिया आणि टीव्हीच्या माध्यमातून बघत होतो. ते म्हणत आहेत की, भाजपच्या उमेदवाराकडून पैसे वाटप करण्यात आले. ते त्याचे व्हिडीओ दाखवत आहेत. या तक्रारीवर प्रशासन का काम करत नाहीय?”, असा सवाल बिचुकले यांनी केला.

“मला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सांगायचं आहे की, निवडणूक आयोगाचे कॅमेरेमन मला कुठेही फिरताना दिसले नाहीत. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत कॅमेरेमन असतात. पण त्यांचे कॅमेरेमन मला दिसले नाहीत. इथले निवडणूक निर्णय अधिकारी हे राजकीय नेत्यांच्या साथीला आहेत असं समजावं?”, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

भाजपचं शिष्टमंडळ धंगेकरांच्या विरोधात पोलीस ठाण्यात

दुसरीकडे रवींद्र धंगेकर यांनी केलेल्या आरोपांनंतर भाजपदेखील आक्रमक झालीय. भाजप नेत्यांनी पोलीस आयुक्तालयात जाऊन धंगेकरांची तक्रार केलीय. रवींद्र धंगेकर यांनी प्रचाराची वेळ संपलेली असताना खोटे आरोप करत आंदोलनाच्या माध्यमातून निवडणुकीचा प्रचार केला. त्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी. त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने पुणे पोलीस आयुक्तांकडे केली.

“काल पाच वाजता प्रचाराचा वेळ संपला. पण तरीही केवळ उपोषणाचा बनाव करुन एकप्रकारे निवडणुकीचा प्रचार करण्यात आला. महाविकास आघाडीच्या उमेदवारावर कारवाई झाली पाहिजे. निवडणूक अर्ज रद्द झाला पाहिजे. त्यासाठी आम्ही निवडणूक आयोगाकडे जाऊन तक्रार करणार आहोत”, अशी प्रतिक्रिया भाजपच्या शिष्टमंडळाने दिली. भाजप शिष्टमंडळाने याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडेदेखील तक्रार केलीय. त्यामुळे आता हे प्रकरण कुठपर्यंत जातं ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.