AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“शिवाजी महाराज यांचा अपमान जनतेने विसरायला हवा, म्हणून भाजपाने ‘हा’ विषय पेटवला” – संजय राऊत

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजप नेते मंगलप्रभात लोढा, रावसाहेब दानवे, प्रसाद लाड, सुधांशू त्रिवेदी यांच्याकडून शिवाजी महाराज यांच्याविषयी विधाने आल्याने त्यावरून राज्यभर पडसाद उमटत आहे.

शिवाजी महाराज यांचा अपमान जनतेने विसरायला हवा, म्हणून भाजपाने 'हा' विषय पेटवला - संजय राऊत
Image Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Dec 08, 2022 | 12:17 PM
Share

मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजप नेते मंगलप्रभात लोढा, रावसाहेब दानवे, प्रसाद लाड, सुधांशू त्रिवेदी यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काही विधाने समोर आली आहे. याच वादग्रस्त विधानावरून राज्यासह संपूर्ण देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यावरून माफी मागा अशी मागणी करत असतांना आम्ही भडकावतोय असं म्हणतात. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचा अवमान असल्याचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हंटले आहे. संजय राऊत यांनी यावरून भाजप नेत्यांना चांगलेच सुनावले आहे. आणि मी जर भडकावले असे जर ते पुन्हा म्हणत असतील तर पुन्हा एकदा ते महाराष्ट्राचा अपमान असल्याचे राऊत म्हणाले आहे. तुमच्या मनात शिवाजी महाराजांच्या विषयी प्रेम आणि काय भावना हे दिसून येत आहे. राज्यातील वातावरण तापलेले असतांना भाजपचा डीएनए चेक करायला पाहिजे असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा मुद्दा तापलेला असतांना भाजपने छत्रपती शिवाजी महाराज यांचा मुद्दा बाजूला करण्यासाठी कर्नाटक सीमा वादाचा विषय हाती घेतल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.

कर्नाटक सीमा प्रश्नाचा मुद्दा बाहेर काढून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल झालेला अपमानाची तीव्र भावना कमी करण्यासाठीच भाजपने ही भूमिका घेतल्याचा सुरही संजय राऊत यांनी आवळला होता.

महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी कुणी काही बोलत असेल तर त्याविषयी आम्ही आक्रमक होणारच असेही संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजप नेते मंगलप्रभात लोढा, रावसाहेब दानवे, प्रसाद लाड, सुधांशू त्रिवेदी यांच्याकडून शिवाजी महाराज यांच्याविषयी विधाने आल्याने त्यावरून राज्यभर पडसाद उमटत आहे.

Follow Us
संतोष देशमुख प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! थेट साक्षीदारालाच...दोन भाऊ...
संतोष देशमुख प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! थेट साक्षीदारालाच...दोन भाऊ....
बापरे! सोसाट्याचा वारा अन् धुळीचं भीषण वादळ; निसर्गाचा भयानक...
बापरे! सोसाट्याचा वारा अन् धुळीचं भीषण वादळ; निसर्गाचा भयानक....
अंतरवालीत 6 तासांपासून रखरखत्या उन्हात मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण
अंतरवालीत 6 तासांपासून रखरखत्या उन्हात मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण.
विधान परिषदेसाठी रस्सीखेच; गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना....
विधान परिषदेसाठी रस्सीखेच; गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना.....
प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले...
प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले....
तब्बल 1526 किलो विष, पुण्यातील दारुकांडाचं भिवंडी कनेक्शन; रेक्स....
तब्बल 1526 किलो विष, पुण्यातील दारुकांडाचं भिवंडी कनेक्शन; रेक्स.....
भयंकर घातपात टळला! मुंबई टार्गेटवर, रक्तपात घडवण्याचा होता कट; दिल्लीत
भयंकर घातपात टळला! मुंबई टार्गेटवर, रक्तपात घडवण्याचा होता कट; दिल्लीत.
शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नाही, राष्ट्रवादी सोडताच तनपुरे भावुक
शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नाही, राष्ट्रवादी सोडताच तनपुरे भावुक.
भाजपमध्ये जाण्यापूर्वी तनपुरेंची सुप्रिया सुळेंशी गुप्त चर्चा?
भाजपमध्ये जाण्यापूर्वी तनपुरेंची सुप्रिया सुळेंशी गुप्त चर्चा?.
भाजपचा मोठा गेम! शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेश
भाजपचा मोठा गेम! शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेश.