AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“महाराष्ट्राची आजची राजकीय अवस्था दयनीय”; राज ठाकरे यांनी सुसंस्कृत महाराष्ट्राची खंत सांगितली….

बाहेरील माणसं महाराष्ट्रात येऊन मोठी झाली पण राज्यातील माणसं निवांत आहेत. माझ्या महाराष्ट्रातील मराठी समाज गप्प का् आहे असा सवालही त्यांनी पुणेकरांना यावेळी केला.

महाराष्ट्राची आजची राजकीय अवस्था दयनीय; राज ठाकरे यांनी सुसंस्कृत महाराष्ट्राची खंत सांगितली....
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Dec 28, 2022 | 8:51 PM
Share

पुणेः ज्या राज्यात बाहेरून लोकं येऊन मोठी झाली, त्यांनी नाव कमावलं, महाराष्ट्रात राहून राज्य निर्माण केली त्या माणसांना महाराष्ट्रा मोठा वाटतो पण आपल्याच लोकांना आपल्याच राज्याविषयी काय करू नये असं का वाटत असेल असा सवाल मनसेचे अध्यक्षांनी केला आहे. ते पुण्यातील आयोजित व्याख्यानमालेप्रसंगी बोलत होते. राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, राजकारण वाईट नाही पण राज्यातील राजकारण नासवलं जात असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

राज्यातील राजकारण चुकीच्या लोकांच्या, माणसांच्या हातात पडले आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय संस्कृती बदलते अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

सुसंस्कृत महाराष्ट्र जातीपातीत विभागला बरबाद होऊ लागला तर हे राज्य आपण कुठं घेऊन जाणारआहोत. या राज्यात बाहेरची लोकं येतात का येतात तर त्यांची राज्यं त्यांना नकोशी आहेत.

त्यामुळे अशी राज्याबाहेरून आलेली माणसं या महाराष्ट्रात येऊन मोठी झाली आहेत. यावेळी त्यांनी अभिनेता अभिताम बच्चन यांचे उदाहरण देत अमिताभ बच्चन जर अलाहाबादलाच राहिले असते तर त्यांचे काय झाले असते असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.

काही दिवसापूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते म्हणाले की, महाराष्ट्रातून गुजराती आणि मारवाडी निघून गेले तर महाराष्ट्राचं काय होईल असा सवाल त्यांनी केला होता. पण राज्यपाल कोश्यारी यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्या राज्यात काय झालं नाही म्हणून ते इथं महाराष्ट्रात आले आहे.

बाहेरील माणसं महाराष्ट्रात येऊन मोठी झाली पण राज्यातील माणसं निवांत आहेत. माझ्या महाराष्ट्रातील मराठी समाज गप्प का् आहे असा सवालही त्यांनी पुणेकरांना यावेळी केला.

कोणासाठी हे सहन करायचे आहे. त्यामुळे हेच आवाहन करण्यासाठी म्हणून मी पुण्यात आलो असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शहराच्या विकासाविषयी सांगताना रस्ते प्रकल्प आणि रस्त्यांचा विकास काय गरजेचा आहे हेही त्यांनी सांगितले.

Follow Us
मला महिला आयोगाची अध्यक्ष करा मग... गिरीजा राऊत प्रकरणी बोलताना करुणा
मला महिला आयोगाची अध्यक्ष करा मग... गिरीजा राऊत प्रकरणी बोलताना करुणा मुंडे हे काय बोलून गेल्या?
सुनेत्रा पवार यांचे अध्यक्षपद अवैध? थेट नोटीस पाठवल्याने एकच खळबळ;
सुनेत्रा पवार यांचे अध्यक्षपद अवैध? थेट नोटीस पाठवल्याने एकच खळबळ; राष्ट्रवादी पक्षातील संघर्ष चव्हाट्यावर?
पेपरफुटीतील एकालाही सोडणार नाही! दादा भुसेंचा मोठा इशारा...
Dada Bhuse | पेपरफुटीतील एकालाही सोडणार नाही! दादा भुसेंचा मोठा इशारा... नेमकं काय म्हणाले?
लग्न झाल्याच्या दीड वर्षातच भयंकर.... एकीकडे लेकीच्या बारशाची लगबग
लग्न झाल्याच्या दीड वर्षातच भयंकर.... एकीकडे लेकीच्या बारशाची लगबग दुसरीकडे आईनं संपवलं जीवन
सुरत बायपासवर मृत्यूचा सापळा! कंटेनरच्या धडकेत 5 वर्षीय चिमुकल्यासह वड
Dhule | सुरत बायपासवर मृत्यूचा सापळा! कंटेनरच्या धडकेत 5 वर्षीय चिमुकल्यासह वडिलांचा मृत्यू
उपसभापतीपदी निवड झाल्यानंतर सचिन अहिरांना शिंदे गटाकडून मोठं गिफ्ट?
मोठी बातमी! उपसभापतीपदी निवड झाल्यानंतर सचिन अहिरांना शिंदे गटाकडून मोठं गिफ्ट? थेट वरळीतच...
देवाभाऊ-शिंदेभाऊंना लाडक्या बहिणींचा खर्च जड झाला का?
देवाभाऊ-शिंदेभाऊंना लाडक्या बहिणींचा खर्च जड झाला का?; सुनेत्रा पवारांना रोहिणी खडसेंचं थेट आवाहन, म्हणाल्या...
सावधान! तुम्ही वापरत असलेलं तेल इतकं अशुद्ध की... FDA च्या कारवाईत
सावधान! तुम्ही वापरत असलेलं तेल इतकं अशुद्ध की... FDA च्या कारवाईत धक्कादायक खुलासा
भररस्त्यात दुचाकीस्वाराच्या डोक्यावर कोसळला बॅनर; अन् पुढे जे घडलं...
थरारक VIDEO! भररस्त्यात दुचाकीस्वाराच्या डोक्यावर कोसळला बॅनर; अन् पुढे जे घडलं...
काँग्रेसला मोठा धक्का? तालुकाध्यक्षांसह 3 नगरसेवक भाजपच्या वाटेवर!
मोठी घडामोड! गोंदियात काँग्रेसला मोठा धक्का? तालुकाध्यक्षांसह 3 नगरसेवक भाजपच्या वाटेवर!