AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

३० घरांचं गाव, २० विद्यार्थी झाले डॉक्टर; असंही एक डॉक्टरांचं गाव

कोण्या गावात धानाचे उत्पादन जास्त घेतले जाते. तर कोण्यात गावात सैनिकांत जाण्याचं प्रमाण जास्त आहे. असंच एक छोटसं गाव आहे. तेही फक्त ३० घरांचं.

३० घरांचं गाव, २० विद्यार्थी झाले डॉक्टर; असंही एक डॉक्टरांचं गाव
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Aug 15, 2023 | 4:31 PM
Share

ठाणे : राज्यात सुमारे २७ हजार गावं आहेत. यापैकी काही गावं ही वेगवेगळ्या कारणासाठी प्रसिद्ध आहेत. कोण्या गावात आंबेचे उत्पादन जास्त घेतले जाते. कोण्या गावात धानाचे उत्पादन जास्त घेतले जाते. तर कोण्यात गावात सैनिकांत जाण्याचं प्रमाण जास्त आहे. असंच एक छोटसं गाव आहे. तेही फक्त ३० घरांचं पण, या गावाचं वैशिष्ट्ये म्हणजे २० जण डॉक्टर्स झालेत. त्यामुळे या गावाला आता डॉक्टरांचं गाव अशं म्हटलं जात आहे. आजपर्यंत सैनिकांचे गाव, अधिकाऱ्यांचे गाव आपण पाहिलीत. मात्र कल्याणमधील घारीवली गावाने डॉक्टरांचे गाव, अशी ओळख निर्माण केली आहे. या गावात २५ ते ३० घरे आहेत. गावातील बहुतांश कुटुंब शेती आणि इतर व्यवसाय करत उपजीविका भागवतात. मात्र शिक्षणाचे महत्व ओळखून ग्रामस्थांनी मुला-मुलींना उच्च दर्जाचे शिक्षण दिले. परिणामी या गावात २० विद्यार्थी वैद्यकीय पदव्या मिळवून डॉक्टर झाले आहेत. ग्रामस्थांनी या मुलाचे कौतुक म्हणून गावाच्या प्रवेशद्वारावरच डॉक्टरांचे गाव असा फलक लावला आहे.

घारीवली गावाचा आदर्श

आगरी समाज म्हटले की पदवीपर्यंतचे शिक्षण मुल कसेबसे पूर्ण करतात. हाताच्या बोटावर मोजण्याइतपत मुले उच्च शिक्षण घेतात. घारीवली गावातील मुलांनी मात्र एक वेगळाच आदर्श सर्व समाजापुढे निर्माण केला आहे. त्यांच्या कामाची पोचपावती आणि इतरांना त्यातून प्रेरणा मिळत आहे.

गावाच्या सीमेवर डॉक्टर्सची नावं

गावकऱ्यांनी मुलांच्या सन्मानार्थ त्यांच्या नावाचा फलक गावाच्या वेशीवर लावला आहे. सातारा, पुणे या भागात काही अशी गावे आहेत की त्या गावातील प्रत्येक घरातील एक तरी व्यक्ती हा लष्करात असतो. त्यामुळे सैनिकांचे गाव, जवानांचे गाव अशी ओळख त्या गावांना पडते.

वैद्यकीय सेवेत कार्यरत

ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवलीमधील 27 गावांतील घारीवली गावानेही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या गावातील मुलांनी शिक्षणात प्रगती करत वैद्यकीय शिक्षण घेतले. राज्यातील नकाशावर गावाची डॉक्टरांचे गाव अशी ओळख करुन दिली आहे. गावातील 20 जणांनी डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण केले. आज ते वैद्यकीय क्षेत्रात सुविधा देत आहेत. मुलांच्या या कामगिरीमुळे सर्वत्र कौतुक होत आहे.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत