AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“महाराष्ट्राची आजची राजकीय अवस्था दयनीय”; राज ठाकरे यांनी सुसंस्कृत महाराष्ट्राची खंत सांगितली….

बाहेरील माणसं महाराष्ट्रात येऊन मोठी झाली पण राज्यातील माणसं निवांत आहेत. माझ्या महाराष्ट्रातील मराठी समाज गप्प का् आहे असा सवालही त्यांनी पुणेकरांना यावेळी केला.

महाराष्ट्राची आजची राजकीय अवस्था दयनीय; राज ठाकरे यांनी सुसंस्कृत महाराष्ट्राची खंत सांगितली....
| Updated on: Dec 28, 2022 | 8:51 PM
Share

पुणेः ज्या राज्यात बाहेरून लोकं येऊन मोठी झाली, त्यांनी नाव कमावलं, महाराष्ट्रात राहून राज्य निर्माण केली त्या माणसांना महाराष्ट्रा मोठा वाटतो पण आपल्याच लोकांना आपल्याच राज्याविषयी काय करू नये असं का वाटत असेल असा सवाल मनसेचे अध्यक्षांनी केला आहे. ते पुण्यातील आयोजित व्याख्यानमालेप्रसंगी बोलत होते. राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, राजकारण वाईट नाही पण राज्यातील राजकारण नासवलं जात असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

राज्यातील राजकारण चुकीच्या लोकांच्या, माणसांच्या हातात पडले आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय संस्कृती बदलते अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

सुसंस्कृत महाराष्ट्र जातीपातीत विभागला बरबाद होऊ लागला तर हे राज्य आपण कुठं घेऊन जाणारआहोत. या राज्यात बाहेरची लोकं येतात का येतात तर त्यांची राज्यं त्यांना नकोशी आहेत.

त्यामुळे अशी राज्याबाहेरून आलेली माणसं या महाराष्ट्रात येऊन मोठी झाली आहेत. यावेळी त्यांनी अभिनेता अभिताम बच्चन यांचे उदाहरण देत अमिताभ बच्चन जर अलाहाबादलाच राहिले असते तर त्यांचे काय झाले असते असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.

काही दिवसापूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते म्हणाले की, महाराष्ट्रातून गुजराती आणि मारवाडी निघून गेले तर महाराष्ट्राचं काय होईल असा सवाल त्यांनी केला होता. पण राज्यपाल कोश्यारी यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्या राज्यात काय झालं नाही म्हणून ते इथं महाराष्ट्रात आले आहे.

बाहेरील माणसं महाराष्ट्रात येऊन मोठी झाली पण राज्यातील माणसं निवांत आहेत. माझ्या महाराष्ट्रातील मराठी समाज गप्प का् आहे असा सवालही त्यांनी पुणेकरांना यावेळी केला.

कोणासाठी हे सहन करायचे आहे. त्यामुळे हेच आवाहन करण्यासाठी म्हणून मी पुण्यात आलो असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शहराच्या विकासाविषयी सांगताना रस्ते प्रकल्प आणि रस्त्यांचा विकास काय गरजेचा आहे हेही त्यांनी सांगितले.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.