AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फरार कृष्णा आंधळेबाबत धनंजय देशमुख यांचा पोलीस यंत्रणेस प्रश्न?

Santosh Deshmukh murder case: पोलीस यंत्रणेने आता सगळ्या समाजाला सांगणे गरजेचे आहे की त्या आरोपीचे काय झाले आहे. आम्हाला देखील कृष्णा आंधळेच स्पष्टीकरण पाहिजे आहे. तो कुठे आहे तो का सापडत नाही, हे पोलिसांनी सांगितले पाहिजे.

फरार कृष्णा आंधळेबाबत धनंजय देशमुख यांचा पोलीस यंत्रणेस प्रश्न?
santosh deshmukh caseImage Credit source: social
| Updated on: Mar 20, 2025 | 4:29 PM
Share

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता 100 दिवस झाले आहे. या शंभर दिवसांत देशमुख कुटुंबाला न्यायासाठी मोठा लढा उभारावा लागला. त्यांच्या लढ्याला साथ देण्यासाठी संपूर्ण समाज रस्त्यावर उतरला. त्यानंतर आरोपींना अटक होणे, आरोपपत्र दाखल होणे या हालचाली घडल्या. परंतु या प्रकरणातील एक आरोपी अजूनही फरार आहे. याबाबत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना खेद व्यक्त केला.

धनंजय देशमुख म्हणाले, प्रत्येक आरोपींने चुकीच्या पद्धतीने हे हत्यासत्र घडवले. त्यामुळे न्यायाच्या भूमिकेत आम्ही रस्त्यावर उतरलो. मनोज जरांगे पाटील, लोकप्रतिनिधी आणि समाजाचे सर्व घटक एकत्र आले. त्यानंतर कुठे गुन्हा दाखल झाला. आता आरोपींना फाशीची शिक्षा कधी होईल, हे येणाऱ्या काळात बघावे लागणार आहे, असे ते म्हणाले.

तो दिवस न्यायाचा असणार

संतोष देशमुख यांच्या हत्येचा शंभर दिवसांचा प्रवास खूप खडतर होता, असे सांगत धनंजय देशमुख म्हणाले, या काळात आम्हाला खूप मोठा त्रास झाला. कुटुंबात बसून दुःख व्यक्त करायला आम्हाला वेळ मिळाला नाही. न्यायासाठी रस्त्यावर उतरावे लागले. या काळात सगळ्या जाती-धर्माच्या लोकांनी साथ दिली. अन्यथा आमच्या अडचणी वाढल्या असत्या. ज्या दिवशी आरोपींना फाशी होईल तो दिवस न्यायाचा असणार आहे.

कृष्णा आंधळे याबाबत उत्तर दिले पाहिजे

कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे, त्यावर बोलताना धनंजय देशमुख म्हणाले, पोलीस यंत्रणेने आता सगळ्या समाजाला सांगणे गरजेचे आहे की त्या आरोपीचे काय झाले आहे. आम्हाला देखील कृष्णा आंधळेच स्पष्टीकरण पाहिजे आहे. तो कुठे आहे तो का सापडत नाही, हे पोलिसांनी सांगितले पाहिजे. त्याला लवकरात लवकर जेरबंद करून फाशी द्यावी, अशी आमची मागणी आहे. शंभर दिवसांचा कालावधी खूप मोठा आहे. या काळात एखादा आरोपी न सापडणे गंभीर प्रकार आहे. आता याबाबत काही भूमिका घ्यायची गरज पडली तर गावाच्या विचाराने घेऊ, असे धनंजय देशमुख म्हणाले.

संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख म्हणाल्या, एका गोष्टीची खंत वाटते एक आरोपी अजून ताब्यात आला नाही. आज पूर्ण महाराष्ट्र एकच ध्यास लावून त्याला कधी अटक होणार? हे शंभर दिवस आमच्यासाठी खूप दुःखद होते. ते दुःख विसरून आम्ही आमच्या वडिलांना न्याय मिळावा, यासाठी रस्त्यावर उतरलो.

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.