AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘जे कधीच राहिले नाही कुणाचे मिंधे, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे’, रामदास आठवलेंची शेरोशायरीतून फटकेबाजी

"ज्यावेळेला मी येतो चंद्रपूरमध्ये, त्यावेळेला माझ्या आठवणीमध्ये येतं सफल झालेलं चंद्रयान, साऱ्या जगाचं असतं भारताकडे ध्यान. या देशाची 140 कोटी जनता आहे नरेंद्र मोदींची फॅन, या निवडणुकीत लावणार आहोत आम्ही इंडिया आघाडीवर बॅन", अशी शेरोशायरी रामदास आठवलेंनी आपल्या भाषणात केली.

'जे कधीच राहिले नाही कुणाचे मिंधे, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे', रामदास आठवलेंची शेरोशायरीतून फटकेबाजी
केंद्रीय मंत्री रामदास आठवले
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Apr 08, 2024 | 7:26 PM
Share

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी चंद्रपूरमध्ये आयोजित महायुतीच्या सभेत आपल्या भाषणात जोरदार फटकेबाजी केली. त्यांनी शेरोशायरीतून फटकेबाजी केली. “आपण सर्वजण मोठ्या संख्येने चंद्रपूरचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार, त्याचबरोबर गडचिरोली-चिमूरचे भाजपचे उमेदवार, ज्यांना नेते म्हणण्याची गरज नाही त्यांच्या नावातच नेते आहेत ते अशोक नेते, या दोन्ही नेत्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येणार आहेत”, असं रामदास आठवले म्हणाले.

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जे कधीच राहिले नाहीत कुणाचे मिंधे ते एकनाथ शिंदे, एकनाथ शिंदे धाडसी माणूस, चाळीस प्लस 10 आमदारांना घेऊन… आता या ठिकाणी सुधीरभाऊ आलेले आहेत. आपण सर्वांनी जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारतचं गीत गाऊ, कारण या ठिकाणी आलेले आहेत सुधीर भाऊ. आपल्या सर्वांचे लाडके नेते इथे आलेले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंक सक्रिय राजकारणी आहेत. अत्यंत शक्तीशाली राजकारणी आहेत. या महाराष्ट्रात भाजप आणि महायुतीला मजबूत करण्यात त्यांचा वाटा मोठा आहे. महाराष्ट्रातील महायुती मजबूत करण्यामागे देवेंद्र फडणवीस यांचा फारच मोठा आहे वाटा, कारण त्यांनी काढलेला आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा काटा“, अशी फटकेबाजी रामदास आठवलेंनी केली.

आठवलेंची भाषणातून शेरोशायरी

“तिकडे राहून काही उपयोग नव्हता. मी पूर्वी तिकडे होतो पण तिकडे राहून काही उपयोग नव्हता. नरेंद्र मोदींचं नेतृत्व विकासाच्या दिशेने पुढे जाणारं आहे. ज्यावेळेला मी येतो चंद्रपूरमध्ये, त्यावेळेला माझ्या आठवणीमध्ये येतं सफल झालेलं चंद्रयान, साऱ्या जगाचं असतं भारताकडे ध्यान. या देशाची 140 कोटी जनता आहे नरेंद्र मोदींची फॅन, या निवडणुकीत लावणार आहोत आम्ही इंडिया आघाडीवर बॅन“, अशी शेरोशायरी रामदास आठवलेंनी केली.

“इंडिया आघाडीवाले रोज शिव्या देतात. तुम्हाला द्याच्या तेवढ्या शिव्या द्या. पण त्या शिव्यांना जनता हे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आम्ही 400 पारचा नारा दिला आहे, 400 पार, आम्ही करणार आहोत 400 पार, मग का होणार नाही काँग्रेसचे हाल? काँग्रेस भ्रष्ट राजकारण करुन सत्तेवर राहिले, या देशाला धुळीला मिळवण्याचं काम केलं. नरेंद्र मोदी या देशात उभा राहिले. भ्रष्ट राजकारण्यांना खाली उचलण्याचा विडा त्यांनी उचलला. आम्ही सर्वांनी त्यांना सहकार्य केलं आणि काँग्रेसला चकणाचूर करण्याचं काम 2019च्या निवडणुकीत झालं”, असं रामदास आठवले म्हणाले.

“या दोन उमेदवारांच्या प्रचारासाठी माझा रिपब्लिकन पक्ष तुमच्यासोबत आहे. बाबासाहेबांची जनता तुमच्याबरोबर आहे. या देशाचं संविधान कुणीच बदलणार नाही. जाणीवपूर्वक संविधान बदलणार अशी अफवा पसरवली जात आहे. पण मी तुम्हाला सांगतो, नरेंद्र मोदी संविधान मजबूत करणार नेते आहेत. त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. महाराष्ट्रात 48 पैकी 48 जागा जिंकून आपण नरेंद्र मोदींना मदत करायची आहे”, असं आवाहन रामदास आठवलेंनी केलं.

Follow Us
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन