AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भीमा नदीत रोज एक मृतदेह सापडत होता, सात दिवसांत सात मृतदेह

अमोल ऐकत नसल्याने पुण्यात असलेल्या मोहन पवार यांचा मुलगा राहुलला फोन त्यांनी फोन केला आणि सर्व घटना सांगितली. जर अमोलने आमचे ऐकले नाही, तर आम्ही आमचा जीव देऊ, असे मोहन पवार यांनी राहुलला शेवटच्या क्षणी सांगितले होते.

भीमा नदीत रोज एक मृतदेह सापडत होता, सात दिवसांत सात मृतदेह
Image Credit source: टीव्ही९ नेटवर्क
| Updated on: Jan 25, 2023 | 8:25 AM
Share

पुणे : दौंड तालुक्यातील पारगावमधील भीमा नदीच्या पात्रात सात दिवसांत सात मृतदेह सापडले. नदी पात्रात रोज एक मृतदेह सापडत होता. यामुळे हा हत्येचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त होत होता. नदी पात्रात मिळालेले सर्व मृतदेह हे एकाच कुटुंबातील होते. यामध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. भीमा नदीच्या पात्रात 18 जानेवारी रोजी एका महिलेचा, 20 जानेवारी रोजी पुरुषाचा, 21 जानेवारी रोजी महिलेचा, 22 जानेवारी रोजी पुन्हा एक महिलेचा आणि 24 जानेवारी रोजी तीन लहान मुलांचे असे टप्प्याटप्प्याने सात मृतदेह आढळले.

पोलिसांना हत्येचा संशय

निघोज नदीपात्रात सापडलेले या सात मृतदेहांमुळे पोलीस चक्रावले होते. ही हत्या असल्याचा संशयावरुन तपास सुरु केला होता. मोहन पवार त्यांच्या कुटुंबातील सात जणांचे मृतदेह होते. परंतु ही हत्या नाही तर आत्महत्या असल्याचे स्पष्ट झाले. मुलाने नात्यातील विवाहित मुलगी पळवून आणली यामुळे कुटुंबाची बदनामी होईल, या भीतीने या आत्महत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुलाने केला घोळ अन् संपले कुटुंब

मुळचे बीड व उस्मानाबाद असणारी पवार कुटुंब भटकंती करत व्यवसाय करत होते. सध्या ते निघोजमध्ये राहात होते.ह्रदय पिळवटून लावणारी ही घटना मोहन पवार यांचा मुलगा अमोलमुळे घडली. त्याने नात्यातील विवाहित मुलगी पळवून आणली. या बाब मोहन पवार व त्यांच्या कुटुंबियांना मान्य नव्हती. मुलीला परत पाठवून दे, असे ते सातत्याने सांगत होते. मुलीला परत न पाठवल्यास आम्ही आत्महत्या करु, असेही त्यांनी अमोलला सांगितले होते. अमोलने वडिलांचे म्हणणे ऐकले नाही, यामुळे निराश झालेल्या पवार व जावाई फुलवरे यांच्या कुटुंबातील सात जणांनी आपले जीवन संपवले.

मुलाने ऐकले नाही

अमोल ऐकत नसल्याने पुण्यात असलेल्या मोहन पवार यांचा मुलगा राहुलला फोन त्यांनी फोन केला आणि सर्व घटना सांगितली. जर अमोलने आमचे ऐकले नाही, तर आम्ही आमचा जीव देऊ, असे मोहन पवार यांनी राहुलला शेवटच्या क्षणी सांगितले होते. त्यानंतर ते जे गायब झाले, ते कालपर्यंत आढळलेल्या मृतदेहाच्या माध्यमातूनच पुढे आले.

यांनी केली आत्महत्या

मोहन उत्तम पवार (वय 45, मूळ राहणार -खामगाव तालुका गेवराई जि. बीड.) संगीता उर्फ शहाबाई मोहन पवार (वय 45, राहणार -खामगाव तालुका गेवराई जिल्हा बीड) राणी श्याम फलवरे (वय 24, राहणार हातोला तालुका वाशी जिल्हा उस्मानाबाद) (मोहन पवार यांची विवाहित मुलगी) श्याम पंडित फलवरे( वय 28, राहणार हातोला तालुका वाशी जिल्हा उस्मानाबाद)(मोहन पवार यांचे जावई) रितेश उर्फ भैय्या श्याम फलवरे (वय ७, राहणार हातोला तालुका वाशी जिल्हा उस्मानाबाद (नातू) छोटू श्याम फलवरे (वय ५, हातोला तालुका वाशी जिल्हा उस्मानाबाद) (नातू) कृष्णा श्याम फलवरे (वय ३, राहणार हातोला तालुका वाशी जिल्हा उस्मानाबाद) (नातू)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.