AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राम मंदिराच्या दान पेटीतून 5 कोटी चोरीला, संजय राऊत यांचा मोठा आरोप, थेट भाजपावर..

संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. 12 वर्षामध्ये मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला. यासोबतच पंडित नेहरूंच्या कार्याचा विक्रम मोडणे मोदींना शक्य नसल्याचेही त्यांनी म्हटले.

राम मंदिराच्या दान पेटीतून 5 कोटी चोरीला, संजय राऊत यांचा मोठा आरोप, थेट भाजपावर..
Sanjay Raut
| Updated on: Jun 09, 2026 | 10:37 AM
Share

नुकताच शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. संजय राऊत यांनी म्हटले की, पंडित नेहरू यांनी कोणतेही विरोधी पक्ष फोडले नाहीत, जे आज मोदी आणि शाह फोडत आहेत. अनेक राज्यांमध्ये त्यांच्या विरोधातील सरकारे आली. लोकसभेत आणि राज्यसभेत सरकारच्या विरोधात बोलणारे अनेक बुलंद नेते आले आणि त्यांनी नेहरूंच्या तोंडावर टीका केली. त्यात अटलबिहारी वाजपेयी होते हे लक्षात घ्या. पण हे आमच्या विरोधात बोलत आहेत, म्हणून त्यांचे पक्ष, त्यांच्या संघटना ताब्यात घेण्याचा प्रयत्न कोणी केला नाही. खर म्हणजे मोदींनी एक तप झाल्यानंतर केदारनाथच्या गुफेत जाणून 12 वर्षाचे आत्मचिंतन केले पाहिजे. त्यांच्या प्रमुख सहकाऱ्यांसोबत. मग त्यांनी या 12 वर्षात काय केलं याचा लेखाजोखा त्यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये सादर केला पाहिजे.

पुढे संजय राऊत यांनी म्हटले की, 12 वर्षात मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही. याला काही उत्तर आहे का भारतीय जनता पक्षाकडे? एकदाही जनतेने विचारलेल्या प्रश्नांनी समोर येऊन उत्तर दिली नाहीत. 12 वर्ष झालीत अजून 12 वर्ष होतील. देशाला काय उपयोग झाला? देशाच्या लोकशाहीला काय उपयोग झाला? तुम्ही फक्त पंडित नेहरूंचा पदावर राहण्याचा विक्रम मोडला असेल पण पंडित नेहरूंच्या कार्याचा विक्रम मोडणे अशक्य नाही.

पंतप्रधानपदाची घोडदाैड सुरू आहे पण त्याखाली लोकशाही तुडवली गेली. देशाचा निवडणूक आयोग तुडवडा गेला. अनेक संविधानिक संस्थांच्या छाताडावर उभे राहून त्यांची घोडदाैड सुरू आहे. म्हणून त्यांनी एक पत्रकार परिषद घेण्याचे धाडस दाखवायला पाहिजे. ऑपरेशन सिंदूर देखील त्यांना जागतिक दबावाखाली गुंडाळावे लागले. मोदी हे नेहरूंच्या अत्यंत विरूद्ध वागत आहेत. पंडित नेहरू हे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातून निर्माण झालेले एक तेजस्वी नेतृत्व होते. पंडित नेहरू यांनी देशासाठी आपली सर्व संपत्ती दान केली. ज्या संपत्तीची किमत आज 80 हजार कोटी आहे.

ही संपत्ती पंडित नेहरू यांनी देशासाठी आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी दान केली. पंडित नेहरूंच्या काळात अदानी, अंबानी हे कोणी निर्माण झाली नाही. पंडित नेहरू यांनी सार्वजनिक उद्योग निर्माण केले. तेल कंपन्या, एलआयसी, आयआयटी असे अनेक. मोदींनी काय केले? हे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये येऊन सांगायला पाहिजे. ही अपेक्षा पत्रकारांनी, जनतेने केली तर भारतीय जनता पक्षाला राग येण्याचे काम नाही. राम मंदिराच्या दान पेटीतून 5 कोटी चोरीला गेले. ही संपूर्ण व्यवस्था भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे म्हणते राऊतांनी गंभीर आरोप केला.

Follow Us
लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला ठाकरेंचा थेट इशारा
Uddhav Thackeray | लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! आदित्य -अमित एकाच मंचावर
Dadar | दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा महासागर; आदित्य ठाकरे-अमित ठाकरे एकाच मंचावर
पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
Pm Narendra Modi | पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत....
Rahul Gandhi | विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय?
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय? काय म्हणालं सरकार?
पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा...
NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय
CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
मोठी बातमी! CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप