AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे तर पिसं गेलेले कावळे, आमचा पक्ष, आमची भूमिका स्पष्ट, संजय राऊत कडाडले

वीर सावरकर यांच्यावरून काँग्रेसविरोधी भूमिका स्पष्ट करताना संजय राऊत म्हणाले, ' सावरकर हे श्रद्धेचा विषय आहेत. ते नेहमीच राहतील.

हे तर पिसं गेलेले कावळे, आमचा पक्ष, आमची भूमिका स्पष्ट, संजय राऊत कडाडले
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 27, 2023 | 11:07 AM
Share

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर (Sawarkar) यांच्यावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सुनावलेले खडे बोल म्हणजे मॅच फिक्सिंग होती, अशी इतर सत्ताधारी पक्षाकडून करण्यात येतेय. संजय राऊत यांनी या पक्षांवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. हे पक्ष नव्हे तर पिसं गेलेले कावळे आहेत. आमचा पक्ष आणि आमची भूमिका स्पष्ट आहे. वीर सावरकरांचा अपमान आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाहीत. या विषयावर मी लवकरच राहुल गांधी यांची भेट घेणार आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. काँग्रेसच्या सावरकरांबाबतच्या भूमिकेवरून शिवसेनेने परखड भूमिका घेतली आहे. यामुळे महाविकास आघाडीत वितुष्ट येऊ शकते, अशी चर्चा आहे. मविआ फुटण्याच्या चर्चांबाबत संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका अधिक स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला.

तुमचा जुगार सुरु ठेवा..

संजय राऊत यांनी टीका करणाऱ्यांवर निशाणा साधला. आमचा पक्ष आम्हाला माहिती आहे. मालेगावात झालेल्या विराट सभेने आमचा पक्ष काय आहे, हे दाखवून दिलंय. महाराष्ट्रात तुमचंच जे मॅच फिक्सिंग चाललंय, जो जुगार सुरु आहे, तो चालू ठेवा, असा सल्ला राऊत यांनी टीका करणाऱ्या पक्षांना दिला आहे.

‘..यांच्या कांद्याला ५० कोटींचा भाव’

नाशिकचे शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी उद्धव ठाकरे यांचीच नार्को टेस्ट करा, कोणत्या कंपनीकडून ठाकरे यांनी किती पैसे घेतले, हे समोर येईल, असं वक्तव्य केलंय. त्यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, ‘ ज्यांच्या कांद्याला ५० कोटीचा भाव घेतला तेअसं म्हणतायत. पण इकडे शेतकरी कांद्याच्या भावासाठी रडतोय, हे आधी पहा. मालेगावच्या सभेने जनता कुणाची नार्को टेस्ट करणार हे उघड झालंय.

सदू आणि मधू भेटले..

मालेगावत एकिकडे उद्धव ठाकरे यांची सभा सुरु असतानाच एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट झाली. या भेटीचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. संजय राऊत यांनी मात्र या भेटीवरून खोचक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘ सदू आणि मधू भेटले. भेटू द्या. जुने मित्र असतील. नव्याने प्रेम उफाळून आलं असेल. महाराष्ट्रात मालेगावात जी सभा होती, त्यामुळे भावना उचंबळून आल्या असतील. एकमेकांचे अश्रू पुसायला गेले असतील. आम्ही काय करू?

फडणवीस-ठाकरे भेट

विधानभवन परिसरात फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीतूनही राजकीय चर्चांना उधाण आलंय. संजय राऊत यांनी यावरून परखड टीका केली आहे. या भेटीमुळे ज्या चर्चा सुरु आहेत, त्यांचं राऊत यांनी खंडन केलंय. ते म्हणाले, ‘ मला लोकसभेत मोदी रोज भेटतात. अमित शाह, जेपी नड्डा, मोदी-आमचा, फडणवीस-आमचा रस्ता तोच आहे. विरोधी पक्ष-सत्ताधाऱ्यांना वेगळा रस्ता अजून तरी नाही, असं वक्तव्य राऊत यांनी केलंय.

राहुल गांधी यांना भेटणार..

वीर सावरकर यांच्यावरून काँग्रेसविरोधी भूमिका स्पष्ट करताना संजय राऊत म्हणाले, ‘ सावरकर हे श्रद्धेचा विषय आहेत. ते नेहमीच राहतील. ज्या प्रकारे त्यांनी देशासाठी शिक्षा भोगली आहे. जेलमध्ये जाऊन आलो आहोत. आता ती व्यक्ती जिवंत नाही. सावरकर िवंत असते तर आपलं म्हणणं मांडू शकले असते. अशा व्यक्तीवर चिखलफेक केल्यास महाराष्ट्रातील जनता करारा जवाब देऊ शकते. तुमच्या सगळ्याच लढायात आम्ही सोबत असू पण सावरकरांकडूनच आम्हाला लढण्याची प्रेरणा मिळते. सावरकरांच्या बाबतीत आम्ही सातत्याने भूमिका स्पष्ट केली आहे. जयराम रमेश यांच्याशीही बोललो. लवकरच मी दिल्लीत जाणार आहे. राहुल गांधींची भेट घेऊन चर्चा करेन.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.