AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

३० घरांचं गाव, २० विद्यार्थी झाले डॉक्टर; असंही एक डॉक्टरांचं गाव

कोण्या गावात धानाचे उत्पादन जास्त घेतले जाते. तर कोण्यात गावात सैनिकांत जाण्याचं प्रमाण जास्त आहे. असंच एक छोटसं गाव आहे. तेही फक्त ३० घरांचं.

३० घरांचं गाव, २० विद्यार्थी झाले डॉक्टर; असंही एक डॉक्टरांचं गाव
| Edited By: | Updated on: Aug 15, 2023 | 4:31 PM
Share

ठाणे : राज्यात सुमारे २७ हजार गावं आहेत. यापैकी काही गावं ही वेगवेगळ्या कारणासाठी प्रसिद्ध आहेत. कोण्या गावात आंबेचे उत्पादन जास्त घेतले जाते. कोण्या गावात धानाचे उत्पादन जास्त घेतले जाते. तर कोण्यात गावात सैनिकांत जाण्याचं प्रमाण जास्त आहे. असंच एक छोटसं गाव आहे. तेही फक्त ३० घरांचं पण, या गावाचं वैशिष्ट्ये म्हणजे २० जण डॉक्टर्स झालेत. त्यामुळे या गावाला आता डॉक्टरांचं गाव अशं म्हटलं जात आहे. आजपर्यंत सैनिकांचे गाव, अधिकाऱ्यांचे गाव आपण पाहिलीत. मात्र कल्याणमधील घारीवली गावाने डॉक्टरांचे गाव, अशी ओळख निर्माण केली आहे. या गावात २५ ते ३० घरे आहेत. गावातील बहुतांश कुटुंब शेती आणि इतर व्यवसाय करत उपजीविका भागवतात. मात्र शिक्षणाचे महत्व ओळखून ग्रामस्थांनी मुला-मुलींना उच्च दर्जाचे शिक्षण दिले. परिणामी या गावात २० विद्यार्थी वैद्यकीय पदव्या मिळवून डॉक्टर झाले आहेत. ग्रामस्थांनी या मुलाचे कौतुक म्हणून गावाच्या प्रवेशद्वारावरच डॉक्टरांचे गाव असा फलक लावला आहे.

घारीवली गावाचा आदर्श

आगरी समाज म्हटले की पदवीपर्यंतचे शिक्षण मुल कसेबसे पूर्ण करतात. हाताच्या बोटावर मोजण्याइतपत मुले उच्च शिक्षण घेतात. घारीवली गावातील मुलांनी मात्र एक वेगळाच आदर्श सर्व समाजापुढे निर्माण केला आहे. त्यांच्या कामाची पोचपावती आणि इतरांना त्यातून प्रेरणा मिळत आहे.

गावाच्या सीमेवर डॉक्टर्सची नावं

गावकऱ्यांनी मुलांच्या सन्मानार्थ त्यांच्या नावाचा फलक गावाच्या वेशीवर लावला आहे. सातारा, पुणे या भागात काही अशी गावे आहेत की त्या गावातील प्रत्येक घरातील एक तरी व्यक्ती हा लष्करात असतो. त्यामुळे सैनिकांचे गाव, जवानांचे गाव अशी ओळख त्या गावांना पडते.

वैद्यकीय सेवेत कार्यरत

ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवलीमधील 27 गावांतील घारीवली गावानेही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या गावातील मुलांनी शिक्षणात प्रगती करत वैद्यकीय शिक्षण घेतले. राज्यातील नकाशावर गावाची डॉक्टरांचे गाव अशी ओळख करुन दिली आहे. गावातील 20 जणांनी डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण केले. आज ते वैद्यकीय क्षेत्रात सुविधा देत आहेत. मुलांच्या या कामगिरीमुळे सर्वत्र कौतुक होत आहे.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.