AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतुकीची कोंडी, कशामुळे झाली एवढी ट्रॅफीक जाम?

Pune-Mumbai Expressway : पुणे-मुंबई महामार्गावर शुक्रवारी विचित्र अपघात झाला. यावेळी वाहतुकीची मोठी कोंडी झाली. महामार्गावरील वाहतूक कोंडीचा फटका हजारो वाहनधाराकांना बसला आहे. वाहतूक कोंडी तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतुकीची कोंडी, कशामुळे झाली एवढी ट्रॅफीक जाम?
traffic jam mumbai pune express way
| Updated on: May 12, 2023 | 9:36 AM
Share

पुणे : पुण्यात वाहतूक कोंडी (Pune Traffic Issue) ही एक गंभीर समस्या बनली आहे. पुण्यात जिथे जाल तिथे तुम्हाला वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरं जावं लागतं. पुण्याप्रमाणे पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर (Pune-Mumbai Expressway) वाहतूक कोंडी होत असते. शुक्रवारी पुन्हा मुंबई पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईकडे येणाऱ्या वाहनांची संख्या अचानकपणे वाढल्यानं वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र आहे. 3 ते 4 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पुण्यावरुन मुंबईला जाणारी मार्गिका विस्कळीत झाली आहे. त्यातच बोरघाटात सकाळी अपघातही झाला आहे.

कुठे झाली वाहतुकीची कोंडी

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे. मुंबईकडे येणाऱ्या वाहनांची संख्या अचानकपणे वाढल्यानं वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र आहे. या ठिकाणी वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. आता ही वाहतूक कोंडी फोडण्याचं आव्हान महामार्ग वाहतूक पोलिसांसमोर आहे. यासाठी पोलिसांना बोरघाटात तैनात करण्यात येत आहे.

बोरघाटात पाहाटे अपघात

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बोरघाटात पुन्हा एकदा ट्रकचा ब्रेकफेल झाला. यामुळे विचित्र अपघात झालाय. बोरघाट उतरत असताना ब्रेकफेल झाल्यानं चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ट्रक तिसऱ्या लेनवर पलटला. पहाटे चारच्या सुमारास खोपोली परिसरात हा अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. चालक आणि क्लिनर किरकोळ जखमी झाले आहेत. 27 एप्रिलला ट्रकचा असाच ब्रेकफेल झाल्यानेच विचित्र अपघात झाला होता.

मुंबईकडे येणाऱ्यांना त्रास

मुंबई-पुणे महामार्गावर अनेक लोक रोज मुंबईच्या दिशने प्रवास करत असतात. यामुळे आधीच या मार्गावर वाहतूक जास्त असते. त्यामध्ये मुंबई-पुणे महामार्गावर अपघात झाला आहे. यामुळे मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक कोलमडली आहे. तर याठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली निर्माण झाली आहे.

महामार्गावर अपघाताच्या घटना

मुंबई-पुणे महामार्गावर अनेक अपघाताच्या घटनाही घडतात. मागील आठवड्यात विचित्र अपघात झाला होता. एकूण अकरा वाहनं एकमेकांना धडकली आहेत. या अपघातानंतर एक चारचाकी तर अक्षरशः दुसऱ्या वाहनावर उभी आहे. खोपोली एक्झिटजवळ हा अपघात झाला होता.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.