AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : …तर सत्ताधाऱ्यांना देश सोडून पळावे लागेल; संजय राऊतांचा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल

संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यावर जोरदार टीका केली. विरोधक एकत्र आल्यास सत्ताधाऱ्यांना देश सोडून पळावे लागेल, असं त्यांनी म्हटलं.

Sanjay Raut : ...तर सत्ताधाऱ्यांना देश सोडून पळावे लागेल; संजय राऊतांचा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल
| Updated on: Jul 26, 2026 | 10:27 AM
Share

दिल्लीच्या जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने मोदी सरकार झुकलं. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. या राजीनाम्यामुळे सरकार बॅकफुटवर गेल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलनाच्या चर्चेदरम्यान विरोधकांनीही एकत्र आलं पाहिजे. सर्वजण एकत्र आल्यास सत्ताधाऱ्यांना देश सोडून पळावे लागेल, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. सत्ताधाऱ्यांवर टीका करताना संजय राऊत म्हणाले, ‘ जंतरमंतरवर सर्व विद्यार्थी संघटना एकत्र आल्या. लाल बावटा असेल. निळा बावटा असेल. इतर काही बावटे. सगळे एकत्र आले. विरोधी पक्षानेही आपले सगळे बावटे दूर ठेवून एकत्र येतील. मनाने एकत्र येतील, त्यादिवशी नरेंद्र मोदींचे लोक एक दिवस देखील सत्तेवर राहणार नाहीत. एका कारणासाठी भव्य आंदोलन झालं. जगाने दखल घेतली. ईव्हीएम घोटाळा, मत चोरी. आमदार-खासादारांची फोडाफोडी, पक्ष फोडणे, संविधानावर हल्ला या कारणासाठी लढा दिला तर सत्ताधाऱ्यांना देश सोडून पळावे लागेल’.

शिवाजी पार्कवरील अभिनंदन सभेबाबत राऊत म्हणाले, ’20 ते 21 जणांनी आत्महत्या केल्या. अनेकांनी लाठ्या खाल्या. काहींनी पेलेट गनच्या गोळ्या खाल्ल्या. त्यामुळे जास्त मोठं आनंद व्यक्त करता येणार नाही. शिवाजी पार्कवर कोणत्याही पक्षाचा झेंडा फडकणार नाही. तिथे दोन जणांचे भाषणे होतील’. आंदोलनातून काय बोध घ्यावा, या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, ‘सत्ता आहे. बहुमत आहे. म्हणून माज दाखवू नका. हिटलर सारखे वागाल, त्याच मार्गाने जावे लागेल, मुसोलिनी सारखे वागल, तर त्यांचासारखा अंत होईल. . गद्दाफीसारखं वागाल तर त्यांचा अंत होईल. दिल्लीत ठाकरे असताना त्यांनी अरविंद केजरीलवाल यांच्याशी चर्चा केली. राहुल गांधी यांच्याशी जवळपास फोनवरून 35 मिनिटे चर्चा केली’, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; संजय राऊतांची मागणी

‘आदित्य ठाकरे बोलले आहेत, त्यांची भूमिका योग्य आहे. नीट पेपरफुटीमुळे 21 जणांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे PM मोदींपासून इतरांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे. कायद्याचे राज्य असेल तर होईल. या आंदोलनापुढे भाजपच्या आयटी सेलपुढे सेलला झुकायला लावलं, असे त्यांनी सांगितले. दिल्लीत बुवा बसलाय. महाराष्ट्रात बुवा बसला आहे. ठाण्यात एक बुवा बसला आहे. बुवाबाजी सुरू आहे. त्यांचा गुरू अशोक खरात, अशी टीका त्यांनी पुढे केली.

Follow Us
प्रधानांच्या राजीनाम्यानंतर ठाकरे बंधूंची जल्लोष सभा; सगळीकडे लगबग,पहा
Thackeray Brothers Sabha | प्रधानांच्या राजीनाम्यानंतर ठाकरे बंधूंची जल्लोष सभा; सगळीकडे लगबग, पहा व्हिडीओ
गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
Rahul Gandhi | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि...
JP Nadda | नीट आंदोलनाला मोठं यश; जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि परीक्षा सुधारणांवरही सकारात्मक निर्णय
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक..
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक...
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबत
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबतच्या बैठकीत मोठा निर्णय
तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
Raj Thackeray | तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने...
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया
Sharad Pawar | धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपके...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपकेच्या विधानेने अनेकाच्या भुवया उंचावल्या