AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vande Bharat : पुणेकरांना मिळणार वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये सवलत, कारण…

Vande Bharat Express : वंदे भारत एक्प्रेस पुणे येथून सध्या सोलापूरसाठी जात आहे. तसेच या ट्रेनने मुंबईतसुद्धा पुणेकरांना येता येते. आता पुणेकरांना या गाडीसंदर्भात चांगली बातमी मिळाली आहे. या गाडीच्या तिकीट दर कमी होणार आहे.

Vande Bharat : पुणेकरांना मिळणार वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये सवलत, कारण...
| Updated on: Jul 14, 2023 | 11:40 AM
Share

पुणे, दिनांक 14 जुलै 2023 : देशभरातील 24 राज्यात आलिशान वंदेभारत एक्स्प्रेस सुरु झाल्या आहेत. देशभरात वंदेभारत 26 ठिकाणांहून सुरु झाल्या आहे. महाराष्ट्रातून एकूण चार ठिकाणांवरुन वंदेभारत एक्स्प्रेस सुरु आहेत. त्यात मुंबई ते गोवा एक्स्प्रेस नुकतीच सुरु झाली. त्यापूर्वी मुंबई गांधीनगर, मुंबई सोलापूर अन् मुंबई शिर्डी या गाड्या सुरु होत्या. दिल्ली ते वाराणसी या मार्गावर 15 फेब्रुवारी 2019 रोजी पहिली वंदेभारत एक्स्प्रेस सुरु झाली होती. परंतु आता पुणेकरांना वंदे भारत एक्स्प्रेससाठी केलेल्या नियमाचा फायदा होणार आहे.

काय आहे नियम

वंदेभारत एक्स्प्रेसला काही मार्गावर भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. तर काही मार्गांवर प्रवासी मिळत नाही. यामुळे रेल्वे विभागाने ५० टक्के पेक्षा कमी प्रतिसाद मिळणाऱ्या ठिकाणांवरुन २५ टक्के भाडे कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या नियमाचा फायदा पुणेकरांना होणार आहे.

का होणार पुणेकरांना फायदा

पुणेवरुन कोठेही सरळ वंदे भारत एक्स्प्रेस सुरु नाही. परंतु मुंबई-सोलापूर वंदे भारत पुण्यावरुन जाते. या गाडीला सोलापूर ते पुणेसाठी 20 टक्केच प्रतिसाद आहे. पुणे ते सोलापूर 14 टक्के तर सोलापूर ते मुंबईसाठी 28 टक्के प्रतिसाद आहे. पुणे ते मुंबईसाठी 50 टक्के तर मुंबई ते पुणे प्रवाशासाठी 55 टक्के प्रतिसाद आहे. मुंबई ते सोलापूर मार्गावर 21 टक्के प्रतिसाद आहे. यामुळे पुणे ते सोलापूर अन् सोलापूर ते पुणे या मार्गावरील तिकीट दर 25 टक्के कमी होणार आहे. पुणेकरांसाठी वंदे भारत एक्स्प्रेस 10 फेब्रवारीपासून सुरु झाली होती. त्यानंतर आता या रेल्वेच्या तिकीट दरात कपात होणार आहे.

देशात या ठिकाणी कमी प्रतिसाद

इंदूर-भोपाळ वंदे भारतला सर्वात कमी प्रतिसाद आहे. इंदूर भोपळ हे अंतर फक्त तीन तासात कापले जाते. या ठिकाणी वंदे भारत एक्स्प्रेसला जूनमध्ये केवळ 29 टक्के प्रवासी मिळाले. तसेच भोपळ ते इंदूर मार्गावर 21 टक्के प्रवासी मिळाले.

मेक इन इंडिया ट्रेन

वंदे भारत ट्रेन ही नव्या युगाची रेल्वे गाडी आहे. तिला ‘मेक इन इंडिया’ मोहिमेंतर्गत तयार केली आहे. या गाडीची प्रवासी वाहण्याची क्षमता ही ‘शताब्दी एक्स्प्रेस’ पेक्षा अधिक आहे. वेग अन् आरामदायी प्रवासामुळे अनेक मार्गांवर तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु काही ठिकाणी तिकीट दर जास्त असल्यामुळे तिला प्रतिसाद कमी मिळत आहे. त्यामुळेच दर कपातीचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहेच.

Follow Us
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात.
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.