AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तू खूप सुंदर दिसतेस!; डिलिव्हरी बॉयने तरुणीसोबत नको ते केलं, कुटुंबीयांना कळताच…

पुण्यातील एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका डिलिव्हरी बॉयने पार्सल पोहोचवल्यानंतर तरुणीकडे पिण्यासाठी पाणी मागितले. त्यानंतर त्याने जे काही कृत्य केले ते पाहून पोलिसांनाही धक्का बसला.

तू खूप सुंदर दिसतेस!; डिलिव्हरी बॉयने तरुणीसोबत नको ते केलं, कुटुंबीयांना कळताच...
Delivery boyImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Mar 09, 2026 | 1:13 PM
Share

अनेकदा आपले काम सोपे करण्यासाठी ऑनलाइन पोर्टरचा वापर केला. मग ते काही गोष्टी खरेदी करण्यासाठी असो वा काही गोष्टी पोहोचवण्यासाठी असो. अनेकदा वापर केला जातो. शिवाजीनगर परिसरात ऑनलाइन डिलिव्हरी बॉयकडून एका तरुणीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोर्टर ॲपद्वारे सामान डिलिव्हर करण्यासाठी आलेल्या या डिलिव्हरी बॉयने पाण्याच्या बहाण्याने तरुणीची छेड काढली. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

घटना कशी घडली?

६ मार्च २०२६ रोजी संध्याकाळी सुमारे ५ वाजता ही घटना घडली. शिवाजीनगर भागातील एका तरुणीने पोर्टर ॲपवरून काही सामान ऑर्डर केले होते. डिलिव्हरी बॉय पार्सल घेऊन पोहोचला आणि तरुणीने दरवाजा उघडून पार्सल स्वीकारले. त्यानंतर डिलिव्हरी बॉयने तहान लागल्याचे सांगून पाण्याची मागणी केली. तरुणीने पाणी दिले, पण ग्लास घेताना त्याने तरुणीच्या हाताला स्पर्श केला आणि “तू खूप सुंदर दिसतेस” असे म्हणत अनुचित वर्तन केले. यावेळी तरुणीच्या घरी तिचे बाळ आणि सासूही उपस्थित होत्या. घडलेला प्रकार तरुणीने लगेच पतीला सांगितला आणि नंतर दोघेही थेट शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेले.

पोलिसांची कारवाई

तरुणीच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा (मोलेस्टेशन) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे नाव श्रीधर कांबळे (काही रिपोर्ट्सनुसार श्रीधर हरीभाऊ कांबळे, वय २७, रा. शुक्रवार पेठ, मूळ कराड) असे आहे. ॲपवरील डिटेल्स आणि सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. सध्या पोलिसांकडून संशयिताचा शोध घेतला जात असून, लवकरच त्याला अटक होण्याची शक्यता आहे.

लातूर जिल्ह्यात भीषण अपघात; बीएमडब्ल्यू कारच्या धडकेत चार जणांचा मृत्यू

लातूरमधील औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी रात्री (७ मार्च २०२६) एका भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या बीएमडब्ल्यू कारने लाकडाची वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पो/ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील चार जण ठार झाले असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच औसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. मृतांमध्ये औसा तालुक्यातील बोरगाव येथील तिघांचा आणि सांगली येथील एका व्यक्तीचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

Follow Us
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन