AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजर्षी शाहू महाराजांना देशभर कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले पाहिजे; रामदास आठवले यांच्याकडून कृतज्ञतापूर्वक अभिवादन

कोल्हापुरात मागासवर्गीयांना आरक्षण लागू करून आरक्षणाचे जनक ठरलेले राजर्षी शाहू महाराज हे बहुजनांचे प्रेरणास्थान आहेत असे मतही रामदास आठवले यांनी मांडले.

राजर्षी शाहू महाराजांना देशभर कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले पाहिजे; रामदास आठवले यांच्याकडून कृतज्ञतापूर्वक अभिवादन
रामदास आठवले यांच्याकडून कृतज्ञतापूर्वक अभिवादनImage Credit source: tv9marathi
| Updated on: May 06, 2022 | 7:31 PM
Share

मुंबई: लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज (Chhatrapati Rajarshi Shahu Maharaj)यांच्या 100 व्या स्मृतीदिनी स्मृतीशताब्दीनिमित्त आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Union Minister of State for Social Justice Ramdas Athavale) यांनी 100 सेकंद स्तब्ध उभा राहून राजर्षी शाहू महाराजांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतीशताब्दीनिमित्त दि. 6 मे रोजी सकाळी 10 वाजता 100 सेकंद स्तब्ध उभे राहून कोल्हापुरात कृतज्ञ विनम्र अभिवादन करण्याचे आवाहन कोल्हापूरात करण्यात आले होते. मात्र लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना त्यांच्या स्मृतीदिनी केवळ कोल्हापूरात (Kolhapur) नाही तर देशभर कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले पाहिजे असे मत व्यक्त केले.

राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त भव्य कृतज्ञता समारोह तीन दिवसांचा कार्यक्रम रिपब्लिकन पक्षातर्फे कोल्हापुरात लवकरच आयोजित करण्यात येणार आहे. त्यामध्ये परिसंवाद, मेळावा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

समतेची चळवळ रुजवली

राजर्षी शाहू महाराजांचे परिवर्तनाच्या समतेच्या चळवळीत मोठे योगदान असून शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक युगप्रवर्तक महापुरुष होते. त्यांनी माणगाव येथील परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे उद्गारकर्ते पुढारी होतील असे सांगितले होते.

आरक्षणाचे जनक

कोल्हापुरात मागासवर्गीयांना आरक्षण लागू करून आरक्षणाचे जनक ठरलेले राजर्षी शाहू महाराज हे बहुजनांचे प्रेरणास्थान आहेत असे मतही रामदास आठवले यांनी मांडले.

सामाजिक योगदानाविषयीही चर्चा

राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी निमित्त कृतज्ञता पर्वा आज ना.रामदास आठवले यांनी पुण्यात साजरे केले. यावेळी शाहू महाराजांच्या कार्याविषयी आणि त्यांच्या सामाजिक योगदानाविषयीही चर्चा करण्यात आली. कोल्हापूरात जी संकल्पना राबवण्यात आली, ती साऱ्या देशात राबवणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

दूरदृष्टीकोनाचे निर्णय

राजर्षी शाहू महाराज यांनी समाजासाठी त्यांच्या कार्यकाळात घेतलेले निर्णय किती दूरदृष्टीकोन ठेऊन घेतले होते. त्यामुळेच शाहू महाराजांच्या विचार आजच्या काळातही तितकेच महत्वाचे ठरतात, आणि लागू पडतात असेही त्यांनी सांगितले.

Follow Us
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका.
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार.
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी....
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी.....
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले.
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?.
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा.
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?.
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ.
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी.
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार.