AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘नरेंद्र मोदींनी माफी मागावी’, टीव्ही 9च्या मुलाखतीत शरद पवारांची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आज 'टीव्ही 9 मराठी'ला विशेष मुलाखत दिली. 'टीव्ही 9 मराठी'चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी शरद पवारांची मुलाखत घेतली. यावेळी शरद पवारांनी मोदींनी माफी मागावी, अशी मागणी केली.

'नरेंद्र मोदींनी माफी मागावी', टीव्ही 9च्या मुलाखतीत शरद पवारांची मागणी
'नरेंद्र मोदींनी माफी मागावी', टीव्ही 9च्या मुलाखतीत शरद पवारांची मागणी
| Updated on: Apr 25, 2024 | 9:48 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांसमोर भाषण करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भ्रष्ट लोकांची पार्टी म्हणत टीका केली होती. विशेष म्हणजे या टीकेनंतर लगेच उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत सहभागी झाले होते. त्यामुळे एकीकडे अजित पवार यांना भाजप सत्तेत सहभागी करुन घेतं, तर दुसरीकडे पंतप्रधान मोदी स्वत: राष्ट्रवादीवर टीका करतात. त्यावेळी याबाबत राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा झाल्या होत्या. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’च्या मुलाखतीत मोदींच्या टीकेवर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी संबंधित आरोपांप्रकरणी मोदींनी कारवाई करावी किंवा माफी मागावी, अशी भूमिका शरद पवारांनी मांडली.

“नरेंद्र मोदी यांनी भाषणात राष्ट्रवादी ही भ्रष्ट लोकांची पार्टी आहे, असा शब्द त्यांनी वापरले. त्यांनी कुणाचं नाव घेतलं नाही. माझं त्यांना आवाहन आहे की, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात. तुम्ही आरोप करत आहेत. या आरोपांमध्ये तथ्य असेल तर कारवाई कराल. जर नसेल तर एका पक्षाच्या संदर्भात चुकीचं वक्तव्य केलं तर माफी मागा”, असं शरद पवार म्हणाले.

शरद पवारांची मोदींवर टीका

“मोदींची पुतिनशी तुलना करण्याचा प्रश्न वेगळा आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ज्या पद्धतीने तुरुंगात टाकलं, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना ज्या पद्धतीने तुरुंगात टाकलं गेलं, हे असं होऊ शकत नाही, अशी माझी धारणा आहे. केजरीवाल यांनी दिल्लीत चांगलं काम केलं, असं दिल्लीचे लोकं सांगतात. देशाच्या राजधानीच्या मुख्यमंत्र्यांना तुम्ही आत टाकलं, याला काय म्हणायचं?”, अशी टीका शरद पवारांनी केली.

वर्चस्वाची लढाई म्हणून पक्ष फुटला?

यावेळी शरद पवार यांना वर्चस्वाच्या लढाईतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवार म्हणाले, “वर्चस्वाच्या लढाईचा प्रश्न नाही. एजन्सीचे आमच्या काही सहकाऱ्यांसोबत चौकशीचे जे उद्योग सुरु होते, त्यामध्ये ते अस्वस्थ झाले. आमच्या काही सहकाऱ्यांच्या घरच्यांनी सांगितलं की, आम्हाला एकदाची गोळी घाला. यातून त्यांची अवस्था काय होती? हा प्रश्न होता.”

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.