AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ISIS सोबत सिमी अन् इंडियन मुजाहिदीन, पुणे दहशतवादी प्रकरणात मोठा खुलासा

Pune Crime News : पुणे शहरात दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. या दहशतवाद्यांची काय योजना होती, यासंदर्भात तपास सुरक्षा संस्था करत आहेत. या दहशवाद्यांच्या प्रकरणात महत्वाचा खुलासा सुरक्षा संस्थांनी केला आहे.

ISIS सोबत सिमी अन् इंडियन मुजाहिदीन, पुणे दहशतवादी प्रकरणात मोठा खुलासा
terrorism (file photo) Image Credit source: tv9 Marathi
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Aug 17, 2023 | 10:30 AM
Share

पुणे | 17 ऑगस्ट 2023 : पुणे शहरात १८ जुलै रोजी पुणे पोलिसांनी दोन दशतवाद्यांना अटक केली होती. त्यापूर्वी मुंबई अन् पुणे शहरात ३ जुलै रोजी काही जणांना अटक केली होती. एनआयएच्या मोस्ट वॉटेंड दहशतवाद्यांच्या यादीत असलेले इम्रान खान आणि मोहम्मद युनूस साकी हे आरोपी होते. या प्रकरणाचा तपास सुरुवातील एटीएसने केला आता एनआयएकडे हा तपास आला आहे. या दोघांचे इसिस असलेले संबंध आधीच उघड झाले होते. या प्रकरणात आरोपी शाहनवाज आलम हा मुख्य सूत्रधार असून तो नामशेष झालेल्या दहशतवादी संघटना सिमी अन् इंडियन मुजाहिदीनला पुन्हा सक्रीय करण्याचा प्रयत्न करत आहे.

या संघटना पुन्हा एकत्र येणार

इस्लामिक स्टेट (आयएस) ही दहशवादी संघटना नाही तर अन्य दोन दहशतवादी संघटनांनाही पुन्हा एकत्र आल्या आहेत. स्टुडंट इस्लामिक मुव्हेमेंट ऑफ इंडिया म्हणजेच सिमी आणि इंडियन मुजाहिदीन या संघटना पुन्हा सक्रीय होत असल्याची चिन्ह दिसून येत आहे. सुरक्षा संस्थांनी यासंदर्भात माहिती दिली.

हा आरोपी दुवा

राष्ट्रीय तपास संस्थेने ३ जुलै रोजी चार जणांना अटक केली होती. त्यात एक मुंबईतून, दोन ठाण्यातून तर एक पुणे शहरातील होते. हे सर्व जण इसिससाठी काम करत होते. या प्रकरणाचा संबंध हजारीबाग येथील प्रकरणाशी येत आहे. हजारीबाग येथील साकीब नचान हा मुंबईत झालेल्या तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी होता. त्याला दहा वर्षांचा शिक्षा झाली होती. तो या सर्व प्रकरणात महत्वाचा दुवा ठरत आहे.

जुन्या संघटना पुन्हा सक्रीय

शाहनवाज आलम हा या प्रकरणात महत्वाचा खिलाडी आहे. ज्या संघटना जवळपास संपल्या होत्या, त्यांना पुन्हा सक्रीय करण्याचे काम तो करत आहे. सुरक्षा यंत्रणेच्या डोळ्यात धुळ फेकत त्याने हे काम चालवले होते. परंतु आता तो पकडला गेला आहे.

सुरक्षा संस्थांचे असा आहे खुलासा

  • आरोपी उच्च शिक्षित असून त्यांनी आयटी, सायबर, विस्फोटक आणि इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिवाइसचे प्रशिक्षण घेतले आहे.
  • एकत्र आलेल्या आरोपींमध्ये वैचारिक मतभेद होते, पण पुन्हा ते एकत्र आले. त्यासाठी सिमी आणि आयएमची भूमिका महत्वाची ठरली.
  • सिरीया आणि इराकमध्ये त्यांचे हँडलर आहेत.
  • पुणे प्रकरणात त्यांना वेगवेगळ्या प्रकरणात फडिंग झाली. त्यांना नियमित विदेशातून फंड मिळत होता.
Follow Us
Only Gujarati & Marwari, व्हायरल जाहिरातीवरून मराठी तरुण संतप्त
मुंबईत मराठींना नो एंट्री?; Only Gujarati & Marwari, व्हायरल जाहिरातीवरून मराठी तरुण संतप्त
नाराज छगन भुजबळ घेणार मोठा निर्णय? त्या वक्तव्याची जोरदार चर्चा
नाराज छगन भुजबळ घेणार मोठा निर्णय? त्या वक्तव्याची जोरदार चर्चा
ठाकरे गटात फूट पाडण्याचा प्लॅन?; राऊतांनी केला मोठा गौप्यस्फोट!
ठाकरे गटात फूट पाडण्याचा प्लॅन?; संजय राऊतांनी अमित शाहांचं नाव घेत केला मोठा गौप्यस्फोट! म्हणाले....
लंडनमध्ये मंत्री-न्यायाधीश एकत्र? हे आम्हाला काय न्याय देणार?
Sanjay Raut | लंडनमध्ये मंत्री-न्यायाधीश एकत्र? हे आम्हाला काय न्याय देणार? संजय राऊतांचा थेट हल्ला; लंडन दौऱ्यावरून खळबळ!
विधान परिषदेच्या रणधुमाळीत भयंकर घडलं, कॉंग्रेस उमेदवार रातोरात गायब,
विधान परिषदेच्या रणधुमाळीत भयंकर घडलं, कॉंग्रेस उमेदवार रातोरात गायब, नंतर अचानक... काय घडलं?
12 कांदा खरेदीदार संस्थांचे परवाने स्थगित, नेमकं कारण काय?
Nashik | लासलगावमध्ये नाफेडचा मोठा दणका!; 12 कांदा खरेदीदार संस्थांचे परवाने स्थगित, नेमकं कारण काय?
ऑपरेशन ब्लूस्टारवर गिरीश महाजनांना वक्तव्य भोवलं?
Girish Mahajan | ऑपरेशन ब्लूस्टारवर गिरीश महाजनांना वक्तव्य भोवलं? भाजपच्या दिल्ली दरबारातून नाराजीची चर्चा!
नाशिकचा तिढा कायम! फडणवीस-शिंदेंच्या चर्चेनंतरही गोकुळ गिते निवडणुकीवर
Gokul Gite | नाशिकचा तिढा कायम! फडणवीस-शिंदेंच्या चर्चेनंतरही गोकुळ गिते निवडणुकीवर ठाम
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!