AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वतःच्या आजीचा इतिहास माहित नाही, त्यांना सावरकर काय कळणार? : शरद पोंक्षे

केंद्रात नरेंद्र मोदी सरकार आहे. त्यामुळे आता तरी सावरकरांना ‘भारतरत्न’ मिळेल, अशी अपेक्षा शरद पोंक्षे यांनी व्यक्त केली.

स्वतःच्या आजीचा इतिहास माहित नाही, त्यांना सावरकर काय कळणार? : शरद पोंक्षे
| Updated on: Jan 22, 2020 | 8:03 AM
Share

पुणे : ज्या व्यक्तीला आपल्या आजीचा इतिहास माहित नाही, त्यांना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर काय समजणार? अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर थेट निशाणा (Sharad Ponkshe on Rahul Gandhi) साधला आहे.

केंद्रात नरेंद्र मोदी सरकार आहे. त्यामुळे आता तरी सावरकरांना ‘भारतरत्न’ मिळेल, अशी अपेक्षा शरद पोंक्षे यांनी व्यक्त केली. धर्म गर्जना संस्थेतर्फे आयोजित ‘राष्ट्रभक्त सावरकर’ या विषयावर शरद पोंक्षे बोलत होते.

‘त्याच्या वक्तव्याला फारशी कोणी किंमत देत नाही, कारण ज्याला आपल्या आजीचा इतिहास माहित नाही, त्याला सावरकरांचा इतिहास माहित असण्याचं काही कारणच नाही. सावरकर तर फार मागचे आहेत. आजी म्हणजे कोण, तर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी. आपल्या आजीचाच इतिहास पोराला माहिती नाही’ असा टोला शरद पोंक्षेंनी लगावला.

सचिन तेंडुलकरला ‘भारतरत्न’ दिलेला चालतो, मग स्वातंत्र्यवीर सावरकर यांना का नाही चालत? सावरकरांना ‘भारतरत्न’ दिला, तरच नव्या पिढीला त्यांच्या विचारांची आणि कार्याची जाणीव होईल. नवीन पिढीलाही सावरकर कळणे गरजेचे आहे, असं मत शरद पोंक्षे यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : …म्हणून मुख्यमंत्र्यांनी थिएटरमध्ये जाऊनही ‘तान्हाजी’ पाहिला नाही!

पंतप्रधान असताना इंदिरा गांधी यांनी सावरकर स्मारकासाठी 15 हजार रुपयांची देणगी स्वतःच्या खिशातून दिली होती, हेच त्यांना (राहुल गांधी) माहिती नाही. तसेच, इंदिरा गांधी यांच्यामुळेच टपाल तिकिटावर सावरकरांचे छायाचित्र झळकले होते. दुर्दैवाने राहुल गांधी यांना यातील काहीच माहीत नाही, असं शरद पोंक्षे पुढे म्हणाले.

प्रत्येक व्यक्ती जन्मतः हिंदू असतो. परंतु हिंदू म्हटल्यावर त्यामध्ये मुस्लिम, ख्रिस्ती, बौद्ध यांसारख्या विविध धर्मांना वगळता येत नाही. आपले गुणधर्मच आपला खरा धर्म आहे, असंही शरद पोंक्षे (Sharad Ponkshe on Rahul Gandhi) म्हणाले.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.