AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

maratha reservation | राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी, गावात लागले बॅनर

maratha reservation | अहमदनगर जिल्ह्यातील एक गाव सध्या चर्चेत आले आहे. या गावात राजकीय पुढाऱ्यांना बंदी घालण्यात आली आहे. गावात आजी-माजी आमदार, राजकीय पुढारी यांना गावबंदी असणार आहे, असे बॅनर लावले गेले आहे.

maratha reservation | राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी, गावात लागले बॅनर
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Oct 20, 2023 | 12:09 PM
Share

अहमदनगर | 20 ऑक्टोंबर 2023 : गाव करी ते राव न करी, असे आपल्याकडे नेहमीच म्हटले जाते असते. राजकीय पुढाऱ्यांकडून सर्वच गोष्टीसंदर्भात आश्वासने दिले जातात. परंतु ही आश्वासने पूर्ण होत नाही. यामुळे अनेक जणांची निराशा होत असते. परंतु राजकीय नेत्यांकडून देण्यात येणाऱ्या आश्वासनामुळे अहमदनगर जिल्ह्यातील एका गावाने मोठा निर्णय घेतला आहे. या गावात राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गावात गावात आजी-माजी आमदार, राजकीय पुढारी यांना प्रवेश नाही, असे बॅनर्स लावण्यात आले आहे. त्या बॅनर्सची चर्चा राज्यात सर्वत्र होऊ लागली आहे.

का घेतला गावाने निर्णय

मराठा आरक्षणामुळे गावाने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यापासून आतापर्यंत सर्वच पक्षांची सरकार सत्तेत आली. परंतु एकाही पक्षाच्या सरकारकडून मराठा समाजास न्याय दिला गेला नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या घोषणा सर्वच राजकीय पक्षांनी केल्या. परंतु या घोषणा आणि आश्वासनाची पूर्ती एकाही राजकीय पक्षाकडून झाली नाही. यामुळे मराठा समाजास आरक्षणासाठी पुन्हा आंदोलने उभारावे लागले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गावाने राजकीय पुढाऱ्यांना बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

अहमदनगरमधील पाथर्डी तालुक्यात बॅनर

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा विषय लावून धरला आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील मिरी गावाने वेगळा निर्णय घेतला आहे. या गावाने राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पुढाऱ्यांना गाव बंदी असणार आहे. आजी माजी आमदार, राजकीय पुढारी यांना गावात प्रवेश नाही, असे बॅनर लावण्यात आले आहे.

काय आहे मागणी

मराठा समाजास सरसकट ओबीसीतून ५० टक्क्याच्या आत आरक्षण देण्याची मागणी गावाने केली आहे. यासंदर्भात बॅनर्स लावले असून त्यावर आपले नम्र म्हणून समस्त मराठा बांधव मिरी असे लिहिले आहे. या बॅनर्सची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे.

Follow Us
चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा
Bhaskar Jadhav । चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा; भास्कर जाधवांचा सरकारवर थेट हल्लाबोल
वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर....
मोठी बातमी! वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर, भूमिका स्पष्ट करत म्हणाल्या....
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार निर्णायक भेट
ओमराजेंच्या निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, तर ठाकरे गटाची मनधरणी सुरूच
Omraje Nimbalkar | ओमराजेंच्या एका निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, रोखण्यासाठी ठाकरे गटाची मनधरणी सुरूच
घरात बसून पक्ष वाढत नाही तर...; गिरीष महाजनांचा उद्धव ठाकरेंना टोला
घरात बसून पक्ष वाढत नाही तर...; गिरीष महाजनांचा उद्धव ठाकरेंना टोला
शिंदे हे अमित शाहांचे टेस्ट ट्यूब बेबी; संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut UNCUT | शिंदे हे अमित शाहांचे टेस्ट ट्यूब बेबी; संजय राऊतांचा हल्लाबोल
15 कोटी घेतलेत, विकासाच्या गप्पा मारू नका! राऊतांचा मोठा खुलासा
Sanjay Raut | 15 कोटी घेतलेत, विकासाच्या गप्पा मारू नका! राऊतांचा मोठा खुलासा
राष्ट्रवादीला मोठा धक्का! बडा नेता भाजपच्या वाटेवर....
मोठी बातमी! राष्ट्रवादीला मोठा धक्का! बडा नेता भाजपच्या वाटेवर; तेव्हा गेलो असतो तर..म्हणत व्यक्त केली खंत
ठाकरे की शिंदे? आज ठरणार ओमराजेंचा राजकीय मार्ग! काही तासांत....
ठाकरे की शिंदे? आज ठरणार ओमराजेंचा राजकीय मार्ग! काही तासांत मोठा निर्णय
अखेर मुंबईत पावसाची हजेरी! पहाटेपासून रिमझिम सरी, मुंबईकर सुखावले
Mumbai Rain Update | अखेर मुंबईत पावसाने लावली हजेरी! पहाटेपासून रिमझिम सरी, मुंबईकर सुखावले