AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भीषण अपघातातून बचावल्यानंतर रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांची भावनिक प्रतिक्रिया

"खरं म्हटलं तर काळजी घेणारे एवढे लोक आहेत, त्यामुळे आम्ही आज सुखरुप आहोत. मला नाही वाटत की, हा निवडणुकीचा काळ आहे. या निवडणुकीच्या काळातच मी फिरत आहे. तर इतरही वेळी सर्वसामान्यांपर्यंत जात असते. गेल्या 21 वर्षापासून मी तालुक्यात नागरिकांच्या सुख-दुःखात फिरत आहे. पण आज हा योग माझ्यावर येणारच असेल, तो आला", अशी भावनिक प्रतिक्रिया अपघातातून बचावलेल्या भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांनी दिली.

भीषण अपघातातून बचावल्यानंतर रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांची भावनिक प्रतिक्रिया
भीषण अपघातातून बचावल्यानंतर रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांची भावनिक प्रतिक्रिया
| Updated on: Sep 30, 2024 | 8:48 PM
Share

भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीचा आज भीषण अपघात घडला. ही अपघाताची घटना चाळीसगावात धुळे-सोलापूर मार्गावर घडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर खळबळ उडाली होती. पण सुदैवाने संजना जाधव आणि गाडीचा ड्रायव्हर हे दोन्ही या अपघातात सुखरुप बचावले आहेत. संजना जाधव यांना सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही. या अपघातात संजना जाधव यांच्या गाडीचं नुकसान झालं आहे. एका पिकअपने त्यांच्या गाडीला धडक दिल्याने ही अपघाताची घटना घडली. पिकअप चालक हा मद्यधुंद असल्याने ही अपघाताची घटना घडली. या अपघातानंतर संजना जाधव यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी घडलेली सर्व घटना सांगितली.

“खरं म्हटलं तर काळजी घेणारे एवढे लोक आहेत, त्यामुळे आम्ही आज सुखरुप आहोत. मला नाही वाटत की, हा निवडणुकीचा काळ आहे. या निवडणुकीच्या काळातच मी फिरत आहे. तर इतरही वेळी सर्वसामान्यांपर्यंत जात असते. गेल्या 21 वर्षापासून मी तालुक्यात नागरिकांच्या सुख-दुःखात फिरत आहे. पण आज हा योग माझ्यावर येणारच असेल. तो आला. माझे सर्व हितचिंतक मला भेटायला आले. सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्याने आज मी सुखरूप आहे”, अशी भावनिक प्रतिक्रिया संजना जाधव यांनी दिली.

अपघाताची घटना नेमकी कशी घडली?

“माझ्या मतदारसंघातील वलठाण येथे जात असताना अपघात झाला. समोरून पिकअप आला. पिकअप चालक अतिशय नशेत होता. त्याने नशेत असताना समोरून येऊन माझ्या गाडीला धडक दिली. अशाप्रकारे त्या ठिकाणी हा अपघात घडला. तिथे रस्त्याचे काम सुरू असल्याने तिथली वाहतूक एका बाजूने वळवण्यात आलेली होती. आम्ही आमच्या बाजूने होतो. पिकअप चालक नशेत असल्यामुळे त्याला सुचले नाही की, गाडी राईटला घेतली पाहिजे की लेफ्टला. त्याने सरळ आमच्या गाडीवर गाडी घातली”, अशी आपबीती संजना जाधव यांनी सांगितली.

‘आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी मदतीला आल्या’

“पिकअप चालकाला आम्ही खाली उतरवून बोललो. पण तो नशेत असल्यामुळे त्याला काहीही सुचले नाही. पिकअप चालक नशेत असल्यामुळे हा अपघात घडला. तो नंतर आम्हाला विचारतो की, काय झालं म्हणून? तो नशेत असल्यामुळे हा सगळा प्रकार घडला”, असं संजना जाधव म्हणाल्या. “अपघातानंतर घटनास्थळी पोलीस तातडीने आले. सर्वांनी सहकार्य केलं. आमदार मंगेश चव्हाण यांनाही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्यांच्या पत्नीला घटनास्थळी पाठवले. त्यांचीही मला त्या ठिकाणी मदत मिळाली. काळजी घेणारे एवढे लोक माझ्यासोबत असल्याने आज मी सुखरूप आहे”, असं संजना जाधव म्हणाल्या.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.