Sadabhau Khot : इडा पिडा टळू दे, महाविकास आघाडीचं भ्रष्ट सरकार जाऊ दे..! रयत क्रांतीचं पुण्यातल्या कानगावात साकडं आंदोलन

गेली अडीच वर्षे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. लोकांचा, जनमताचा विश्वासघात करून स्थापन झालेले हे सरकार आहे. ते सरकार टिकवण्यासाठी संपूर्ण ताकद महाविकास आघाडी लावत असून त्यातच त्यांचा वेळ वाया जात आहे, अशी टीका आंदोलकांनी केली.

Sadabhau Khot : इडा पिडा टळू दे, महाविकास आघाडीचं भ्रष्ट सरकार जाऊ दे..! रयत क्रांतीचं पुण्यातल्या कानगावात साकडं आंदोलन
रयत क्रांती संघटनेचे दौंडमधील कानगावात आंदोलनImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 26, 2022 | 3:19 PM

पुणे : इडा पिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे आणि भ्रष्टाचारी महाविकास आघाडी सरकार जाऊ दे, अशी घोषणाबाजी रयत क्रांती संघटनेतर्फे (Rayat Kranti Sanghatana) करण्यात आली. पुण्यात आंदोलन करण्यात आले. माजी मंत्री आणि संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रभर हे आंदोलन करण्यात येत आहे. दौंड तालुक्यातील कानगाव येथेही हे आंदोलन करण्यात आले. रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनिता ताकवणे, संघटनेचे सरचिटणीस सयाजी मोरे, शेतकरी तसेच कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले. महाविकास आघाडी सरकारविरोधात (Mahavikas Aghadi Government) असंतोष असून शेतकरीदेखील भरडला जात आहे. राज्यात केवळ राजकारण सुरू आहे, जनतेच्या हिताचे काहीच होत नाही, असा आरोप करण्यात आला.

‘अराजकता निर्माण झाल्यासारखी परिस्थिती’

गेली अडीच वर्षे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. लोकांचा, जनमताचा विश्वासघात करून स्थापन झालेले हे सरकार आहे. ते सरकार टिकवण्यासाठी संपूर्ण ताकद महाविकास आघाडी लावत असून त्यातच त्यांचा वेळ वाया जात आहे. आज तर राज्यामध्ये अराजकता निर्माण झाल्यासारखी परिस्थिती आहे. असा सगळा सावळा गोंधळ महाविकास आघाडी सरकारचा चालू असून यामध्ये शेतकरी, शेतमजूर, कामगार ,लघुउद्योजक, विद्यार्थी भरडले जात आहेत, असा आरोप करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

‘राज्यातील जनता वैतागली’

मागील अडीच वर्षामध्ये अनेक आत्महत्या झाल्या, वादळे आली, महापूर आला, दुष्काळ आला. या काळामध्ये महाविकास आघाडी सरकारने कोणाकडेही लक्ष दिले नाही. त्यामुळे जनतेचे अतोनात हाल झाले, होत आहेत. त्यासोबतच राज्यातील जनता आता या भ्रष्टाचारी महाविकास आघाडी सरकारला वैतागलेली आहे. म्हणून हे भ्रष्टाचारी सरकार जावो, म्हणजे इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो, महाविकास आघाडी सरकारचे, लुटारूंचे राज्य जाऊ दे, असे फलक यावेळी आंदोलकांकडून लावत आणि घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. दौंडमधील कानगाव परिसरात आंदोलन करत ही घोषणाबाजी करण्यात आली.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.