AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे बस अपघातानंतर प्रशासन अलर्ट मोडवर, चौकशी समिती केली तयार

pune bangalore highway bus accident : मुंबई-पुणे महामार्गावरील अपघाताला दोन दिवस होत नाही तोपर्यंत पुन्हा एक गंभीर अपघात झाला आहे. खासगी बसच्या झालेल्या या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. आता या प्रकरणी समिती स्थापन केलीय.

पुणे बस अपघातानंतर प्रशासन अलर्ट मोडवर, चौकशी समिती केली तयार
road accidentImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 23, 2023 | 2:28 PM
Share

योगेश बोरसे, पुणे : कोल्हापूरवरुन मुंबईला जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल बसला मध्यरात्री पुणे शहरातली कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर 22 जण गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण अपघातात ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला. अपघातातील मृत्यू झालेल्या चौघांचे मृतदेहही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आता प्रशासनानेही पावले उचलली आहे. या प्रकरणी चौकशी समिती स्थापन केली आहे. समितीच्या अहवालानंतर उपाययोजना करण्यात येणार आहे.

कसा झाला होता अपघात

कोल्हापूरहुन मुंबईकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसचा आणि मालवाहू ट्रकचा भीषण रात्री 2:15 च्या सुमारास झाला. मध्यरात्री सर्व प्रवासी गाढ झोपेत असतानाच पुणे-बेंगलोर महामार्गावरील जांभूळवाडी भागात हा भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यात दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. कात्रज बोगद्याजवळ झालेल्या या अपघातानंतर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. अपघातासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी चार सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीला अहवाल देण्याचे आदेश दिले आहे.

कोण आहे समितीत

खासगी ट्रॅव्हल बस कोल्हापूरवरुन डोंबिवलीला जात होती. नीता ट्रॅव्हल्सची ही बस होती. तर मालवाहतूक करणारा ट्रक कोल्हापूरवरुन अंबरनाथकडे जात होता. भरधाव असलेल्या मालवाहू ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने ट्रक थेट खासगी ट्रॅव्हल्सवर जाऊन आदळली. आता या प्रकरणी समिती स्थापन केली आहे. या समितीत पुणे परिवहन आयुक्त, बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग आणि वाहतूक शाखेचे अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

चौघांमध्ये दोन पुरुष, दोन महिला

अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. त्यात दोन महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. अपघातातील जखमी आणि मृत प्रवासी मुंबईचे होते की कोल्हापूरचे हे स्पष्ट झाले नाही. परंतु यानिमित्ताने पुन्हा एकदा खासगी ट्रॅव्हल्सच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आता समिती काय अहवाल देणार? याकडेही लक्ष लागले आहे.

अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच स्थानिक नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली. मात्र रात्रीचा अंधार असल्याने मदतकार्यात अडथळा येत होता.

हे ही वाचा

Video : तापमान वाढले अन् मुंबईतील AC लोकलची अशी कशी झाली अवस्था

Video | उन्हामुळे हैराण झालेल्या युवकाची भन्नाट आयडीया झाली व्हायरल

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.