AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सन्माननीय राजसाहेबांना…’, पाऊल पुढे टाकण्याआधी राज ठाकरेंसाठी एक खास पोस्ट

महाराष्ट्रात मागच्या दोन दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? ही चर्चा सुरु झाली आहे. विविध वृत्त वाहिन्यांवर यावरुन डिबेटचे कार्यक्रम होत आहेत. आता महाराष्ट्र सरकारमधील एका मंत्र्यांची सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाली आहे. 'त्यामुळे आपुलकीचा एकच सल्ला देतो - जरा....'

'सन्माननीय राजसाहेबांना...', पाऊल पुढे टाकण्याआधी राज ठाकरेंसाठी एक खास पोस्ट
राज ठाकरे-उद्धव ठाकरेImage Credit source: गुगल
| Updated on: Apr 21, 2025 | 9:22 AM
Share

महाराष्ट्रात सध्या, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं राजकीय मनोमिलन होणार का? ही चर्चा सुरु झाली आहे. विचारधारा, मुद्दे समान असूनही गेली कित्येक वर्ष या दोन्ही चुलत बंधुंनी परस्पराविरोधात राजकारण केलं आहे. सध्याच्या महाराष्ट्रातील राजकीय स्थितीमध्ये दोघांचा जनाधार घटलेला आहे. अशावेळी हे दोन्ही बंधू एकत्र आल्यास महाराष्ट्रातील राजकीय चित्र बदलू शकतं, असं अनेकांना वाटतं. ही चर्चा सुरु झाली, ती राज ठाकरे यांनी मुलाखतीत केलेल्या एका विधानामुळे. “महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं, वाद या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. एकत्र येणं, एकत्र राहणं, यात कठीण गोष्ट आहे, असं मला वाटत नाही. पण विषय फक्त इच्छेचा आहे. माझ्या एकट्याच्या इच्छेचा किंवा माझ्या स्वार्थाचा विषय नाही. आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेच आहे. मी ते पाहतो आहे” असं राज ठाकरेंनी महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीच्या प्रश्नावर उत्तर दिलं.

राज यांनी टाळी देण्यासाठी हात पुढे करताच, दुसऱ्याबाजूने लगेचच उद्धव ठाकरे यांनी सुद्धा प्रतिसाद दिला. मराठी माणसासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी उद्धव ठाकरे यांनी सुद्धा एकत्र येण्याची तयारी दर्शवली. पण त्यांनी एक अट ठेवली. “महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे. पण या चोरांना गाठीभेटी आणि कळत न कळत गाठीभेटी आणि त्यांचा प्रचार करायचा नाही. ही पहिली शपथ घ्यायची शिवाजी महाराजांची. मग टाळी देण्याची हाळी द्यायची” असं उद्धव ठाकरे म्हणाले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र हितासाठी एकत्र येण्याची तयारी दर्शवताच विविध चर्चा, प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली.

‘राजसाहेबांना एक आपुलकीचा सल्ला’

दोन्ही ठाकरे बंधु एकत्र आल्यास महाराष्ट्रातील राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो? त्याचे फायदे-तोटे याचं विश्लेषण सुरु झालं. आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी X वर एक पोस्ट केली आहे. “सन्माननीय राजसाहेबांना एक आपुलकीचा सल्ला. उबाठा गटाच्या प्रमुखांची निती ही ‘वापरा आणि फेकून द्या’ ही राहिलेली आहे. स्वत:चा स्वार्थ साधुन झाला की त्यांना रक्ताची नाती सुद्धा नकोशी होतात आणि याचा प्रत्यय खुद्द सन्माननीय राजसाहेब ठाकरेंना देखील आहे” असं योगेश कदम यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Follow Us
विद्यार्थिनींचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
नागपूरमधील विद्यार्थिनींचा संघर्ष: बस सेवेच्या मागणीचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत: मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
राज ठाकरंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, काय घडलं?
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, असं काय घडलं?
राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
संजय राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे...
ताडदेव गृहप्रकल्प वाद; मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे नेते थेट...
अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा विलंबावर पलटवार
संसदीय वादंग: अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा १९ दिवसांच्या विलंबावर पलटवार
मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा
Manoj Jarange | मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा; मुंबईत मराठ्यांना येण्याचे आवाहन
असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद अंतिम टप्प्यात. असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण
धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणी: धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा
मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड
भावेश कावरेच्या वादग्रस्त जाहिरातीवरून राज्यात संताप: मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड