AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

pune news | पिंपरी- चिंचवडमध्ये प्रशासक ‘राज’चा फटका, तीन दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत

pune pimpri chinchwad water supply | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये प्रशासक राज सुरु आहे. त्याचा फटका शहरातील नागरिकांना कसा बसत आहे, त्याचे उदाहरण समोर आले आहे. तीन दिवस पाणी नसल्याने नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरु आहे.

pune news | पिंपरी- चिंचवडमध्ये प्रशासक 'राज'चा फटका, तीन दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत
Pimpri ChinchwadImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 07, 2023 | 1:22 PM
Share

रणजित जाधव, पिंपरी चिंचवड | 7 ऑक्टोंबर 2023 : राज्यातील अनेक महानगरपालिका आणि नगरपरिषदेत प्रशासक ‘राज’ सुरु आहे. यामुळे जनतेच्या अनेक प्रश्नांवर सरकारी पद्धतीने काम होत आहे. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. पिंपरी चिंचवडमधील लाखो रहिवाशांना गेल्या तीन दिवसांपासून प्रशासक राजचा फटका बसत आहे. या परिसरात पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. परंतु मनपात जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी कोणीच नाही.

का झाला पाणीपुरवठा विस्कळीत

पिंपरी- चिंचवड शहरात गेल्या तीन दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. यामुळे या भागातील रहिवाशी हैराण झाले आहे. 5 ऑक्टोबर रोजी महानगरपालिका प्रशासनाने संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा कामासाठी बंद ठेवला होता. त्याचा परिणाम सहा रोजी होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर झाला. दोन दिवस पाणी नसताना तिसऱ्या दिवशी जास्त वेळ पाणीपुरवठा होईल, असे अपेक्षा नागरिकांना होती. परंतु सात ऑक्टोबरला पुन्हा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. यामुळे पिंपरी-चिंचवडमधील नागरिक हैराण झाले.

आधीच दिवसाआड पाणीपुरवठा आता त्यात भर

पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना आधीच दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. त्यातही पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेत प्रशासक राज असल्यामुळे नियोजनाचे तीन-तेरा वाजले आहे. गेल्या तीन दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील नागरीक पाण्याविना असताना दखल घेणारे कोणी नाही. पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेवर प्रशासक राज असल्याने मनमानी पद्धतीने कारभार सुरु आहे. अधिकाऱ्यांना जाब विचारायचा कुणी नाही किंवा उत्तरदायित्व घेण्यास कोणी नाही.

धरण ओव्हर फ्लो पण घरात पाणी नाही

पिंपरी- चिंचवड शहरला पवना धरणातून पाणी पुरवठा होता. यंदा कमी पाऊस झाला असला तरी पवना धरण भरले आहे. धरण ओव्हरफ्लो झाले असताना नागरिकांच्या घरात पाणी नाही. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मनपात प्रशासक राज नसते तर महापौर किंवा नगरसेवकांना जाब जनतेने विचारला असता. परंतु आता जनतेचे ऐकणारे कोणीच नसल्याने तोंडं दाबून बुक्यांचा मार नागरिकांना सहन करावा लागत असल्यासारखा प्रकार झाला आहे.

राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.