AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दीडतास पायी चालत मुख्यमंत्री शिंदे इर्शाळवाडी दुर्घटनास्थळी, अधिकाऱ्यांना सूचना तर स्थानिकांना धीर; पाहा काय म्हणाले?

Raigad Irshalwadi Landslide : मलब्याखाली दबलेलं गाव... अन् युद्धपातळीवर सुरू असललेलं बचावकार्य; इर्शाळवाडी दुर्घटनेच्या ठिकाणची आता परिस्थिती काय?

दीडतास पायी चालत मुख्यमंत्री शिंदे इर्शाळवाडी दुर्घटनास्थळी, अधिकाऱ्यांना सूचना तर स्थानिकांना धीर; पाहा काय म्हणाले?
| Updated on: Jul 20, 2023 | 3:41 PM
Share

इर्शाळवाडी, रायगड | 20 जुलै 2023 : रायगड जिल्ह्यात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. खालापूरमधल्या इर्शाळवाडी गावात ही दुदैवी घटना घटली आहे. या घटनेची माहिती मिळताच आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी दाखल झाले. सकाळपासूनच ते या संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून होते. अधिकाऱ्यांना आणि स्थानिक प्रशासनाला ते सूचना देत होते. खालापूरमध्ये त्यांनी एक बैठकही घेतली. मात्र ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदे सध्या पोहोचले आहेत. तिथे ते पाहणी करत आहेत.

पायी चालत मुख्यमंत्री शिंदे इर्शाळवाडीत दाखल

इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी गावात दरड कोसळण्याची घटना घडली आहे. मात्र त्या ठिकीणी पोहोचण्यासाठी पक्का रस्ता नाहीये. पायी वाटेने इर्शाळवाडी गावात जावं लागतं. दीड तास पायी चालत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुर्घटनाग्रस्त भागात पोहोचले.

इर्शाळवाडी गावात दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. अमित शाह यांनी इर्शाळवाडीतील दुर्घटनेची विचारपूस केली. त्यांचा सकाळीच मला फोन आला होता. केंद्राकडून आवश्यक असलेली सर्व मदत मिळण्याबाबत त्यांनी आश्वस्त केलं आहे, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.

इर्शाळवाडी दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटूंबीयांनी सरकारकडून पाच लाख रूपयांची मदत देणार असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं आहे.

इर्शाळवाडी दुर्घटनेत जखमी झालेल्या नागरिकांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे. तसंच त्यांच्या तात्पुरत्या राहण्याचीही सोय करण्यात आली आहे. तसंच इर्शाळवाडीतील नागरिकांचं सरकारकडून लवकरच पुनर्वसन करण्यात येणार आहे, असंही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं.

इर्शाळवाडी दुर्घटनेबाबात एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. तसंच काही फोटोही शेअर केले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ट्विट

इर्शाळवाडी येथील दरड कोसळलेल्या दुर्घटना स्थळाच्या दिशेने चालत असताना वाटेत काही ग्रामस्थ मला भेटले. त्यांची आस्थेने विचारपूस करून प्रत्यक्ष परिस्थिती देखील जाणून घेतली. तसेच त्यांना धीर देत सरकार तुम्हाला शक्य ती सारी मदत करेल असे आश्वस्त केले.

मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढणे, शक्य तेवढ्या नागरिकांचे जीव वाचविणे याला राज्य सरकारचे प्राधान्य आहे. त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धार आम्ही केला आहे.

इर्शाळवाडीतील सध्याची स्थिती काय?

इर्शाळवाडी गावात दरड कोसळल्याची घटना घडून 15 तास उलटले आहेत. या दुर्घटनेत 17 घरं मलब्याखाली दबली गेली आहेत. 34 जणांना बाहेर काढण्यात NDRF च्या जवानांना यश आलं आहे. आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झालाय. तर 150 नागरिक बेपत्ता आहेत. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे इथे बचावकार्यात अडथळे येत आहेत.

प्रशासनाने दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबीयांना 8108195554 या नंबरवर संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.