AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नांदेडमध्ये नागरिकांचा रास्ता रोको, हिमायतनगर ते किनवट महामार्गाचे रखडलेले काम पूर्ण करण्याची मागणी

स्त्याच्या कामासाठी होणारी लोकांची हेळसांड थांबली पाहिजे. येत्या 15 ते 20 दिवसांत रस्त्याच्या कामाने वेग घेतला नाही तर आणखी तीव्र आंदोलन करणार असा इशारा माधवराव पाटील यांनी दिला आहे.

नांदेडमध्ये नागरिकांचा रास्ता रोको, हिमायतनगर ते किनवट महामार्गाचे रखडलेले काम पूर्ण करण्याची मागणी
Image Credit source: TV9 Marathi
Reporter Rajiv Giri
Reporter Rajiv Giri | Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Mar 05, 2022 | 2:33 PM
Share

नांदेडः शहरातील महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात हिमायतनगरमध्ये नागरिकांनी (Nanded Agitation) मोठं आंदोलन छेडलं. हिमायतनगर ते किनवट या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे हिमायत नगर (Himayat Nagar) शहरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून येथून प्रवास करणाऱ्यांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. चांगल्या रस्त्याच्या अभावी प्रवाशांचे हाल होत आहेत. याविरोधात आज नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन छेडले. यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिक एकत्र आल्यामुळे वाहतूक ठप्प (Traffic jam) झाली होती.

Nanded Rasta Roko

अनेक वर्षांपासून काम रखडले, नागरिक त्रस्त

हिमायतनगर ते किनवट या राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडल्याने हिमायतनगर शहरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलय तसेच या रस्त्याअभावी प्रवाश्यांचे हाल होत आहेत. हायवेचे रखडलेले हे काम तातडीने पूर्ण करावे यासाठी स्थानिकांनी प्रशासनाला वेळोवेळी विनंत्या केल्या, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे शेकडोंच्या संख्येने नागरिक आज रस्त्यावर उतरले आहेत. या रास्ता रोको आंदोलनाचे नेतृत्व स्थानिक आमदार आमदार माधवराव पाटील जवळगांवकर हे करत आहेत.

काय म्हणाले आमदार?

या आंदोलनाचं नेतृत्व माधवराव पाटील जळगावकर करत आहेत. त्यांनी प्रशासनाला इशारा देताना म्हटले की, रस्त्याचे काम वेगाने पूर्ण झाले पाहिजे. येत्या पावसाळ्याच्या आत तत्काळ वेगाने पूर्ण व्हावा, अशी अपेक्षा आहे. लोकांच्या सेवेसाठी हे काम पूर्ण करावे. रस्त्याच्या कामासाठी होणारी लोकांची हेळसांड थांबली पाहिजे. येत्या 15 ते 20 दिवसांत रस्त्याच्या कामाने वेग घेतला नाही तर आणखी तीव्र आंदोलन करणार असा इशारा माधवराव पाटील यांनी दिला आहे.

इतर बातम्या-

Manipur Election : मणिपूरमध्ये 22 जागांसाठी मतदान सुरू, दुसऱ्या टप्प्यासाठी 1247 मतदान केंद्र सज्ज

ओबीसी आरक्षणावर राष्ट्रीय ओबीसी महासंघ आक्रमक! अध्यक्ष तायवाडे यांनी सांगितलं पुढील पाऊल काय असणार

Follow Us
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव....
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार.
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?.
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल.....
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल......
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ..
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ...
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार.
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको.
पंतप्रधानांच्या नेदरलँड दौऱ्यात 17 करारांवर स्वाक्षऱ्या, सामान्यांना..
पंतप्रधानांच्या नेदरलँड दौऱ्यात 17 करारांवर स्वाक्षऱ्या, सामान्यांना...
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा.
मोदींना लिहिलेल्या पत्रावरून खोत- पडळकरांचा पवारांना खोचक टोला
मोदींना लिहिलेल्या पत्रावरून खोत- पडळकरांचा पवारांना खोचक टोला.