AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rain : राज्यात गेल्या २४ तासांत या ठिकाणी विक्रमी पावसाची नोंद

weather update and rain : राज्यात मान्सून चांगलाच सक्रीय झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत पाऊस सुरु आहे. पुणे अन् परिसरातही पावसाने चांगला जोर धरला आहे. आता पुढील काही दिवस पावसाचे असणार आहे.

Rain : राज्यात गेल्या २४ तासांत या  ठिकाणी विक्रमी पावसाची नोंद
Lonavala Rain
| Updated on: Jul 18, 2023 | 9:16 AM
Share

रणजित जाधव, पुणे | 18 जुलै 2023 : यंदा मान्सून उशिराने दाखल झाला. राज्यात 24 जून रोजी मान्सून दाखल झाल्यानंतर काही दिवस पाऊस झाला. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. आता गेल्या दोन, तीन दिवसांपासून राज्यात पावसाने चांगला जोर धरला आहे. तसेच पुढील काही दिवस पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यामुळे धरणांमधील जलसाठा वाढणार आहे. राज्यातील पर्यटन स्थळ असलेल्या लोणावळ्यात गेल्या 24 तासांत विक्रमी पावसाची नोंद झाली आहे.

लोणावळ्यात किती झाला पाऊस

पुण्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या लोणावळ्यात यंदाच्या मोसमातील विक्रमी पाऊस कोसळला आहे. गेल्या 24 तासांत या ठिकाणी तब्बल 214 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या मोसमात एका दिवसांत झालेला हा सर्वाधिक पाऊस आहे. परंतु यंदा आत्तापर्यंत झालेला पाऊल हा गेल्या वर्षीच्या तुलनेत खूपच कमी आहे. मागील वर्षी 17 जुलैपर्यंत 2515 मिमी पाऊस बरसला होता, यंदा मात्र केवळ 1524 मिमी इतकाच पाऊस झाला आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत 106 मीमी पाऊस झाल्याची नोंद कुलाबा वेधशाळेने दिली.

Lonavala rain

कळमोडी धरण शंभर टक्के भरले

खेड तालुक्यातील कळमोडी धरण 100 टक्के भरले आहे. पुणे जिल्ह्यातील पहिले धरण शंभर टक्के भरले आहे. धरण पूर्ण भरल्यामुळे सांडव्यावरून आरळा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. कळमोडी धरणाची जलसाठ्याची क्षमता दीड टीमसी आहे. धरणातून विसर्ग सुरु झाल्यामुळे आरळा नदीकाठावरील नागरिकांनी खबरदारीचा इशारा दिला आहे. कळमोडी धरणातील पाणी चासकमान धरणात यायला सुरवात झाली आहे. पावसाचे प्रमाण असेच राहिले तर चासकमान धरण लवकरच भरणार आहे. सह्याद्रीच्या खोऱ्यात भीमाशंकर भागात पावसाची संततधार सुरू असल्यामुळे हे धरण पूर्ण भरले आहे.

पुण्यासाठी हे धरण महत्वाचे

पुणे शहराला पाणीपुरवठा चार धरणांमधून होता. त्यात टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणांचा समावेश आहे. या धरणांत अजून 9.05 टीएमसी पाणी आहे. म्हणजेच 31.04 टक्के एवढा जलसाठा आहे. हा जलसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्ध्यापेक्षाही कमी आहे. मागील वर्षी 17 जुलैपर्यंत 60.62 टक्के जलसाठा झाला होता.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.