AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदित्य ठाकरे इर्शाळवाडीत दाखल; म्हणाले, नागरिक सुखरुप असावेत, एवढीच अपेक्षा!

Aditya Thackeray on Raigad Irshalgad Landslide आदित्य ठाकरे यांच्याकडून इर्शाळवाडीतील नागरिकांचं सांत्वन; पाहा काय म्हणाले...

आदित्य ठाकरे इर्शाळवाडीत दाखल; म्हणाले, नागरिक सुखरुप असावेत, एवढीच अपेक्षा!
| Updated on: Jul 20, 2023 | 3:43 PM
Share

इर्शाळवाडी, रायगड | 20 जुलै 2023 : रायगडमधल्या इर्शाळवाडीमध्ये दरड कोसळ्याची घटना घडली आहे. NDRF च्या पथकाकडून युद्ध पातळीवर या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे. या ठिकाणी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे पोहोचले आहेत. स्थानिक नागरिकांशी संवाद साधत ते धीर देत आहेत. या नागिरकांचं आदित्य ठाकरे सांत्वन करत आहेत. यावेळी आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

अनिल परब आणि सुनील प्रभू देखील आदित्य ठाकरे यांच्यासोबत इर्शाळवाडीत आहेत. इर्शाळवाडी गावाच्या पायथ्याशी दाखल ठाकरे गटाचे हे नेते दाखल झाले आहेत.

इर्शाळवाडी दरड दुर्घटनेबाबत आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दुर्घटनास्थळी गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे. इर्शाळगड इथून थोड्या अंतरावर आहे. मात्र तिथं गर्दी होता कामा नये. आपण तिकडे गेल्यानं मदत कार्यात अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आपण सगळ्यांनी इथंच थांबून होईल ती मदत करावी, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

इर्शाळवाडीत घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. या गावातील नागरिक सुखरुप असावेत, एवढीच अपेक्षा एक सध्या अपेक्षा आहे, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणालेत.

इर्शाळवाडीतील परिस्थिती गंभीर आहे. अंबादास दानवे आणि मी, सुनील प्रभू वरती त्या गावात जाऊन आलो. मदतकार्य सुरु आहे. मदत कार्याला अडथळा नको म्हणून आम्ही खाली आलो आहोत. नागरिकांना धीर देण्याचा, सांत्वन करण्याता प्रयत्न केला. देवाकडे प्रार्थना करावी की सगळे सुखरुप असावेत, असं आदित्य ठाकरे म्हणालेत.

ही दुर्घटना सरकारला टाकता आली असती असं वाटतं का? आधीच पुनर्वसन व्हायला पाहिजे होतं असं वाटतं का? असा सवाल विचारला असता ही राजकारण करण्याची जागा नाही. या सगळ्याबद्दल आम्ही विधानसभेत बोलू. पण आता नागरिकांना मदत मिळणं गरजेचं आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया

विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील इर्शाळनाडीत दाखल झाले आहेत. तिथे त्यांनी घटनेची पाहणी केली. तसंच आपत्तीग्रस्त नागरिकांचं त्यांनी सांत्वन केलं.

नागरिकांना लवकरात लवकर मदत मिळणं गरजेचं आहे. NDRF चे जवान त्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. त्यांना स्थानिकही मदत करत आहेत. लवकरात लवकर मदत पोहोचून नागरिकांची सूटका व्हावी, एवढीच सध्या अपेक्षा आहे, असं अंबादास दानवे म्हणालेत.

प्रशासनाने दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबीयांना 8108195554 या नंबरवर संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे.

Follow Us
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.
मोठं संकट? वैजापूरमध्ये संध्याकाळी अचानक विमानाच्या घिरट्या...
मोठं संकट? वैजापूरमध्ये संध्याकाळी अचानक विमानाच्या घिरट्या....
अशोक खरात प्रकरणात नवी नावं समोर; संजय राऊतांची प्रतिक्रिया चर्चेत
अशोक खरात प्रकरणात नवी नावं समोर; संजय राऊतांची प्रतिक्रिया चर्चेत.
इराण-अमेरिका तणावावरून राऊतांचा ट्रम्पवर निशाणा; भाजपवरही जोरदार टीका
इराण-अमेरिका तणावावरून राऊतांचा ट्रम्पवर निशाणा; भाजपवरही जोरदार टीका.
भोंदूबाबा खरातला आमदार करायचं होतं? तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा काय?
भोंदूबाबा खरातला आमदार करायचं होतं? तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा काय?.
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.