AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sadabhau Khot : इडा पिडा टळू दे, महाविकास आघाडीचं भ्रष्ट सरकार जाऊ दे..! रयत क्रांतीचं पुण्यातल्या कानगावात साकडं आंदोलन

गेली अडीच वर्षे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. लोकांचा, जनमताचा विश्वासघात करून स्थापन झालेले हे सरकार आहे. ते सरकार टिकवण्यासाठी संपूर्ण ताकद महाविकास आघाडी लावत असून त्यातच त्यांचा वेळ वाया जात आहे, अशी टीका आंदोलकांनी केली.

Sadabhau Khot : इडा पिडा टळू दे, महाविकास आघाडीचं भ्रष्ट सरकार जाऊ दे..! रयत क्रांतीचं पुण्यातल्या कानगावात साकडं आंदोलन
रयत क्रांती संघटनेचे दौंडमधील कानगावात आंदोलनImage Credit source: tv9
| Updated on: Jun 26, 2022 | 3:19 PM
Share

पुणे : इडा पिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे आणि भ्रष्टाचारी महाविकास आघाडी सरकार जाऊ दे, अशी घोषणाबाजी रयत क्रांती संघटनेतर्फे (Rayat Kranti Sanghatana) करण्यात आली. पुण्यात आंदोलन करण्यात आले. माजी मंत्री आणि संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रभर हे आंदोलन करण्यात येत आहे. दौंड तालुक्यातील कानगाव येथेही हे आंदोलन करण्यात आले. रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनिता ताकवणे, संघटनेचे सरचिटणीस सयाजी मोरे, शेतकरी तसेच कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले. महाविकास आघाडी सरकारविरोधात (Mahavikas Aghadi Government) असंतोष असून शेतकरीदेखील भरडला जात आहे. राज्यात केवळ राजकारण सुरू आहे, जनतेच्या हिताचे काहीच होत नाही, असा आरोप करण्यात आला.

‘अराजकता निर्माण झाल्यासारखी परिस्थिती’

गेली अडीच वर्षे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. लोकांचा, जनमताचा विश्वासघात करून स्थापन झालेले हे सरकार आहे. ते सरकार टिकवण्यासाठी संपूर्ण ताकद महाविकास आघाडी लावत असून त्यातच त्यांचा वेळ वाया जात आहे. आज तर राज्यामध्ये अराजकता निर्माण झाल्यासारखी परिस्थिती आहे. असा सगळा सावळा गोंधळ महाविकास आघाडी सरकारचा चालू असून यामध्ये शेतकरी, शेतमजूर, कामगार ,लघुउद्योजक, विद्यार्थी भरडले जात आहेत, असा आरोप करण्यात आला आहे.

‘राज्यातील जनता वैतागली’

मागील अडीच वर्षामध्ये अनेक आत्महत्या झाल्या, वादळे आली, महापूर आला, दुष्काळ आला. या काळामध्ये महाविकास आघाडी सरकारने कोणाकडेही लक्ष दिले नाही. त्यामुळे जनतेचे अतोनात हाल झाले, होत आहेत. त्यासोबतच राज्यातील जनता आता या भ्रष्टाचारी महाविकास आघाडी सरकारला वैतागलेली आहे. म्हणून हे भ्रष्टाचारी सरकार जावो, म्हणजे इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो, महाविकास आघाडी सरकारचे, लुटारूंचे राज्य जाऊ दे, असे फलक यावेळी आंदोलकांकडून लावत आणि घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. दौंडमधील कानगाव परिसरात आंदोलन करत ही घोषणाबाजी करण्यात आली.

भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.