AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी लग्न, मग धर्म बदलला, पतीला अटक होताच तिने…; सायली सुर्वेचा युटर्न, 24 तासात काय घडलं?

सायली सुर्वे छळ प्रकरणातील मुख्य आरोपी आतिफ तासे याला पालघर पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. दरम्यान, सायलीने स्वतः समोर येत आपल्या अपहरणाच्या अफवा फेटाळल्या असून तक्रार मागे घेण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे. वाचा सविस्तर

आधी लग्न, मग धर्म बदलला, पतीला अटक होताच तिने...; सायली सुर्वेचा युटर्न, 24 तासात काय घडलं?
Sayali Surve
| Updated on: Apr 09, 2026 | 11:46 AM
Share

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रभर सायली सुर्वे लव्ह जिहाद प्रकरण गाजताना दिसत आहे. सायली सुर्वे लव्ह जिहाद आणि छळ प्रकरणातील मुख्य आरोपी आतिफ तासे याला पालघर पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर फरार असलेल्या आतिफला मुंबईतील कांदिवली परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही धाडसी कारवाई करण्यात आली. तर दुसरीकडे स्वतः सायली सुर्वेने समोर येत आपल्या अपहरणाच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत.

24 तासात काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, मनोर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात आतिफ तासे हा मुख्य आरोपी आहे. त्याच्यावर जमीन बळकावणे, फसवणूक आणि जीवे मारण्याच्या धमकीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सर्वोच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तो फरार झाला होता. पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने विशेष पथक तयार केले होते. यानंतर त्याला मुंबईतील कांदिवली भागातून शिताफीने ताब्यात घेतले. आतिफवर पिंपरी-चिंचवड आणि इतर भागांतही कौटुंबिक हिंसाचाराचे गुन्हे नोंद आहेत.

नेमकं प्रकरण काय?

सायली सुर्वे ही २०१९ ची मिस इंडिया अर्थ स्पर्धेतील सुंदरी आहे. तिने घरच्यांचा प्रचंड विरोध असतानाही उद्योजक आतिफ तासे याच्याशी विवाह केला होता. मात्र, लग्नानंतर तिचे आयुष्य नरक बनले, असा दावा सायलीने केला होता. लग्नानंतर तिचे बळजबरीने धर्मांतर करून तिचे नाव ‘अतेझा’ ठेवण्यात आले. आतिफ आणि त्याच्या कुटुंबीयांकडून तिचा सतत शारीरिक आणि मानसिक छळ सुरू होता. अखेर या त्रासाला कंटाळून सायलीने हिंदुत्ववादी संघटनांशी संपर्क साधला. त्यानंतर विधीवत होम-हवन आणि मंत्रोच्चाराद्वारे तिचे शुद्धीकरण करून तिची घरवापसी करण्यात आली. आता तिचे नवीन नाव अद्या सुर्वे असे ठेवण्यात आले आहे.

पतीविरुद्धची तक्रार मागे

मात्र गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर सायली सुर्वेचे अपहरण झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. यावर सायलीने अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. “माझं अपहरण झालेलं नाही, मी पूर्णपणे सुरक्षित आहे. माझ्या मुलांच्या भविष्याचा विचार करून मी पतीविरोधात दिलेली केस मागे घेतली आहे. प्रशासनाने आणि जनतेने माझ्याबद्दल जी काळजी दाखवली, त्याबद्दल मी आभारी आहे. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका”, असे सायलीने तिच्या व्हिडीओत म्हटले आहे. सध्या सायली पुण्यात तिच्या घरी आहे. तिने हा निर्णय निस्वार्थ भावनेने घेतल्याचे म्हटले आहे. मात्र, ती अद्याप पोलीस संरक्षणाखाली आहे.

घटस्फोट मिळवून देण्यासाठी यंत्रणेने काम करावे

दरम्यान या प्रकरणात भाजप नेत्या मेधा कुलकर्णी यांनी उडी घेतली असून त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सायलीवर प्रचंड दबाव असून तिची मानसिक स्थिती ठीक नाही. आतिफसारख्या गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. सायलीवर दबाव टाकण्यात आला असून तिची मानसिक अवस्था बिकट करण्यात आली होती. आतिफ तासेवर कठोर कारवाई व्हावी आणि सायलीला घटस्फोट मिळवून देण्यासाठी यंत्रणेने काम करावे, अशी मागणी मेधा कुलकर्णी यांनी केली आहे.

तसेच मी लवकरच राज्यातील अशा पीडित मुलींच्या मदतीसाठी ‘ऑपरेशन दुर्गा’ नावाचा सेल आणि विशेष हेल्पलाइन सुरू करणार आहे. ज्याद्वारे मुलींना कायदेशीर मदत आणि समुपदेशन दिले जाईल, असेही मेधा कुलकर्णी यांनी जाहीर केले.

Follow Us
विशेष बातमी! मध्य रेल्वेवर शुक्रवारपासून सलग 15 दिवसांचा ब्लॉक, कारण..
मुंबईकरांसाठी विशेष बातमी! मध्य रेल्वेवर शुक्रवारपासून सलग 15 दिवसांचा ब्लॉक, सर्वात मोठा बदल घडणार?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सर्वात मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द, नेमकं काय घडलं?
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थक...
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थकांची जोरदार बॅनरबाजी; चक्क...
याला म्हणतात luxurious! रुपाली चाकणकर यांचं हॉटेल व्यवसायात पदार्पण
याला म्हणतात luxurious! रुपाली चाकणकर यांचं हॉटेल व्यवसायात पदार्पण
पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...बड्या नेत्याचा दावा
मोठी बातमी ! पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...या नेत्याच्या दाव्याने पुन्हा खळबळ
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटन...
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री...
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री काँग्रेस नेत्याच्या...
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसणाचे दर तब्बल 200 रुपये किलोपर्यंत
सरसकट 80 ते 100 रुपयांची वाढ, कांद्यानंतर आता स्वयंपाकघरात दररोज उपयोगात येणारी वस्तुही महागली
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप,
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप, तब्बल 15 लाख...
विक्रेत्यांना 30 दिवसांपेक्षा जास्त काळ साखरेचा साठा करता येणार नाही
साखरेच्या साठेबाजीवर चाप लावण्यासाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय