AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आभाळच फाटणार… हवामान तज्ज्ञांनी सांगितले पुढील 4 दिवसात काय घडणार, शाळांना सुट्टी, 4 दिवसात तब्बल..

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. पुढील 4 दिवस पाऊस धो धो कोसळणार आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. हवामान तज्ज्ञांनी यावर भाष्य केले. आज काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला.

आभाळच फाटणार... हवामान तज्ज्ञांनी सांगितले पुढील 4 दिवसात काय घडणार, शाळांना सुट्टी, 4 दिवसात तब्बल..
Maharashtra Rain Pune Meteorological Department Head S. D. Sanap
| Updated on: Jul 03, 2026 | 1:34 PM
Share

राज्यात धो धो पाऊस सर्वत्र आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. रात्रभर सतत पाऊस सुरू होता. गेल्या दोन दिवसांपासून पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नाही. मुंबईमध्ये चार दिवस पावसाचा इशारा देण्यात आला. आज रायगड आणि पुण्यात रेड अलर्ट हवामान विभागाने दिला. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. यादरम्यानच पुणे हवामान विभागाचे प्रमुख एस. डी. सानप यांनी महत्वाची माहिती दिलीये. राज्यातील घाटमाथ्यावर येत्या चार दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला. जूनमधील कमी झालेल्या पावसाची पोकळी येत्या चार दिवसात भरून निघेल, असे मोठे विधान एस. डी. सानप यांनी केले.

राज्यात मान्सून मौसमी पाऊस सक्रिय झाल्याचे चित्र पाहावयास मिळतंय. राज्यातील घाटमाथ्यावर येत्या चार दिवस रेड अलर्ट देण्यात आला. जूनमधील कमी झालेल्या पावसाची पोकळी येत्या चार दिवसात भरून निघणार असल्याची माहिती भारतीय हवामान पुणे विभागाचे प्रमुख एस. डी. सानप यांनी दिलीय. पुढील 4 दिवसात पावसाचा वेग वाढणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टीही जाहीर करण्यात आली.

हवामान विभागाकडून आज नागपूरसह विदर्भाच्या काही भागात अतिवृष्टीचा येलो अलर्ट देण्यात आला. सध्या नागपूरसह परिसरात रिमझिम पाऊस आणि ढगाळ हवामान आहे. रिमझिम वावसामुळे खरिप पेरणीला येणार गती मिळतंय. गेल्या दोन दिवसांतील पावसामुळे तापमानात मोठी घट झाली. विदर्भातील धरणांमध्ये पाणीपातळी वाढण्यासंही मदत होतंय.  ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी पेरणी केली त्यांच्या पिकांसाठी हा पाऊस फायदेशीर आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. किनारपट्टी भागाला तीन नंबरचा बावटा अरबी समुद्रात ताशी 40 किलोमिटर वेगाने वारे खाडी किनारी किंवा समुद्रकिनारी मच्छिमारी करू नये, मत्स्यविभागाचे आवाहन केले. 5 जुलैपर्यत जिल्ह्यात कोसळधारा दुपारनंतर समुद्राला उधाण, साडेचार मिटरच्या लाटा आज देखिल समुद्र खवळलेला, किनारपट्टी भागालील लोकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या.

Follow Us
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
पालकमंत्री गोगावलेंना तटकरेंच्या शुभेच्छा अजून नाहीत
पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा
आता काही खरं नाही! तुकाराम मुंढेंनी खाद्य तेलाबाबत घोषणा केलीच...
आता काही खरं नाही! तुकाराम मुंढेंनी घोषणा केलीच...  खाद्य तेलाबाबत एफडीएकडून कडक नियमावली
जज साहेब...बाळासाहेबांचे विचार...व्यंगचित्रातून शिंदे गटाचा ठाकरेंवर
जज साहेब...बाळासाहेबांचे विचार...व्यंगचित्रातून शिंदे गटाचा ठाकरे गटावर निशाणा!
पोलिस संरक्षण काढून ये मग... फलटणमध्ये निंबाळकर vs निंबाळकर,
Video : पोलिस संरक्षण काढून ये मग...  फलटणमध्ये निंबाळकर vs निंबाळकर, थेट बुलेटस्वारी करत स्वीकारलं चॅलेंज
गद्दारी करून मलाही आमदारकी... ठाकरेंच्या बड्या नेत्याचं विधान तुफान
गद्दारी करून मलाही आमदारकी... ठाकरेंच्या बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत, असं काही घडलं की...
शिवसेना कोणाची? 2018 ची घटना आणि 19 लाख सदस्यांचा दावा, कोर्टात काय...
शिवसेना कोणाची? 2018 ची घटना आणि 19 लाख सदस्यांचा दावा, कामत यांचा युक्तिवाद, ठाकरेंना जिंकून देणार?
कोर्टातील युक्तिवाद संपवण्याआधी... ठाकरेच्या वकीलांची मोठी मागणी
कोर्टातील युक्तिवाद संपवण्याआधी... ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांची कोर्टाकडे मोठी मागणी