“शिवाजी महाराज यांचा अपमान जनतेने विसरायला हवा, म्हणून भाजपाने ‘हा’ विषय पेटवला” – संजय राऊत

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजप नेते मंगलप्रभात लोढा, रावसाहेब दानवे, प्रसाद लाड, सुधांशू त्रिवेदी यांच्याकडून शिवाजी महाराज यांच्याविषयी विधाने आल्याने त्यावरून राज्यभर पडसाद उमटत आहे.

शिवाजी महाराज यांचा अपमान जनतेने विसरायला हवा, म्हणून भाजपाने 'हा' विषय पेटवला - संजय राऊत
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Dec 08, 2022 | 12:17 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजप नेते मंगलप्रभात लोढा, रावसाहेब दानवे, प्रसाद लाड, सुधांशू त्रिवेदी यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काही विधाने समोर आली आहे. याच वादग्रस्त विधानावरून राज्यासह संपूर्ण देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यावरून माफी मागा अशी मागणी करत असतांना आम्ही भडकावतोय असं म्हणतात. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचा अवमान असल्याचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हंटले आहे. संजय राऊत यांनी यावरून भाजप नेत्यांना चांगलेच सुनावले आहे. आणि मी जर भडकावले असे जर ते पुन्हा म्हणत असतील तर पुन्हा एकदा ते महाराष्ट्राचा अपमान असल्याचे राऊत म्हणाले आहे. तुमच्या मनात शिवाजी महाराजांच्या विषयी प्रेम आणि काय भावना हे दिसून येत आहे. राज्यातील वातावरण तापलेले असतांना भाजपचा डीएनए चेक करायला पाहिजे असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा मुद्दा तापलेला असतांना भाजपने छत्रपती शिवाजी महाराज यांचा मुद्दा बाजूला करण्यासाठी कर्नाटक सीमा वादाचा विषय हाती घेतल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

कर्नाटक सीमा प्रश्नाचा मुद्दा बाहेर काढून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल झालेला अपमानाची तीव्र भावना कमी करण्यासाठीच भाजपने ही भूमिका घेतल्याचा सुरही संजय राऊत यांनी आवळला होता.

महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी कुणी काही बोलत असेल तर त्याविषयी आम्ही आक्रमक होणारच असेही संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजप नेते मंगलप्रभात लोढा, रावसाहेब दानवे, प्रसाद लाड, सुधांशू त्रिवेदी यांच्याकडून शिवाजी महाराज यांच्याविषयी विधाने आल्याने त्यावरून राज्यभर पडसाद उमटत आहे.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.