AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नांदेडमध्ये नागरिकांचा रास्ता रोको, हिमायतनगर ते किनवट महामार्गाचे रखडलेले काम पूर्ण करण्याची मागणी

स्त्याच्या कामासाठी होणारी लोकांची हेळसांड थांबली पाहिजे. येत्या 15 ते 20 दिवसांत रस्त्याच्या कामाने वेग घेतला नाही तर आणखी तीव्र आंदोलन करणार असा इशारा माधवराव पाटील यांनी दिला आहे.

नांदेडमध्ये नागरिकांचा रास्ता रोको, हिमायतनगर ते किनवट महामार्गाचे रखडलेले काम पूर्ण करण्याची मागणी
Image Credit source: TV9 Marathi
Reporter Rajiv Giri
Reporter Rajiv Giri | Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Mar 05, 2022 | 2:33 PM
Share

नांदेडः शहरातील महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात हिमायतनगरमध्ये नागरिकांनी (Nanded Agitation) मोठं आंदोलन छेडलं. हिमायतनगर ते किनवट या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे हिमायत नगर (Himayat Nagar) शहरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून येथून प्रवास करणाऱ्यांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. चांगल्या रस्त्याच्या अभावी प्रवाशांचे हाल होत आहेत. याविरोधात आज नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन छेडले. यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिक एकत्र आल्यामुळे वाहतूक ठप्प (Traffic jam) झाली होती.

Nanded Rasta Roko

अनेक वर्षांपासून काम रखडले, नागरिक त्रस्त

हिमायतनगर ते किनवट या राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडल्याने हिमायतनगर शहरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलय तसेच या रस्त्याअभावी प्रवाश्यांचे हाल होत आहेत. हायवेचे रखडलेले हे काम तातडीने पूर्ण करावे यासाठी स्थानिकांनी प्रशासनाला वेळोवेळी विनंत्या केल्या, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे शेकडोंच्या संख्येने नागरिक आज रस्त्यावर उतरले आहेत. या रास्ता रोको आंदोलनाचे नेतृत्व स्थानिक आमदार आमदार माधवराव पाटील जवळगांवकर हे करत आहेत.

काय म्हणाले आमदार?

या आंदोलनाचं नेतृत्व माधवराव पाटील जळगावकर करत आहेत. त्यांनी प्रशासनाला इशारा देताना म्हटले की, रस्त्याचे काम वेगाने पूर्ण झाले पाहिजे. येत्या पावसाळ्याच्या आत तत्काळ वेगाने पूर्ण व्हावा, अशी अपेक्षा आहे. लोकांच्या सेवेसाठी हे काम पूर्ण करावे. रस्त्याच्या कामासाठी होणारी लोकांची हेळसांड थांबली पाहिजे. येत्या 15 ते 20 दिवसांत रस्त्याच्या कामाने वेग घेतला नाही तर आणखी तीव्र आंदोलन करणार असा इशारा माधवराव पाटील यांनी दिला आहे.

इतर बातम्या-

Manipur Election : मणिपूरमध्ये 22 जागांसाठी मतदान सुरू, दुसऱ्या टप्प्यासाठी 1247 मतदान केंद्र सज्ज

ओबीसी आरक्षणावर राष्ट्रीय ओबीसी महासंघ आक्रमक! अध्यक्ष तायवाडे यांनी सांगितलं पुढील पाऊल काय असणार

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...