AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी | संजय राऊत हक्कभंग प्रकरणाचा चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात; ‘ती’ नोटीस राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपतींकडे

राहुल गांधी यांच्या विरोधातील कारवाईने एकिकडे देशातलं वातावरण तापलं असतानाच महाराष्ट्रात संजय राऊत यांच्याविरोधातील हक्कभंग प्रस्तावानेही वेग घेतलाय.

सर्वात मोठी बातमी | संजय राऊत हक्कभंग प्रकरणाचा चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात; 'ती' नोटीस राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपतींकडे
Image Credit source: ANI
| Updated on: Mar 25, 2023 | 2:38 PM
Share

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावरील कारवाईने एकिकडे अवघा देश ढवळून निघतोय. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरील हक्कभंगाच्या प्रस्तावित कारवाईने वेग पकडलाय. राऊत यांच्याविरोधातील हक्कभंग प्रक्रियेत आज मोठी घडामोड समोर आली आहे. विधान परिषदेत संजय राऊत यांच्याविरोधातील हक्कभंग प्रस्ताव आज मांडला गेला. महाराष्ट्रातील विधिमंडळावर टीका करताना संजय राऊत यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याचे तीव्र पडसाद महाराष्ट्राच्या विधानभवनात उमटले. राऊत हे राज्यसभेचे खासदार असल्यामुळे त्यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणला गेला असून आज हा प्रस्ताव विधान परिषदेत सादर करण्यात आला. तसेच सदर प्रस्ताव आता राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपतींकडे पाठवण्यात आला आहे.

कोल्हापुरातलं वक्तव्य भोवणार?

संजय राऊत यांनी कोल्हापूर दौऱ्यावर असताना सदर वक्तव्य केलं होतं. १ मार्च रोजी कोल्हापुरात असताना संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना विधिमंडळाबाबतचं मोठं वक्तव्य केलं. विधिमंडळ नव्हे हे चोरमंडळ आहे, असं ते म्हणाले होते. याच वक्तव्याचे पडसाद विधानसभेत उमटले. आमदार अतुल भातखळकर यांनी या प्रकरणी राऊतांविरोधात हक्कभंग प्रस्तावाची मागणी केली होती. संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील विधानमंडळाचा, मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे राऊत यांच्यावर हक्कभंगाची कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. त्याच दिवशी संध्याकाळी संजय राऊत यांना हक्कभंगाची नोटीस पाठवण्यात आली.

नोटिशीला राऊत यांचं उत्तर

संजय राऊत यांना विधानसभा सचिवालयाकडून नोटीस पाठवण्यात आल्यानंतर त्यांनी पुढील दोन आठवड्यात सदर नोटीशीला उत्तरं दिली. मी विधिमंडळाला नव्हे तर विधिमंडळातील एका गटाला चोर म्हणालो, असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी नोटिशीत दिलंय. त्यानंतर या उत्तरावरून पुढे काय कारवाई होते, याकडे सर्वांचं लक्ष लागंलय.

कारवाईचा मुद्दा केंद्र सरकारच्या कोर्टात

महाराष्ट्रातील शिवसेना आणि महाविकास आघाडीचं सरकार उलथवून देण्यात भाजप आणि केंद्र सरकारचा हात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी वारंवार केलाय. देशातील भाजप विरोधी पक्षांच्या नेत्यांमागील ईडी, सीबीआयच्या कारवायाही भाजप सूडबुद्धीने करतंय, असा आरोप राऊत करतात. यातच आता त्यांच्यावरील हक्कभंगाचा प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे अर्थात राज्यसभा तथा उपराष्ट्रपतींकडे गेला आहे. राहुल गांधी यांनी 2019 साली केलेल्या वक्तव्यारून सूरत कोर्टाने शिक्षा सुनावली. त्यानंतर तत्काळ त्यांची खासदारकी रद्द झाली. यामुळे राजकीय वातावरण तापलं असतानाच संजय राऊत यांच्यावर आता राज्यसभेतून काय कारवाई होते, याकडे राज्याचं लक्ष लागंलय.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.