AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तर फडणवीसांचं 90 टक्के मंत्रीमंडळ रिकामं होईल – संजय राऊत

महायुती सरकारच्या मंत्र्याचा शपथविधी काल पार पडला, मात्र त्यामध्ये राज्यातील अनेक ताकदवान नेत्यांना वगळण्यात आलं, मंत्रीपद देण्यात आलंच नाही, त्यावरून राऊतांनी टोला लगावत महायुती सरकारवर टीका केली. जे आमच्याकडून सोडून गेले ते सत्ता, पद आणि पैसा या मोहासाठी गेलेत. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे, अकार्यक्षमतेचे आरोप होते अशा अनेकांना वगळण्यात आलं .

तर फडणवीसांचं 90 टक्के मंत्रीमंडळ रिकामं होईल - संजय राऊत
संजय राऊतांचा महायुतीवर निशाणाImage Credit source: tv9
| Updated on: Dec 16, 2024 | 9:51 AM
Share

सुधीर मुनगंटीवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, दीपक केसरकर यांच्यासारख्या ताकदवान नेत्यांना मंत्रीपद मिळालीच नाहीत. अडीच-अडीच वर्षां फॉर्म्युला ठरल्याचं ऐकू येतंय. खरंतर त्यांनी सहा-सहा महिन्यांचा फॉर्म्युला केला असता तर सगळ्यांना मंत्रीपदं मिळाली असती असा टोला संजय राऊत यांनी लगावला. महायुती सरकारच्या मंत्र्याचा शपथविधी काल पार पडला, मात्र त्यामध्ये राज्यातील अनेक ताकदवान नेत्यांना वगळण्यात आलं, मंत्रीपद देण्यात आलंच नाही, त्यावरून राऊतांनी टोला लगावत महायुती सरकारवर टीका केली. जे आमच्याकडून सोडून गेले ते सत्ता, पद आणि पैसा या मोहासाठी गेलेत. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे, अकार्यक्षमतेचे आरोप होते अशा अनेकांना वगळण्यात आलं आहे. छगन भुजबळ यांना वगळण्यामागे जातीय राजकारण आहे, असा आरोपही राऊत यांनी केला.

जशी कर्म तशी फळं 

छगन भुजबळ यांची शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याची साथ सोडली, ते सगळ्यांसाठी क्लेषदायक होतं. राजकारणामध्ये ज्याला त्याला आपल्या कर्माची फळं मिळत असतात, अशी टीका राऊतांनी केली.

मंत्र्याच्या कामगिरीचं ऑडिट करणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं, त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ‘देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र मोदींचे अंधभक्त आहेत. त्यामुळे वरती (केंद्रात) नरेंद्र मोदी हे अशी जुमलेबाजी करत असतात, त्यामुळे त्यांचे चेलेही खाली ( राज्यात) तेच करत असतात. भ्रष्टाचारबाबत झिरो टॉलरन्स ही नरेंद्र मोदी यांची घोषणा आहे. देवेंद्र फडणवीसांना हा झिरो टॉलरन्सचा विषय महाराष्ट्रामध्ये राबवाल तर त्यांचं 90 टक्के मंत्रीमंडळ रिकामं होईल, ‘ असं संजय राऊत म्हणाले. दिल्लीत नरेंद्र मोदी हे सर्व भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या सभोवती घेऊन बसले आहेत, तसेच हे देवेंद्र फडणवीससुद्धा महाराष्ट्रतल्या सर्व ताकदीच्या भ्रष्टाचाऱ्यांना आप्लाय अवतीभोवती घेऊन बसले आहे. त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष देऊ नका, ऑडिट वगैरे काही होणार नाही. त्यांच ऑडिट जनताच करेल, असे राऊत म्हणाले.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.