AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात जाती-पातीच्या राजकारणामागे कारण काय? राज ठाकरे यांनी असे काढले माप

Raj Thackeray MNS : राज्यात जाती-पातीच्या राजकारण सुरू आहे. डोकी फुटत आहे. राजकारणाचा चिखल झाला आहे असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यावर आसूड ओढला. मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार फटकेबाजी केली.

राज्यात जाती-पातीच्या राजकारणामागे कारण काय? राज ठाकरे यांनी असे काढले माप
राज ठाकरे यांचा आसूडImage Credit source: मनसे सभा
| Updated on: Mar 09, 2025 | 12:23 PM
Share

राज्यात जाती-पातीच्या सुरू असलेल्या राजकारणावर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदास आसूड ओढला. त्यांनी राजकारणाचा चिखल झाल्याचे म्हटले. सध्याच्या परिस्थितीवर त्यांनी भाष्य केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त पिंपरी चिंचवड येथील कार्यक्रमात त्यांनी जोरदार फटकेबाजी केली. त्यांनी विविध मुद्दावर त्यांचे मत मांडले. तर यावेळी त्यांनी गुढी पाडव्याच्या दिवशी मेळाव्याला येण्याचे आवाहन केले.

राजकारणाचा चिखल झाला

आज राज्याच्या राजकारणाचा चिखल झाला आहे. मते मिळवण्यासाठी तुमची डोके फोडून घेतात, आग लावतात हे आपल्या लोकांना समजत नाही, असा आसूड त्यांनी ओढला. पिंपरी चिंचवड येथील कार्यक्रमात त्यांनी राज्यातील सध्य स्थितीवर टीका केली. लोकांची माथी भडकवण्याचे काम करण्यात येत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

सध्याच्या या परिस्थितीवर आपण गुढी पाडव्याच्या दिवशी सविस्तर बोलणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले. या सर्व गोष्टीकडून तुम्हाला गुमराह करण्यासाठी जातीपातीचे विषय काढले जात आहे. सोशल मीडियातून तुमची टाळकी भडकवले जात आहेत. जाणून बुजून हे उद्योग सुरू असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला.

गुढीपाडव्याला दांडपट्टा चालवणार

२० दिवसांवर गुढी पाडव्याचा मेळावा आहे. तिकडे मी दांडपट्टा फिरवणार असेल तर आता चाकू सुरे कशाला काढू, असा सूचक इशारा राज ठाकरे यांनी दिला. आज मी तुम्हाला शुभेच्छा द्यायला आलो आहे. सदानंद मोरे सरांनी आताच्या परिस्थितीवर बोलावं म्हणून त्यांना बोलावलं. त्यांची व्याख्याने राज्यभर ठेवणार असल्याचे ते म्हणाले.

वरळी सी लिंकच्या कामावर चिमटा

प्रभू रामचंद्रांना जेव्हा वनवास झाला. १४ वर्षाचा झाला असे सांगत या काळात काय काय घडलं, याची माहिती देत राज ठाकर यांनी हळूच जोरदार चिमटा काढला. त्यामुळे सभेत एकच खसखस पिकली. प्रभू रामचंद्रांना हनुमान भेटला. लंकेत गेले. कुंभकर्णाला मारलं. रावणाला मारलं. सीतामाईला घेऊन आयोध्येला आले. मध्ये त्यांनी एक सेतू बांधला. हे त्यांनी १४ वर्षात केलं. आणि वांद्रे वरळी सी लिंक आपण १४ वर्षात बांधला. कुठे आयोध्या, दंडकारण्य, कुठे लंक सेतूबितू बांधून गेले. हे सर्व १४ वर्षात घडलं असं सांगत आजच्या काळात वांद्रे वरळी सी लिंकला 14 वर्षे लागल्यावरून त्यांनी जोरदार फटकेबाजी केली.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.