AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रचंड गरम होतंय, पण पुढच्या चार दिवसात बदल होणार, तापमानात मोठी घट होणार, कारण…

महाराष्ट्रात उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा देणारी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ झालेली बघायला मिळाली. पण आता पुढच्या चार दिवसात तापमानात मोठी घट होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

प्रचंड गरम होतंय, पण पुढच्या चार दिवसात बदल होणार, तापमानात मोठी घट होणार, कारण...
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Apr 19, 2023 | 6:19 PM
Share

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात उकाड्यामुळे नागरीक हैराण झाले आहेत. सूर्य अक्षरश: आग ओकतोय की काय, अशी परिस्थिती आहे. राज्यासह देशभरात तापमानात प्रचंड वाढ झालेली बघायला मिळतेय. विशेष म्हणजे तापमान वाढीमुळे अनेक नागरिकांना उष्माघाताचा त्रास होतोय. अनेकांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचं देखील समोर आलं आहे. नवी मुंबईच्या खारघर येथे आयोजित महाराष्ट्र भूषण पुरस्कारातील घटना ही ताजी आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 14 भाविकांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे उष्माघात किती भयंकर आहे याचे गांभीर्य पुन्हा एकदा जगासमोर आलं आहे. विशेष म्हणजे या रणरणत्या उन्हाळ्यातील एक दिलासादायक बातमी आता समोर आली आहे. राज्यातील नागरिकांची पुढच्या चार दिवसांसाठी तरी उकाड्यापासून सुटका होणार आहे.

राज्यातील नागरिकांची उकाड्यापासून होणार सुटका. उद्यापासून पुढच्या 4 दिवसात राज्यातील उष्णतेत मोठी घट होणार आहे. त्यामुळे उन्हाने हैराण झालेल्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. संपूर्ण राज्यातील कमाल तापमानात उद्यापासून पुढील 4 दिवस घट होणार आहे. उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पुढील चार दिवस राज्यभरातील तापमानात मोठी घट होणार असल्याची माहिती पुणे वेध शाळेचे प्रमुख डॉ. के एस होसाळीकर यांनी दिली आहे.

दुसऱ्या बाजूला, गेल्या काही दिवसात पुण्याचे तापमान 40 अंशाच्यावर जात आहे. पुण्यात एप्रिल किंवा मे महिन्यात 40 अंश तापमान बऱ्याचदा नोंदी झाल्या आहेत. 40 अंशापेक्षा जास्त तापमान गेल्यावर नागरिकांनी काळजी घ्यावी. दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत लोकांनी गरज नसेल तर बाहेर पडू नये, असे देखील आवाहन हवामान विभागाने केले आहे.

राज्यात सातत्याने नैसर्गिक संकट

राज्यातील नैसर्गिक वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. राज्यात एकीकडे उष्णतेची लाट आलीय. दुपारच्या वेळी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना अक्षरश: गरम वाफ लागतेय की काय, इतक्या तीव्र उन्हाच्या झळा बसत आहेत. इतकं भयानक ऊन बघायला मिळतंय. उन्हामुळे तब्येत बिघडण्याची भीती आहे. त्यामुळे अनेकजण दुपारच्या वेळी घराबाहेर न पडणं पसंत करत आहेत. पण अनेकांना कामानिमित्त घराबाहेर पडावंच लागतं. याशिवाय घरातही उकाड्याने अनेक नागरीक हैराण झाले आहेत. तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अनेक भागांमधील पारा तर 40 अंश सेल्सिअसच्याही पार गेलेला बघायला मिळाला.

विशेष म्हणजे एकीकडे तापमानात वाढ होताना दिसत आहे. तर दुसरीकडे काही भागांमध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना हवालदिल केलं आहे. अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. या अवकाळी पावसामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं आहे. शेतकऱ्यांची सरकारकडे मदतीसाठी आशा आहे. सरकार आपल्याला उभं राहण्यासाठी तरी मदत देईल, अशी सरकारला आशा आहे. पण निसर्गाचं हे दृष्टचक्र कधी थांबणार? असा प्रश्न आहे.

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.