AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जितेंद्र आव्हाडांच्या कार्यक्रमापूर्वी कार्यकर्त्यांमध्ये राडा, उल्हासनगरमध्ये काय घडलं?

उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीची कार्यकारणी जाहीर करण्याच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी राडा केला. यावेळी कार्यकर्त्यानी खुर्च्या फेकून खुर्च्यांची तोडफोड केल्याने काही काळ गोंधळ उडाला होता.

जितेंद्र आव्हाडांच्या कार्यक्रमापूर्वी कार्यकर्त्यांमध्ये राडा, उल्हासनगरमध्ये काय घडलं?
कार्यक्रमाच्या आगोदर फेकल्या खुर्च्या
| Edited By: महेश घोलप | Updated on: Feb 19, 2022 | 8:39 AM
Share

उल्हासनगर – जितेंद्र आव्हाडांचा (jitendra ahwad) उल्हासनगर (ulhasnagar) कार्यकारणी जाहीर करण्याचा कार्यक्रम आजोजित करण्यात आला होता. परंतु त्या कार्यक्रमाला अधिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. तिथं अचानक कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. त्यामध्ये काही कार्यकर्त्यांनी रागाच्या भरात तिथल्या अनेक खुर्च्याची तोडफोड केल्याचं व्हिडीओत दिसत आहे. विशेष म्हणजे जितेंद्र आव्हाड हे कार्यक्रमाला उपस्थित राहण्या आगोदर हा गोंधळ झाला आहे. त्यामुळे कार्यक्रमात हा गोंधळ का झाला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळी आज मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमले होते. तसेच आजच्या कार्यक्रमात कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार होती. खुर्च्या इकडे तिकडे फेकल्यावरून नाराज कार्यकर्त्यांनी असं केलं असावं असं वाटतंय. त्यावर अद्याप राडा का झाला यावर कोणताही खुलासा आलेला नाही. तिथं जमलेले सगळे कार्यकर्ते हे राष्ट्रवादी पक्षाचे (national congress party) असल्याने तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये एकामेकात मतभेद असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

भाजपवरती टीका

काल झालेल्या राष्टवादी कार्यकारीणीच्या बैठकीत जितेंद्र आव्हाड यांनी महापालिका निवडणुकीच्या अनुशंगाने तयारी सुरू असल्याचे जाहीर केले. तसेच ठाणे जिल्ह्यात सगळीकडे आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले. काल झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांची हजेरी होती. तसेच जितेंद्र आव्हाड यांनी भाजपच्या प्रत्येक धोरणावर टीका केली. म्हणाले की, आता अनेक तरूण बेरोजगार त्यांच्यासाठी तरूणांनी काय केले. त्यांचं सरकार केंद्रात सत्तेत आल्यापासून नेमकं काय करतंय असा मला देखील प्रश्न पडलाय. तसेच महाविकास आघाडी सरकारचं महाराष्ट्रातील भविष्यातलं धोरण कसं असेल यावर सुध्दा त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यामुळे होणा-या महापालिकेच्या निवडणुकीत इथं महाविकास आघाडीचं सरकार असेल असंही त्यांनी तिथं सांगितलं आहे. केंद्राच्या नेतृत्वाकडून नुसत्या बाता मारल्या जातात. प्रत्यक्षात अंमलबंजावणी काहीचं होत नाही.

कार्यकारणीच्या बैठकीत नेमकं काय झालं

उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीची कार्यकारणी जाहीर करण्याच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी राडा केला. यावेळी कार्यकर्त्यानी खुर्च्या फेकून खुर्च्यांची तोडफोड केल्याने काही काळ गोंधळ उडाला होता. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याच्या पूर्वी हा सगळा गोंधळ झाला. या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती. मात्र नक्की हा गोंधळ कशामुळे झाला हे अजून स्पष्ट झालेलं नाही. या गोंधळानंतर जितेंद्र आव्हाडांकडून अद्याप कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही.

आदित्य ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण, कसा आहे औरंगाबादेतला पुतळा?

बीड जिल्ह्याची बदनामी सुरु, पंकजांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचा आरोप; बीडमधील मुलींच्या जन्मदराबाबतची माहिती चुकीची असल्याचाही दावा

जयप्रभा स्टुडिओ वादात नवं ट्विस्ट, राजेश क्षीरसागर यांची मागणी काय?

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....