AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

170 विद्यार्थ्यांना जेवणातून झाली विषबाधा, 24 तासात अहवाल मागितल्यामुळे प्रशासन…

Food Poisoning : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एका आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. समाज कल्याण विभागाचे आयुक्त संतप्त झाले असून दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

170 विद्यार्थ्यांना जेवणातून झाली विषबाधा, 24 तासात अहवाल मागितल्यामुळे प्रशासन...
Sangali poison studentImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 28, 2023 | 8:41 AM
Share

सांगली : आश्रमशाळेतील (Ashram School) जवळपास 170 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा (Food Poisoning) झाल्यामुळे अचानक प्रशासनाची मोठी धावपळ सुरु झाली. जत तालुक्यातील उमदी (Umadi Residential School) येथील समता आश्रम शाळेतील ही घटना असून. विद्यार्थ्यांवर तातडीने जवळच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु केले असल्याची माहिती मिळाली आहे. हे प्रकरण अतिशय गंभीर असल्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. दोषींवर कडक कारवाई होणार आहे. सदर घटनेची संपूर्ण (sangali News) चौकशीकरून 24 तासाच्या आत अहवाल सादर करण्याच्या जिल्हाधिकाऱ्याच्या समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांना सूचना दिल्या आहेत.

आश्रम शाळेतील कर्मचारी सुद्धा एकदम घाबरुन गेले

जत तालुक्यातील उमदी येथील एका आश्रमशाळेतील १७० विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला आहे. त्या शाळेचं नाव समता आश्रम असं आहे. हा प्रकार काल रात्री उशिरा घडला आहे. सुरुवातीला विद्यार्थ्यांना उलटी आणि मळमळ सुरु झाली. अनेक विद्यार्थ्यांना हा त्रास सुरु झाल्याने आश्रम शाळेतील कर्मचारी सुद्धा एकदम घाबरुन गेले होते. मुलांना माडग्याळ मधील प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने दाखल करण्यात आले.

प्रकृती चांगली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली

१७० विद्यार्थी ग्रामीण रुग्णालय माडग्याळ येथे आले होते. त्यापैकी ७९ पेशंट सध्या ग्रामीण रुग्णालय माडग्याळ येथे उपचार घेत आहेत, त्याचबरोबर त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. बाकीचे विद्यार्थी रुग्ण मिरज मधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहेत.

जिल्हाधिकाऱ्याच्या समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांना सूचना

ही घटना झाल्याचं समजल्यानंतर आरोग्य विभागाने तातडीने आरोग्य यंत्रणेने पाऊलं उचलल्याने इतक्या मोठया संख्येने विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांवर योग्य वेळेत उपचार करण्यात आले. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांचे वय साधारण पाच वर्षापासून ते पंधरा वर्षापर्यंत आहे. सदर घटनेची संपूर्ण चौकशी करून 24 तासाच्या आत अहवाल सादर करण्याच्या जिल्हाधिकाऱ्याच्या समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांना सूचना दिल्या आहेत.

मुंबई-पुणे वाहतूक कोंडीवर राज ठाकरेंकडून ट्विट करत टीका
मुंबई-पुणे वाहतूक कोंडीवर राज ठाकरेंकडून ट्विट करत टीका.
पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी! 2 तासांत 2 किलोमीटर अंतर पार
पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी! 2 तासांत 2 किलोमीटर अंतर पार.
थोड्या दिवसात जयंत पाटील भाजपात येतील! सदाभाऊ खोत यांचं मोठं विधान
थोड्या दिवसात जयंत पाटील भाजपात येतील! सदाभाऊ खोत यांचं मोठं विधान.
पार्थ पवारांनी चौकशीला सामोरं जात...; संजय राऊतांचं विधान
पार्थ पवारांनी चौकशीला सामोरं जात...; संजय राऊतांचं विधान.
मुंबईत भाजपचा महापौर बसणं हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस असेल
मुंबईत भाजपचा महापौर बसणं हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस असेल.
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर शेकापच्या जयंत पाटलांची टीका
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर शेकापच्या जयंत पाटलांची टीका.
पवारांनी मोठे केलेले लोक आज त्यांनाच सल्ले देताय! राऊतांचा खोचक टोला
पवारांनी मोठे केलेले लोक आज त्यांनाच सल्ले देताय! राऊतांचा खोचक टोला.
24 तासांपासून महाराष्ट्राच्या 'विकासा'चा मार्ग बंद;
24 तासांपासून महाराष्ट्राच्या 'विकासा'चा मार्ग बंद;.
शिंदेंचे आमदार सुहास बाबरांचा भाजपलाचा इशारा?
शिंदेंचे आमदार सुहास बाबरांचा भाजपलाचा इशारा?.
महाजनांच्या कारभारावरुन नाशिक भाजपात कलह?
महाजनांच्या कारभारावरुन नाशिक भाजपात कलह?.