AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातील रस्त्यांवर लागणार नाही विजेचा शॉक, पुणे मनपाने केला बदल

Pune News | पुणे महानगरपालिकेने महत्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. मनपाच्या या निर्णयामुळे विजेचे शॉक लागणार नाही. यामुळे लाख मोलाचे जीव वाचणार आहे. तसेच पुणे मनपाच्या खर्चातही बदल होणार आहे. या प्रकल्पावर काम सुरु झाले आहे.

पुण्यातील रस्त्यांवर लागणार नाही विजेचा शॉक, पुणे मनपाने केला बदल
pune mahanagarpalika
| Updated on: Jan 22, 2024 | 11:33 AM
Share

पुणे, दि.22 जानेवारी 2024 | पुणे शहर महानगरपालिकेने महत्वाचा बदल केला आहे. पुणे मनपाच्या या निर्णयामुळे आता रस्त्यांवर विजेचा धक्का बसणार नाही. पुणे महापालिकेने शहरात फायबर रिइन्फोर्स पॉलिमर म्हणजेच ‘शॉक प्रूफ’ विद्युत खांब बसविण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात मनापातर्फे एक हजार विद्युत खांब बसविण्यात येणार आहेत. त्यात म्हाळुंगे रस्ता, सूस या भागाचा समावेश आहे. यामुळे पावसाळ्यात विजेचा खाबांमध्ये विद्युत प्रवाह उतरुन मृत्यू टळणार आहे.

विद्युत खांब बदलण्याचा निर्णय

पावसाळ्यात विद्युत खांबांमध्ये विद्युत प्रवाह उतरत असतो. त्यामुळे रस्त्यावरुन जाणाऱ्या लोकांना विजेचा धक्का बसतो. त्यात मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच पतंग उडवताना मुलांचा विद्युत खांबांना स्पर्श होतो. या घटनेत विजेचा धक्का बसण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे विद्युत खांबांमध्ये बदल करण्याच्या हालचाली मनपा प्रशासनाकडून सुरु करण्यात आल्या. त्यानुसार सुरक्षित असलेले ‘एफआरपी’ शॉक प्रूफ विद्युत खांब बसवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्याची अंमलबजावणी सुरु केली जात आहे.

खर्च बचत अन् फायदेही

पुणे मनपातर्फे पहिल्या टप्प्यात एक हजार खांब बदलण्यात येणार आहे. जुने खांब काढून नवीन शॉक प्रूफ असलेले विद्युत खांब टाकले जाणार आहे. विशेष म्हणजे जुन्या विद्युत खांबांच्या तुलनेत नवीन एफआरपी खांब ५ ते १० टक्के स्वस्त आहेत. यामुळे नागरिकांचे लाख मोलाचे जीव वाचणार आहे. तसेच मनपाची बचत होणार आहे. एफआरपी विद्युत खांब मजबूत, पारदर्शी, कमी वजनाचे आहेत. या खांबांना गंज लागत नाही. यामुळे दीर्घकाळ ते टिकतात. आगीसारख्या घटनांचा या खांबांबर काहीच परिणाम होत नाही.

असा खर्चही वाचणार

महापालिकेला सध्याच्या विद्युत खांबाच्या अर्थिंग आणि देखभाल दुरुस्तीसाठी खर्च करावा लागतो. दरवर्षी पावसाळ्याआधी १० ते १५ लाख रुपयांचा खर्च होत असतो. परंतु आता नवीन ‘एफआरपी’ खांबाला अर्थिंगची गरज नाही. यामुळे दरवर्षी अर्थिंगच्या होणाऱ्या खर्चात बचत होणार आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.