AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

३० घरांचं गाव, २० विद्यार्थी झाले डॉक्टर; असंही एक डॉक्टरांचं गाव

कोण्या गावात धानाचे उत्पादन जास्त घेतले जाते. तर कोण्यात गावात सैनिकांत जाण्याचं प्रमाण जास्त आहे. असंच एक छोटसं गाव आहे. तेही फक्त ३० घरांचं.

३० घरांचं गाव, २० विद्यार्थी झाले डॉक्टर; असंही एक डॉक्टरांचं गाव
| Edited By: | Updated on: Aug 15, 2023 | 4:31 PM
Share

ठाणे : राज्यात सुमारे २७ हजार गावं आहेत. यापैकी काही गावं ही वेगवेगळ्या कारणासाठी प्रसिद्ध आहेत. कोण्या गावात आंबेचे उत्पादन जास्त घेतले जाते. कोण्या गावात धानाचे उत्पादन जास्त घेतले जाते. तर कोण्यात गावात सैनिकांत जाण्याचं प्रमाण जास्त आहे. असंच एक छोटसं गाव आहे. तेही फक्त ३० घरांचं पण, या गावाचं वैशिष्ट्ये म्हणजे २० जण डॉक्टर्स झालेत. त्यामुळे या गावाला आता डॉक्टरांचं गाव अशं म्हटलं जात आहे. आजपर्यंत सैनिकांचे गाव, अधिकाऱ्यांचे गाव आपण पाहिलीत. मात्र कल्याणमधील घारीवली गावाने डॉक्टरांचे गाव, अशी ओळख निर्माण केली आहे. या गावात २५ ते ३० घरे आहेत. गावातील बहुतांश कुटुंब शेती आणि इतर व्यवसाय करत उपजीविका भागवतात. मात्र शिक्षणाचे महत्व ओळखून ग्रामस्थांनी मुला-मुलींना उच्च दर्जाचे शिक्षण दिले. परिणामी या गावात २० विद्यार्थी वैद्यकीय पदव्या मिळवून डॉक्टर झाले आहेत. ग्रामस्थांनी या मुलाचे कौतुक म्हणून गावाच्या प्रवेशद्वारावरच डॉक्टरांचे गाव असा फलक लावला आहे.

घारीवली गावाचा आदर्श

आगरी समाज म्हटले की पदवीपर्यंतचे शिक्षण मुल कसेबसे पूर्ण करतात. हाताच्या बोटावर मोजण्याइतपत मुले उच्च शिक्षण घेतात. घारीवली गावातील मुलांनी मात्र एक वेगळाच आदर्श सर्व समाजापुढे निर्माण केला आहे. त्यांच्या कामाची पोचपावती आणि इतरांना त्यातून प्रेरणा मिळत आहे.

गावाच्या सीमेवर डॉक्टर्सची नावं

गावकऱ्यांनी मुलांच्या सन्मानार्थ त्यांच्या नावाचा फलक गावाच्या वेशीवर लावला आहे. सातारा, पुणे या भागात काही अशी गावे आहेत की त्या गावातील प्रत्येक घरातील एक तरी व्यक्ती हा लष्करात असतो. त्यामुळे सैनिकांचे गाव, जवानांचे गाव अशी ओळख त्या गावांना पडते.

वैद्यकीय सेवेत कार्यरत

ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवलीमधील 27 गावांतील घारीवली गावानेही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या गावातील मुलांनी शिक्षणात प्रगती करत वैद्यकीय शिक्षण घेतले. राज्यातील नकाशावर गावाची डॉक्टरांचे गाव अशी ओळख करुन दिली आहे. गावातील 20 जणांनी डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण केले. आज ते वैद्यकीय क्षेत्रात सुविधा देत आहेत. मुलांच्या या कामगिरीमुळे सर्वत्र कौतुक होत आहे.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.