AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नियम तोडून ओळखीने सुटणारेच पुणे वाहतूक पोलिसांच्या रडारवर

पुणे शहरातील वाहनांची संख्या वाढली आहे. यामुळे वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यात वाहतूक नियमांचे पालन होत नसल्यामुळे अपघातही वाढले आहे. यामुळे वाहतूक पोलीस अलर्ट मोडवर आले आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे.

नियम तोडून ओळखीने सुटणारेच पुणे वाहतूक पोलिसांच्या रडारवर
पुणे वाहतूक पोलीस
| Updated on: Apr 05, 2023 | 9:27 AM
Share

अभिजित पोते, पुणे : रस्त्याच्या चुकीच्या बाजूने (Wrong side) आणि एकेरी वाहन चालवणे, नो-एंट्री झोनमध्ये दुचाकी चालवणारे दुचाकीस्वार वाहनचालकांची संख्या पुणे शहरात वाढत आहे. वाहतूक पोलिसांच्या नोंदींमधून (Traffic police Report) ही बाब समोर आली आहे. नियम तोडणाऱ्या सर्वसामान्यांना दंड होतो, मेमो ठोकला जातो. परंतु अनेक जण आपल्या ओळखीने किंवा पदाचा वापर करत सुटतात. परंतु पुणे वाहतूक पोलिसांसमोर तुमची ओळख किंवा पद आता कामात येणार नाही. कारण नियम तोडला म्हणजे तुम्हाला आता दंड होणार आहे.

वाहतूक पोलीस अलर्ट मोडवर

पुणे शहरात वाहतूक पोलीस अलर्ट मोडवर आले आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरु झाली आहे. शहरातील चौका- चौकात पुणे वाहतूक पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले आहे. अगदी पुणे शहर वाहतूक पोलीस आयुक्त देखील ॲक्टीव्ह मोडवर आले आहेत. यामुळे गेल्या पंधरा दिवसांत पुणे शहरात 795 जणांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. वाहतुकीच्या नियम मोडणाऱ्या प्रत्येकावर वाहतूक पोलिसांची नजर असणार आहे. वाहतूक पोलिसांच्या रडावर पोलीस कर्मचारी, सरकारी कर्मचारी, वकील आणि पत्रकार देखील आले आहे. हाच गट ओळखीचा फायदा घेऊन वाहतूक नियम तोडल्यावर दंड न भरता सुटतो.

पंधरा दिवसांत चांगली कारवाई

वाहतूक नियम मोडणाऱ्या सर्वांसाठी पुणे वाहतूक पोलिसांचा सारखाच नियम आहे. गेल्या पंधरा दिवस लाखो रुपयांचा दंड पुणे पोलिसांनी वसूल केला आहे. वाहतूक नियम मोडणाऱ्या सामान्य पुणेकरांसह, शहरातील पीएमपी बसेसवर देखील वाहतूक पोलिसांची कारवाई केली आहे. पुणे शहर वाहतूक पोलिसांचा सर्वांसाठी समान न्याय देणार असल्याचे पुणे पोलीस वाहतूक विभागाचे उपायुक्त विजयकुमार मगर यांनी सांगितले.

ओळख ठरली नाही फायद्याची

जाऊ द्या मी पोलीस दलात, मी पत्रकार आहे, मी वकील आहे, असे कोणतीही ओळख फायद्याची ठरली नाही. कारण या लोकांवर पोलीसांनी कारवाई केली आहे.

  • पोलीस – 392
  • सरकारी कर्मचारी – 160
  • वकील- 151
  • सैन्य दल- 35
  • PMPL -30
  • पत्रकार -27

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.